शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास प्रेरणादायी-- इस्माईल पठाण :- व्याख्यानातून मांडला जाज्वल्य इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:12 IST

छत्रपती संभाजी महाराज पराक्रमात आणि राज्यकारभारात आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. त्यांचा थेट स्वभाव काहीजणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा असल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता मात्र त्यांच्या चारित्र्यावरील हा डाग पुसला जात आहे

ठळक मुद्देपठाण म्हणाले, संभाजी महाराजांचा स्वभाव रोकठोक होता. असा छत्रपती अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना नको होता, तर सोयराबार्इंना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते. या राजकारणातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी केली गेली, तर नाटककार व कादंबरीकारां

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमात आणि राज्यकारभारात आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. त्यांचा थेट स्वभाव काहीजणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा असल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता मात्र त्यांच्या चारित्र्यावरील हा डाग पुसला जात आहे. विशेषत: तरुणांना त्यांचा जाज्वल्य इतिहास अधिक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. इस्माईल पठाण यांनी सोमवारी केले.

शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित्त भवानी मंडपातील शेतकरी संघाच्या हॉलमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी नोकर युनियनच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षस्थानी संघाचे ज्येष्ठ संचालक व्यंकाप्पा भोसले होते.

पठाण म्हणाले, संभाजी महाराजांचा स्वभाव रोकठोक होता. असा छत्रपती अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना नको होता, तर सोयराबार्इंना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते. या राजकारणातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी केली गेली, तर नाटककार व कादंबरीकारांनी त्यात भर टाकली; त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मराठा इतिहासकारांनी सर्व कागदपत्रांचे संशोधन करून खरा इतिहास पुढे आणला. त्यात वा. सी. बेंद्रे, प्रा. डॉ. कमल गोखले व प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे मोलाचे योगदान आहे.

ते म्हणाले, संभाजी महाराजांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला. त्यांना ठार मारण्याचे कट रचले गेले. दुसरीकडे ते सलग नऊ वर्षे कुतुबशाही, आदिलशाही, मुघल, फ्रेंच, इंग्रज अशा सहा शत्रूंशी एकाकी लढत होते. त्यात औरंगजेबाचा समावेश होता. औरंगजेबाच्या सत्तेला शिवाजी महाराजांनी शह दिला होता, त्याचा राग त्याच्या मनात होता. अखेर स्वकियांनीच केलेल्या घातामुळे संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले. महिनाभर हाल हाल करून महाराजांना मारले. तरीही संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा केला नाही. स्वाभिमान जपला व हौतात्म्य पत्करले. त्यांचा हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे.

व्यंकाप्पा भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दिलीप पवार यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. दीपक निंबाळकर यांनी आभार मानले. यावेळी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील भुयेकर, संभाजी जगदाळे, बी. एल. बरगे, सुभाष वाणी, अरुण पाटील, बाबूराव लाटकर, उमेश पानसरे, आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर