शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास प्रेरणादायी-- इस्माईल पठाण :- व्याख्यानातून मांडला जाज्वल्य इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:12 IST

छत्रपती संभाजी महाराज पराक्रमात आणि राज्यकारभारात आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. त्यांचा थेट स्वभाव काहीजणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा असल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता मात्र त्यांच्या चारित्र्यावरील हा डाग पुसला जात आहे

ठळक मुद्देपठाण म्हणाले, संभाजी महाराजांचा स्वभाव रोकठोक होता. असा छत्रपती अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना नको होता, तर सोयराबार्इंना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते. या राजकारणातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी केली गेली, तर नाटककार व कादंबरीकारां

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमात आणि राज्यकारभारात आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. त्यांचा थेट स्वभाव काहीजणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा असल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता मात्र त्यांच्या चारित्र्यावरील हा डाग पुसला जात आहे. विशेषत: तरुणांना त्यांचा जाज्वल्य इतिहास अधिक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. इस्माईल पठाण यांनी सोमवारी केले.

शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित्त भवानी मंडपातील शेतकरी संघाच्या हॉलमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी नोकर युनियनच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षस्थानी संघाचे ज्येष्ठ संचालक व्यंकाप्पा भोसले होते.

पठाण म्हणाले, संभाजी महाराजांचा स्वभाव रोकठोक होता. असा छत्रपती अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना नको होता, तर सोयराबार्इंना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते. या राजकारणातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी केली गेली, तर नाटककार व कादंबरीकारांनी त्यात भर टाकली; त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मराठा इतिहासकारांनी सर्व कागदपत्रांचे संशोधन करून खरा इतिहास पुढे आणला. त्यात वा. सी. बेंद्रे, प्रा. डॉ. कमल गोखले व प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे मोलाचे योगदान आहे.

ते म्हणाले, संभाजी महाराजांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला. त्यांना ठार मारण्याचे कट रचले गेले. दुसरीकडे ते सलग नऊ वर्षे कुतुबशाही, आदिलशाही, मुघल, फ्रेंच, इंग्रज अशा सहा शत्रूंशी एकाकी लढत होते. त्यात औरंगजेबाचा समावेश होता. औरंगजेबाच्या सत्तेला शिवाजी महाराजांनी शह दिला होता, त्याचा राग त्याच्या मनात होता. अखेर स्वकियांनीच केलेल्या घातामुळे संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले. महिनाभर हाल हाल करून महाराजांना मारले. तरीही संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा केला नाही. स्वाभिमान जपला व हौतात्म्य पत्करले. त्यांचा हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे.

व्यंकाप्पा भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दिलीप पवार यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. दीपक निंबाळकर यांनी आभार मानले. यावेळी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील भुयेकर, संभाजी जगदाळे, बी. एल. बरगे, सुभाष वाणी, अरुण पाटील, बाबूराव लाटकर, उमेश पानसरे, आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर