शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:36 IST

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे. ​

ठळक मुद्देसाहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीतजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे.लोकसभा निवडणुकीसाठी रविवार (दि. १०) पासून आचारसंहिता सुरू झाली आहे. २३ एप्रिलला मतदान होईपर्यंत ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे अजून दीड महिना सर्वच सरकारी कार्यालयातील हीच अवस्था दिसणार आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, पोलीस, शिक्षण, सहकार, पाटबंधारे, इत्यादी विभागांतून कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहेत. निवडणूक ड्यूटी लागलेले कर्मचारी एकूण संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांशही नाहीत. तरीही निवडणुकीच्या नावाखाली बरीच सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.निवडणूक कामाचा अनुभव असल्याने महसूल, सहकार, शिक्षण या विभागांतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या कामासाठी घेतले जाते. सहकारातील जिल्हा उपनिबंधकांसह निम्मे कर्मचारी या कामासाठी घेण्यात आले आहेत; त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सध्या थंडावले आहे. मार्च एंडिंगची कामे असतानाही निम्मे कर्मचारी नसल्याचा परिणाम कामकाजावर दिसत आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषदेत दिसत आहे.

पंचायत समिती व मुख्यालयातील जवळपास १७५ कर्मचारी निवडणुकीसाठी घेतल्याने त्यांच्या कामाचा ताण त्यांच्या विभागातील इतर कर्मचाºयांवर येत असल्याचे दिसत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते पूर्ण प्रशासन सांभाळणारे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इलेक्शन ड्यूटीवर असल्याने अन्य कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे रान मोकळे मिळाले आहे.

दहावी, बारावी वगळून सर्व शिक्षक निवडणूक कामासाठी घेतले असल्याने त्यांना आतापासून शाळा व निवडणुकीच्या कामांसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे १० एप्रिलच्या आत परीक्षा घेऊन पूर्णवेळ निवडणूक कामाला देण्याचे बंधन शिक्षकांना घालण्यात आले आहे. आचारसंहितेचे कडक पालन करण्यासह उमेदवारी अर्ज भरायला सुरू होण्यापूर्वीची सर्व तयारी या कर्मचाऱ्यांकडून सध्या करवून घेतली जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार व्होटर स्लिप तयार करणे, मतदारसंघनिहाय मतदारांची माहिती विशेष रकान्यात भरणे, आदी कामे करवून घेतली जात आहेत.

जिल्ह्यातील ६००० कर्मचारी निवडणूक कामातनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने ३९ हजार २८३ कर्मचारी लागतील, असे गृहीत धरून नियोजन केले आहे. त्यांपैकी २९ हजार ८०९ कर्मचारी, अधिकारी उपलब्ध होण्यासारखे आहेत. त्यातही २३ हजार ६८९ कर्मचारी प्रत्यक्ष कामास पात्र ठरत आहे. यातदेखील आजारी, महिला असे निकष लावून त्याप्रमाणे अंतिम यादी तयार करण्यात येत आहे. आजच्या घडीला सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGovernmentसरकारkolhapurकोल्हापूर