शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एस. टी. सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:43 IST

satetransport, diwali, kolhapurnews लॉकडाऊनमुळे आर्थिक खाईत लोटलेल्या एस. टी.च्या सर्व आशा आता दिवाळी हंगामावर आहेत. ११ ते २२ नोव्हेंबर हा गर्दीचा आणि हमखास पैसे मिळवून देणारा हंगाम कॅश करण्यासाठी एस.टी पूर्ण ताकदीने पुढे सरसावली आहे. आगारनिहाय जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे ११ ते २२ नोव्हेंबर काळात जादा गाड्यांचे नियोजन मुंबई, पुण्यातून येण्यासाठी जास्त गाड्या

कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे आर्थिक खाईत लोटलेल्या एस. टी.च्या सर्व आशा आता दिवाळी हंगामावर आहेत. ११ ते २२ नोव्हेंबर हा गर्दीचा आणि हमखास पैसे मिळवून देणारा हंगाम कॅश करण्यासाठी एस.टी पूर्ण ताकदीने पुढे सरसावली आहे. आगारनिहाय जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबई, पुण्यातून कोल्हापुरात आणण्यासाठी २२० जादा गाड्यांची सोय करून दिली आहे, तर कोल्हापुरातून बाहेर जाणाऱ्यांसाठी अतिरिक्त १० गाड्या दिमतीला ठेवण्यात आल्या आहेत. गर्दी पाहून आणखी फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या एस. टी. ला बसला आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा विचार केला तर अजूनही निम्म्या गाड्या डेपोत थांबून तर निम्म्याच रस्त्यावर धावत आहेत. दिवाळी हा एस.टी.साठी कायमच भरघोस उत्पन्न मिळवून देणारा सण ठरतो. दरवर्षी हंगामी दरवाढीसह जादा गाड्यांचे नियोजन केले जाते, पण यावर्षी हंगामी वाढ न करता दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा एस.टी.कडे आणण्याचे धोरण ठेवण्यात आले आहे.

एकट्या कोल्हापूर विभागाने मुंबईतून येणाऱ्यांसाठी २० जादा गाड्या सोडल्या आहेत, तर पुण्यातून कोल्हापूरकडे येण्यासाठी २०० गाड्यांची सोय केली आहे. कोल्हापुरात खासगी वाहनाने आल्यानंतर बेळगाव, गोवा, कोकणासह जिल्ह्यातील मोठ्या शहरांकडे जाण्यासाठीही १० विशेष गाड्यांची सोय केली आहे.कोणत्याही दरवाढीशिवाय आणि सुरक्षित प्रवास म्हणून एस.टीचा लौकीक आहे. आजवर एस.टीने एक प्रवासी असतानाही त्याला सुरक्षित पोहोचविण्याची सामाजिक बांधीलकी जपली, आता एस. टी. ला गरज असल्याने जास्तीत जास्त प्रवाशांनी एस. टी. ने प्रवास करून महाराष्ट्राच्या या जीवनदायिनीला गतवैभव मिळवून देण्याची गरज आहे.

  • मुंबईतून येण्याासाठी : ११ ते २२ नोव्हेंबर
  • पुण्यातून येण्यासाठी : ११ ते १३ नोव्हेंबर
  • कोल्हापुरातून जाण्यासाठी : ११ ते १४ नोव्हेबर

 

सध्या कोल्हापुरातील १२ आगारांत ४०० एस. टी. गाड्या रस्त्यावर धावत आहेत.कोरोनाच्या काळात पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाली असली तरी खबरदारी म्हणून सॅनिटायझरचा वापर, नो मास्क नो एन्ट्री हे धोरण कायम आहे. एस. टी. तही त्याचे तंतोतत पालन होते. सुरक्षित प्रवास म्हणून एस.टीची निवड करावी.अतुल मोरे, सहाय्यक वाहतूक अधिकारी , कोल्हापूर विभाग

टॅग्स :state transportएसटीDiwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर