शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:36 IST

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे. ​

ठळक मुद्देसाहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीतजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी रविवार (दि. १०) पासून आचारसंहिता सुरू झाली आहे. २३ एप्रिलला मतदान होईपर्यंत ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे अजून दीड महिना सर्वच सरकारी कार्यालयातील हीच अवस्था दिसणार आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, पोलीस, शिक्षण, सहकार, पाटबंधारे, इत्यादी विभागांतून कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहेत. निवडणूक ड्यूटी लागलेले कर्मचारी एकूण संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांशही नाहीत. तरीही निवडणुकीच्या नावाखाली बरीच सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.निवडणूक कामाचा अनुभव असल्याने महसूल, सहकार, शिक्षण या विभागांतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या कामासाठी घेतले जाते. सहकारातील जिल्हा उपनिबंधकांसह निम्मे कर्मचारी या कामासाठी घेण्यात आले आहेत; त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सध्या थंडावले आहे. मार्च एंडिंगची कामे असतानाही निम्मे कर्मचारी नसल्याचा परिणाम कामकाजावर दिसत आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषदेत दिसत आहे.

पंचायत समिती व मुख्यालयातील जवळपास १७५ कर्मचारी निवडणुकीसाठी घेतल्याने त्यांच्या कामाचा ताण त्यांच्या विभागातील इतर कर्मचाºयांवर येत असल्याचे दिसत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते पूर्ण प्रशासन सांभाळणारे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इलेक्शन ड्यूटीवर असल्याने अन्य कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे रान मोकळे मिळाले आहे.

दहावी, बारावी वगळून सर्व शिक्षक निवडणूक कामासाठी घेतले असल्याने त्यांना आतापासून शाळा व निवडणुकीच्या कामांसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे १० एप्रिलच्या आत परीक्षा घेऊन पूर्णवेळ निवडणूक कामाला देण्याचे बंधन शिक्षकांना घालण्यात आले आहे. आचारसंहितेचे कडक पालन करण्यासह उमेदवारी अर्ज भरायला सुरू होण्यापूर्वीची सर्व तयारी या कर्मचाऱ्यांकडून सध्या करवून घेतली जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार व्होटर स्लिप तयार करणे, मतदारसंघनिहाय मतदारांची माहिती विशेष रकान्यात भरणे, आदी कामे करवून घेतली जात आहेत.

जिल्ह्यातील ६००० कर्मचारी निवडणूक कामातनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने ३९ हजार २८३ कर्मचारी लागतील, असे गृहीत धरून नियोजन केले आहे. त्यांपैकी २९ हजार ८०९ कर्मचारी, अधिकारी उपलब्ध होण्यासारखे आहेत. त्यातही २३ हजार ६८९ कर्मचारी प्रत्यक्ष कामास पात्र ठरत आहे. यातदेखील आजारी, महिला असे निकष लावून त्याप्रमाणे अंतिम यादी तयार करण्यात येत आहे. आजच्या घडीला सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGovernmentसरकारkolhapurकोल्हापूर