शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये घडल्या संत बहिणाबाई : सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:00 IST

सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरण केले. हे ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : संत तुकाराम यांचे अभंग कोल्हापूरमध्ये त्या काळी बहिणाबार्इंच्या कानी आले नसते, तर पुढे त्यांच्याबाबतचा इतिहास होऊ शकला नसता. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या, हे लक्षात घ्यावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनातर्फे आयोजित ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ या द्विखंडात्मक ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, साहित्यिक प्रा. राजन गवस, गाथेचे ‘निरूपण’कार मारुती जाधव प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, बहिणाबाई यांच्या कुटुंबीयांनी काही कारणाने सिऊर (औरंगाबाद) येथील त्यांचे घर सोडले. फिरत-फिरत ते कोल्हापूरमध्ये आले. काही वर्षे ते येथे होते. त्यावेळी येथे साताऱ्याच्या जयरामस्वामी वडगावकर यांची कीर्तने सुरू होती. ते आपल्या कीर्तनांत तुकारामांचे अभंग सादर करीत. बहिणाबार्इंना जणू त्या अभंगांचे वेड लागले. त्यांनी तुकारामांना गुरू करायचे ठरविले. त्यांच्या दर्शनासाठी त्या देहूला पोहोचल्या. तेथे त्यांना तुकारामांचा गुरूपदेश, सहवास लाभला. त्यापुढे संत बहिणाबाई झाल्या. त्यामुळे तुकारामांच्या एक महत्त्वाच्या शिष्या कोल्हापूरमध्ये घडल्या.

डॉ. शिंदे म्हणाले, संत तुकाराम यांनी जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची शिदोरी आपल्या अभंगांमधून खुली केली. हे ज्ञान माणसाचे जगणे सहजसोपे आणि नितांतसुंदर बनविणारे आहे. मारुती जाधव म्हणाले, एखाद्या संताच्या अभंगांचा ग्रंथ प्रकाशित करणारे शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ही गाथा प्रकाशित करून विद्यापीठाने माझा व्यक्तिगत सन्मान तर वाढविलाच; पण वारकरी समाजासाठीही भरीव योगदान दिले आहे.या कार्यक्रमात अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. मराठी अधिविभागप्रमुख प्रा. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरणसंत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेला कितीतरी नवनवीन शब्दांची देणगी दिली. ही भाषा समृद्ध करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे अभंग आशयात्मकदृष्ट्या गहन आहेत. मारुती जाधव (तळाशीकर) गुरुजी यांनी आशयसूत्रे लक्षात घेऊन या अभंगांचे अत्यंत चिकित्सकपणे, सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरण केले. हे ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. 

  • सदानंद मोरे म्हणाले,

* भाषा जपणे आणि वाढविण्याचे काम या गाथेने केले.* स्थानिक परंपरा, कला, संस्कृती जोपासना, संवर्धनाच्या कामात विद्यापीठांनी योगदान द्यावे.* विद्यापीठांमधील कार्यरत अध्यासनांना लोकाश्रय देण्याची स्थानिक जनतेची जबाबदारीवारकऱ्यांची उपस्थिती, खचाखच गर्दीया कार्यक्रमास गडहिंग्लज, आजरा, चंदगड, तळाशी परिसरातील वारकरी, ग्रामस्थ असे सुमारे ५00 जण उपस्थित होते. तळाशी ग्रामस्थांनी मारुती जाधव यांचा सत्कार केला. सभागृहात खचाखच गर्दी झाली होती. अनेकांनी सभागृहाबाहेरील एलईडी स्क्रीन उभारून कार्यक्रम पाहिला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ