शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

कोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, ९५  बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:28 IST

मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठळक मुद्देकोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, अनेक गावांना बेटांचे स्वरूपपाच हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संघटना कार्यकर्त्यांची पुरती दमछाक झाली. महापुरामुळे सामान्यांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांतील विद्युत पुरवठा बंद होऊन त्यांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला. महापुराचा फटका बसलेल्या पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या नागरी वस्तीत तीन ते चार फुटांनी पाणी शिरल्यामुळे रविवारी (दि. ४) रात्री १0 वाजल्यापासून शहरवासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुमारे २00 हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले.

नजिकच्या शाळा, हॉलमधून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापुराचा मोठा फटका शहर पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. सोमवारी दुपारपासून संपूर्ण यंत्रणा पाण्यात बुडाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. ऐन पावसाळ्यात कोल्हापूरवासीयांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. शनिवार (दि. ३)पर्यंत जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत फारशी काळजी वाटत नव्हती; परंतु कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा अशा चार प्रमुख नद्यांना एकाच वेळी महापूर आला असल्याने पाण्याची फूग सुद्धा वाढत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून नदीकाठच्या अनेक गावांत तसेच कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरले; त्यामुळे सर्वांच्याच छातीचे ठोके चुकले आहेत.  पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुरचे पाणी आहे.

 कोल्हापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य चोहोबाजंूचे प्रमुख रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत; त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य मार्ग तसेच तालुक्यातील जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील दळणवळणाची यंत्रणा विस्कळीत होण्याबरोबरच शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गावागावांतील संपर्कही तुटला आहे. काही गावांतील विद्युत पुरवठा बंद असून, तेथे काळोख पसरला आहे.शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, कोथळी, कुरुंदवाड; हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, इंगळी या गावांना बेटाचे स्वरूप आले असून, तेथील ग्रामस्थांना होडी, रबरी बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पन्हाळा, वाडीरत्नागिरी, मसाई पठाराकडे जाणारे प्रमुख रस्ते खचले असून, या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. रस्ते खचण्याच्या, घराच्या भिंती पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.राधानगरी धरण भरून सातही स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून ११,४०० क्युसेक पाणी बाहेर फेकले जात आहे. तुळशी नदीवरील तुळशी धरणही सोमवारी पूर्ण क्षमतेने भरले. सकाळी साडेआठ वाजता एक हजार क्युसेक पाणी धरणातून बाहेर पडत होते. दूधगंगा धरणातील वक्राकार दरवाजातून पाणी सोडण्यात येत असून, या धरणातील सात हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

कोल्हापुरात प्रमुख बंद अलेले रस्ते1.व्हीनस काॅर्नर 2.फोर्ड काॅर्नर3.जयंती नदी4.कलेकटर आॅफिस चौक5.बंसत -बहार रोड, पाटलाचा वाडा6.बावडा- शिये7.कोल्हापुर- पन्हाळा8.कोल्हापुर-सांगली बायपास9.पंचगंगा स्मशानभुमी-जुना बुधवार10.कुंभार गल्ली11.लक्ष्मीपुरी12. शाहुपूरी13. सिद्धार्थनगर 14.पंचगंगा तालीम 15.लक्षतीर्थ16.मस्कुती तलाव17.परीख  पुल

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर