शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

गरिबांची भाकरी बसली श्रीमंतांच्या ताटात! : ज्वारीचे दर पन्नाशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:48 IST

कोल्हापूर : नुसती चटणी- भाकरी खाऊन दिवस काढले, असे गरिबीचे होणारे वर्णन आता केवळ कथा, कादंबऱ्यांमध्येच वाचायला मिळेल, अशी ...

ठळक मुद्देज्वारी खाण्याचे, विक्रीचे प्रमाणही निम्म्यापर्यंत

कोल्हापूर : नुसती चटणी- भाकरी खाऊन दिवस काढले, असे गरिबीचे होणारे वर्णन आता केवळ कथा, कादंबऱ्यांमध्येच वाचायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. वाढलेले दर आणि खाण्याच्या बदललेल्या सवयींमुळे भाकरी खाणे ही गरजेची नव्हे, तर चैनीची गोष्ट बनून गेली आहे. गरिबांची ही ताटातील भाकरी श्रीमंतांच्या ताटात जाऊन बसतानाच हॉटेलमधील मेन्यू कार्डवरही ऐटीत विराजमान झाली आहे.

यंदा तर दुष्काळामुळे ज्वारीची आवकच कमी झाल्याने, दराने कधी नव्हे ती पन्नाशी पार केली आहे. या तुलनेत गव्हाचे दर कमी असल्याने सर्वसामान्यांच्या घरात भाकरीची जागा चपातीने घेतली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २0 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर ज्वारी पिकत असे; पण उसाला दर मिळू लागला, तसे ज्वारीची शेती लाखावरून अवघ्या तीन-चार हजार हेक्टरवर आली; त्यामुळे कोल्हापूरची गरज सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कर्नाटकातून येणाºया ज्वारीतून भागवली जाऊ लागली. बार्शीतून येणारा शाळू आणि कर्नाटकातून येणारा महिंद्रा या हायब्रीड ज्वारीची बाजारपेठ कोल्हापुरात वाढीस लागली; पण गेल्या काही वर्षांत रेशनवर गहू कमी किमतीत मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने सणावाराला दिसणारी चपाती गोरगरिबांच्या घरात रोजच दिसू लागली.

साहजिकच ज्वारी खाण्याचे प्रमाण कमी होत गेले, त्यात मधुमेहासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याने भाकरी खाऊ नये, खाल्लीच तर हलक्या प्रतीच्या ज्वारीची भाकरी खावी, असा सल्ला डॉक्टर देऊ लागले. आरोग्य आणि गरज याचा मोठा फटका ज्वारीला बसला. ज्वारी हळूहळू गरिबांच्या घरातून हद्दपार होत असताना, आता दुष्काळाने राहिलेली कसर पूर्ण करण्यास सुरुवात केली. ज्वारी पिकविणाºया नगर, सोलापूर, सातारा, सांगलीत दुष्काळामुळे ज्वारीचे पीक जेमतेमच आहे. मागणीच्या तुलनेत होणारे उत्पादन अत्यल्प असल्याने आतापासूनच ज्वारीच्या दराने अर्धशतकाचा उंबरठा ओलांडला आहे. दर वाढल्यापासून ज्वारीच्या खरेदीतही निम्म्याने घट झाली आहे. १0 किलो घेणारे ग्राहक आता ५ किलो मागत आहेत. 

ज्वारीच्या आवकेत निम्म्याने घटकोल्हापूरच्या धान्य बाजारात ज्वारीचे २५ घाऊक व्यापारी आहेत. त्यांच्याकडे रोज चार ट्रकची ज्वारी आवक होते. त्यांपैकी दोन ट्रक हे शाळूचे, तर एक ट्रक हलक्या ज्वारीचा, तर एक ट्रक महिंद्रा हायब्रीड ज्वारीचा येत होता. त्यातून रोजची किमान १५ लाखांची उलाढाल होत होती; पण या महिन्याभरात दर वाढल्यापासून दोन दिवसांतून एकदा तीन ट्रक येत आहेत. त्यात शाळूचा अवघा एक, तर महिंद्राचे दोन ट्रक येत आहेत; यामुळे उलाढालही ७ लाखांपर्यंत खाली आली आहे.ज्वारीचे जिल्ह्यातील दरशाळूच्या दरात गेल्या महिनाभरात प्रती किलो १0 ते २0 रुपये वाढ झाली आहे. नंबर एकचा शाळू ५६ रुपयांवर गेला आहे. पाच नंबरचा हलक्या प्रतीचा शाळूही २५ रुपयांवरून ३५ वर गेला आहे. महिंंद्रा ज्वारी १८ रुपयाला मिळायची, ती आता २८ रुपये प्रति किलोवर गेली आहे. 

शाळूचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने कर्नाटकातून येणाºया हलक्या प्रतीच्या महिंद्रा या हायब्रीड ज्वारीची मागणी वाढली आहे. शाळूच्या मागणीत ६0 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये नवीन ज्वारी बाजारात येईपर्यंत दर चढेच राहणार आहेत.- सदानंद कोरगावकर, व्यापारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड