शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

coronavirus : मंत्री, आमदारांना नियम नाहीत का?, एकीकडे रोज नियमांचे फतवे आणि दुसरीकडे नेतेमंडळींचे मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 12:13 IST

‘गाेकुळ’प्रमाणेच आता जिल्हा बँकेचा निकाल लागला की मग जनतेवर निर्बंध लादले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर : कोरोनाबाबतचे नियम मंत्री, खासदार आणि आमदारांना नाहीत का, असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून रोज नियमांचे फतवे काढले जात आहेत आणि दुसरीकडे नेतेमंडळी मेळावे घेत आहेत, असे विरोधाभासी चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. ‘गाेकुळ’प्रमाणेच आता जिल्हा बँकेचा निकाल लागला की मग जनतेवर निर्बंध लादले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या बंदिस्त सभागृहात ५० जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ आणि २० जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार असे नियम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. परंतु जिल्हा बँकेच्या निमित्ताने जिल्हाभर मंत्री, खासदार आणि आमदार शेकडो जणांचे मेळावे घेऊन फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हीच मंडळी नंतर तालुक्याला बैठका घेऊन कोरोनाचे रुग्ण वाढवत असून, काळजी घ्या, असे आवाहन करताना दिसणार आहेत.

‘गोकुळ’च्या निवडणुकीवेळीही अशीच परिस्थिती होती. कोराेनामुळे तीनहून अधिक ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच या निवडणुकीनंतरही कोरोनाबाधितांचा आकडाही वाढला होता. तेव्हाही निकाल लागल्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. आताही जिल्हा बँकेची शुक्रवारी मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा जनतेवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

अनेक राज्ये फिरलेले मतदार येणार घरी

जिल्हा बँकेच्या सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले २०/२२ दिवस सहा तालुक्यांतील अनेक ठरावधारक विविध राज्यांतून फिरतीवर आहेत. ते आता बुधवारी संध्याकाळनंतर आपापल्या घरात जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा बाहेर पाहुणचार झोडून घरात आल्यानंतर त्यांच्यामुळे आणखी कोणाला लागण होऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक