शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

राजकारणासाठी ‘गोकुळ’चा बळी नको - : रवींद्र आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:15 IST

‘गोकुळ’ ही लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची अस्मिता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही,राजकारणासाठी विरोधकांनी ‘गोकुळ’चा बळी देऊ नये,

ठळक मुद्देस्पर्धेत टिकण्यासाठी ‘मल्टिस्टेट’ गरजेचेच

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाला होत असलेली मागणी आणि उत्पादनात मोठी तफावत असल्याने कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलन करणे गरजेचे आहे. इतर राज्यांतील दूध संघ आमच्या कार्यक्षेत्रात आले असताना आम्ही कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला म्हणून चुकले कोठे? ‘गोकुळ’ ही लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची अस्मिता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही, असा विश्वास संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी व्यक्त केला. राजकारणासाठी विरोधकांनी ‘गोकुळ’चा बळी देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘मल्टिस्टेट’वरून जिल्ह्यात उठलेल्या वादंगावर अध्यक्ष आपटे यांनी पहिल्यांदाच परखड भूमिका मांडली. आपटे म्हणाले, राज्यासह देशात ‘गोकुळ’च्या ब्रॅँडबद्दल विश्वासार्हता आहे. ती दूध उत्पादकांच्या बळावरच आपण कायम राखू शकलो. शेतकऱ्यांची ही मातृसंस्था असून, दर दहा दिवसांनी न चुकता शेतकºयांच्या हातात पैसे पोहोच केले जातात. आता मुंबईच्या बाजारात दूध कमी पडत आहे. त्यासाठी कार्यक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही मल्टिस्टेटचा निर्णय घेतला. संघाचा विस्तार वाढला तर उलाढाल वाढेल, त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांनाच होणार आहे.

उत्पादकच ‘गोकुळ’चा खरा मालक असून, भविष्यातही तोच राहणार आहे. संघाचे २० लाख लिटरपर्यंत विस्तारीकरण केले असून, त्यासाठी दुधाची गरज आहे. त्यात आमच्या कार्यक्षेत्रात बहुराज्यीय संघ व प्रोड्युसर कंपन्या येत आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करायची झाल्यास आपण सशक्त बनलो पाहिजे. त्यासाठी मल्टिस्टेटची गरज आहे; पण काही विघ्नसंतोषी मंडळी मल्टिस्टेटबाबत जाणूनबूजन दिशाभूल करीत आहेत. मल्टिस्टेट झाल्यानंतर निवडणुका होणार नाहीत, सभासदांचा मतदानाचा हक्क संपुष्टात येईल, खासगीकरण होईल अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझी दूध उत्पादकांना विनंती आहे, अशा अफवा दूध संघासाठी मारक असून त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मल्टिस्टेटबाबत काही शंका असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही रवींद्र आपटे यांनी केले.

व्यक्ती सभासद करताच येत नाहीतउपविधीतील तरतुदीनुसार दूध व्यवसायातील सहकारी संस्था, बहुउद्देशीय व बहुराज्यीय संस्थाच सभासद करता येतात. व्यक्ती सभासद करता येत नाहीत. आम्ही सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांची मागणीच केलेली नाही. केवळ कर्नाटकातील अथणी, चिक्कोडी, हुक्केरी या तालुक्यांचा समावेश केला आहे. कोणत्याही परिस्थितीत संस्था व उत्पादकांच्या हिताला बाधा येणार नाही, असा विश्वास आपटे यांनी व्यक्त केला.मग ‘मंडलिक’, ‘महालक्ष्मी’ मल्टिस्टेट कसे ?’गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोध करणाऱ्यांचे दूध संघ व साखर कारखाने मल्टिस्टेट कसे? ‘वारणा’, ‘स्वाभिमानी’, ‘हुतात्मा’ आणि बंद पडलेला ‘महालक्ष्मी’ दूध संघ व ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘दत्त’, ‘शाहू’, ‘सदाशिवराव मंडलिक’ हे कारखाने मल्टिस्टेट आहेत.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण