शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

कोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, ९५  बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:28 IST

मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठळक मुद्देकोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, अनेक गावांना बेटांचे स्वरूपपाच हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संघटना कार्यकर्त्यांची पुरती दमछाक झाली. महापुरामुळे सामान्यांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांतील विद्युत पुरवठा बंद होऊन त्यांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला. महापुराचा फटका बसलेल्या पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या नागरी वस्तीत तीन ते चार फुटांनी पाणी शिरल्यामुळे रविवारी (दि. ४) रात्री १0 वाजल्यापासून शहरवासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुमारे २00 हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले.

नजिकच्या शाळा, हॉलमधून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापुराचा मोठा फटका शहर पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. सोमवारी दुपारपासून संपूर्ण यंत्रणा पाण्यात बुडाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. ऐन पावसाळ्यात कोल्हापूरवासीयांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. शनिवार (दि. ३)पर्यंत जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत फारशी काळजी वाटत नव्हती; परंतु कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा अशा चार प्रमुख नद्यांना एकाच वेळी महापूर आला असल्याने पाण्याची फूग सुद्धा वाढत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून नदीकाठच्या अनेक गावांत तसेच कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरले; त्यामुळे सर्वांच्याच छातीचे ठोके चुकले आहेत.  पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुरचे पाणी आहे.

 कोल्हापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य चोहोबाजंूचे प्रमुख रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत; त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य मार्ग तसेच तालुक्यातील जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील दळणवळणाची यंत्रणा विस्कळीत होण्याबरोबरच शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गावागावांतील संपर्कही तुटला आहे. काही गावांतील विद्युत पुरवठा बंद असून, तेथे काळोख पसरला आहे.शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, कोथळी, कुरुंदवाड; हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, इंगळी या गावांना बेटाचे स्वरूप आले असून, तेथील ग्रामस्थांना होडी, रबरी बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पन्हाळा, वाडीरत्नागिरी, मसाई पठाराकडे जाणारे प्रमुख रस्ते खचले असून, या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. रस्ते खचण्याच्या, घराच्या भिंती पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.राधानगरी धरण भरून सातही स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून ११,४०० क्युसेक पाणी बाहेर फेकले जात आहे. तुळशी नदीवरील तुळशी धरणही सोमवारी पूर्ण क्षमतेने भरले. सकाळी साडेआठ वाजता एक हजार क्युसेक पाणी धरणातून बाहेर पडत होते. दूधगंगा धरणातील वक्राकार दरवाजातून पाणी सोडण्यात येत असून, या धरणातील सात हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

कोल्हापुरात प्रमुख बंद अलेले रस्ते1.व्हीनस काॅर्नर 2.फोर्ड काॅर्नर3.जयंती नदी4.कलेकटर आॅफिस चौक5.बंसत -बहार रोड, पाटलाचा वाडा6.बावडा- शिये7.कोल्हापुर- पन्हाळा8.कोल्हापुर-सांगली बायपास9.पंचगंगा स्मशानभुमी-जुना बुधवार10.कुंभार गल्ली11.लक्ष्मीपुरी12. शाहुपूरी13. सिद्धार्थनगर 14.पंचगंगा तालीम 15.लक्षतीर्थ16.मस्कुती तलाव17.परीख  पुल

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर