शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

कोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, ९५  बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:28 IST

मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठळक मुद्देकोल्हापूरात महापुराचा रुद्रावतार, अनेक गावांना बेटांचे स्वरूपपाच हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून, सोमवारी सहा तालुक्यांतील शेकडो गावांच्या वेशी ओलांडून महापुराच्या पाण्याने थेट गावांनाच विळखा घातला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी तालुक्यांतील काही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  ४८. ५ असून एकूण ९५  बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजना ६ आणि ७ ऑगस्ट रोजीही शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे . 

ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संघटना कार्यकर्त्यांची पुरती दमछाक झाली. महापुरामुळे सामान्यांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांतील विद्युत पुरवठा बंद होऊन त्यांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला. महापुराचा फटका बसलेल्या पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या नागरी वस्तीत तीन ते चार फुटांनी पाणी शिरल्यामुळे रविवारी (दि. ४) रात्री १0 वाजल्यापासून शहरवासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुमारे २00 हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले.

नजिकच्या शाळा, हॉलमधून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापुराचा मोठा फटका शहर पाणीपुरवठा यंत्रणेला बसला आहे. सोमवारी दुपारपासून संपूर्ण यंत्रणा पाण्यात बुडाल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. ऐन पावसाळ्यात कोल्हापूरवासीयांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. शनिवार (दि. ३)पर्यंत जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत फारशी काळजी वाटत नव्हती; परंतु कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा अशा चार प्रमुख नद्यांना एकाच वेळी महापूर आला असल्याने पाण्याची फूग सुद्धा वाढत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून नदीकाठच्या अनेक गावांत तसेच कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरले; त्यामुळे सर्वांच्याच छातीचे ठोके चुकले आहेत.  पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुरचे पाणी आहे.

 कोल्हापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वगळता अन्य चोहोबाजंूचे प्रमुख रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले आहेत; त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य मार्ग तसेच तालुक्यातील जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील दळणवळणाची यंत्रणा विस्कळीत होण्याबरोबरच शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. गावागावांतील संपर्कही तुटला आहे. काही गावांतील विद्युत पुरवठा बंद असून, तेथे काळोख पसरला आहे.शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, कोथळी, कुरुंदवाड; हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, इंगळी या गावांना बेटाचे स्वरूप आले असून, तेथील ग्रामस्थांना होडी, रबरी बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पन्हाळा, वाडीरत्नागिरी, मसाई पठाराकडे जाणारे प्रमुख रस्ते खचले असून, या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. रस्ते खचण्याच्या, घराच्या भिंती पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.राधानगरी धरण भरून सातही स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून ११,४०० क्युसेक पाणी बाहेर फेकले जात आहे. तुळशी नदीवरील तुळशी धरणही सोमवारी पूर्ण क्षमतेने भरले. सकाळी साडेआठ वाजता एक हजार क्युसेक पाणी धरणातून बाहेर पडत होते. दूधगंगा धरणातील वक्राकार दरवाजातून पाणी सोडण्यात येत असून, या धरणातील सात हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

कोल्हापुरात प्रमुख बंद अलेले रस्ते1.व्हीनस काॅर्नर 2.फोर्ड काॅर्नर3.जयंती नदी4.कलेकटर आॅफिस चौक5.बंसत -बहार रोड, पाटलाचा वाडा6.बावडा- शिये7.कोल्हापुर- पन्हाळा8.कोल्हापुर-सांगली बायपास9.पंचगंगा स्मशानभुमी-जुना बुधवार10.कुंभार गल्ली11.लक्ष्मीपुरी12. शाहुपूरी13. सिद्धार्थनगर 14.पंचगंगा तालीम 15.लक्षतीर्थ16.मस्कुती तलाव17.परीख  पुल

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर