शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

राजकारणासाठी ‘गोकुळ’चा बळी नको - : रवींद्र आपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:15 IST

‘गोकुळ’ ही लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची अस्मिता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही,राजकारणासाठी विरोधकांनी ‘गोकुळ’चा बळी देऊ नये,

ठळक मुद्देस्पर्धेत टिकण्यासाठी ‘मल्टिस्टेट’ गरजेचेच

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दुधाला होत असलेली मागणी आणि उत्पादनात मोठी तफावत असल्याने कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलन करणे गरजेचे आहे. इतर राज्यांतील दूध संघ आमच्या कार्यक्षेत्रात आले असताना आम्ही कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला म्हणून चुकले कोठे? ‘गोकुळ’ ही लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची अस्मिता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही, असा विश्वास संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी व्यक्त केला. राजकारणासाठी विरोधकांनी ‘गोकुळ’चा बळी देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘मल्टिस्टेट’वरून जिल्ह्यात उठलेल्या वादंगावर अध्यक्ष आपटे यांनी पहिल्यांदाच परखड भूमिका मांडली. आपटे म्हणाले, राज्यासह देशात ‘गोकुळ’च्या ब्रॅँडबद्दल विश्वासार्हता आहे. ती दूध उत्पादकांच्या बळावरच आपण कायम राखू शकलो. शेतकऱ्यांची ही मातृसंस्था असून, दर दहा दिवसांनी न चुकता शेतकºयांच्या हातात पैसे पोहोच केले जातात. आता मुंबईच्या बाजारात दूध कमी पडत आहे. त्यासाठी कार्यक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही मल्टिस्टेटचा निर्णय घेतला. संघाचा विस्तार वाढला तर उलाढाल वाढेल, त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांनाच होणार आहे.

उत्पादकच ‘गोकुळ’चा खरा मालक असून, भविष्यातही तोच राहणार आहे. संघाचे २० लाख लिटरपर्यंत विस्तारीकरण केले असून, त्यासाठी दुधाची गरज आहे. त्यात आमच्या कार्यक्षेत्रात बहुराज्यीय संघ व प्रोड्युसर कंपन्या येत आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करायची झाल्यास आपण सशक्त बनलो पाहिजे. त्यासाठी मल्टिस्टेटची गरज आहे; पण काही विघ्नसंतोषी मंडळी मल्टिस्टेटबाबत जाणूनबूजन दिशाभूल करीत आहेत. मल्टिस्टेट झाल्यानंतर निवडणुका होणार नाहीत, सभासदांचा मतदानाचा हक्क संपुष्टात येईल, खासगीकरण होईल अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझी दूध उत्पादकांना विनंती आहे, अशा अफवा दूध संघासाठी मारक असून त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मल्टिस्टेटबाबत काही शंका असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही रवींद्र आपटे यांनी केले.

व्यक्ती सभासद करताच येत नाहीतउपविधीतील तरतुदीनुसार दूध व्यवसायातील सहकारी संस्था, बहुउद्देशीय व बहुराज्यीय संस्थाच सभासद करता येतात. व्यक्ती सभासद करता येत नाहीत. आम्ही सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांची मागणीच केलेली नाही. केवळ कर्नाटकातील अथणी, चिक्कोडी, हुक्केरी या तालुक्यांचा समावेश केला आहे. कोणत्याही परिस्थितीत संस्था व उत्पादकांच्या हिताला बाधा येणार नाही, असा विश्वास आपटे यांनी व्यक्त केला.मग ‘मंडलिक’, ‘महालक्ष्मी’ मल्टिस्टेट कसे ?’गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोध करणाऱ्यांचे दूध संघ व साखर कारखाने मल्टिस्टेट कसे? ‘वारणा’, ‘स्वाभिमानी’, ‘हुतात्मा’ आणि बंद पडलेला ‘महालक्ष्मी’ दूध संघ व ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘दत्त’, ‘शाहू’, ‘सदाशिवराव मंडलिक’ हे कारखाने मल्टिस्टेट आहेत.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण