शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

हुल्लडबाजीने लग्न समारंभातील पवित्रता हरवतेय

By admin | Updated: March 18, 2015 23:57 IST

ज्येष्ठ मंडळींतून नाराजीचा सूर : अक्षता, स्प्रेचा वधू-वरासह भटजींवर मारा

संजय पाटील - सरूड वधू-वरांना साताजन्माचे जोडीदार बनण्याचा कार्यक्रम म्हणजे लग्न समारंभ. नववधू-वर या समारंभात लग्नाच्या बेडीत अडकून जन्मभर एकमेकांचे सहचारी बनतात. लग्न समारंभातील हळदीपासून ते वराती पर्यंतचा प्रत्येक क्षण हा मंगलमय व पवित्र; मात्र हल्लीच्या आधुनिक जमान्यात अनेक लग्न समारंभात युवकांकडून लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात होणाऱ्या हुल्लडबाजीच्या कृत्यांनी हे पवित्र क्षण पायदळी तुडवले जाऊन लग्नाचा खेळ होत आहे. भटजी व नवरदेवावर उत्साही युवकांकडून अक्षतांचा अक्षरश: मारा होतो. या प्रकारामुळे बुजूर्ग मंडळींतून नाराजी व्यक्त होत आहे.प्रत्येकाच्या जीवनात लग्न समारंभ म्हणजे लाखमोलाचा क्षण. प्रत्येक पवित्र क्षणांनी नवरी-नवऱ्याला मिळत असते, ते दोघेही एकमेकांचा स्वीकार उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने करत असतात. पूर्वी एका दिवसापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या समारंभात किती गोड आणि मंगलमय प्रसन्न व पवित्र वातावरण असायचे; पण सध्याच्या काळात लग्न समारंभातील पवित्र हरवायला लागले आहे.सध्या सर्रास लग्न समारंभात हुल्लडबाजीचे प्रकार पाहावयास मिळत आहे. ज्या क्षणांनी वधू-वरांची लग्नगाठ बांधली जाते, त्या क्षणांच्या वेळीच युवकांकडून (वरदावळे) अशोभनीय वर्तन होताना दिसत आहे.१ मंगलाष्टका सुरू असतानाच अधूनमधून भटजी व नवरदेवावर अक्षतांचा मारा केला जातो. शेवटची मंगलाष्टका संपल्यावर उडविले जाणारे सुगंधी द्रव्याच्या (स्प्रे)वेळी भटजीला ‘टार्गेट’ केले जाते. शेवटी या स्प्रे-पासून बचाव करण्यासाठी भटजीला पवित्र आंतरपाटाचा आधार घ्यावा लागत आहे. काही भटजींना तर शेवटची अक्षता संपली की ताबडतोब लग्नाच्या व्यासपीठावरुन काही क्षणासाठी बाजूला पळ काढावा लागत आहे.२ अक्षता संपल्यानंतर नव वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालून एकमेकांचे जन्माचे जोडीदार म्हणून स्वीकार करतात. हार घालण्याच्या या कार्यक्रमाचा पुरता ‘खेळ’ झाला आहे. अनेक लग्नसमारंभात हार घालतेवेळी नवरी व नवऱ्याला उचलून घेऊन पवित्र हार एकमेकांच्या गळ्यात अक्षरश: फेकून घातले जात आहेत. नवरीच्या करवल्या व नवऱ्याचे वरदावळे यांच्याकडून अनेकवेळा अशोभनीय वर्तन होत आहे.३ लग्नाचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे वरात. या कार्यक्रमाचा तर अलीकडच्या काळात ‘तमाशाच’ झाला आहे. एकंदरीत अलीकडे अनेक लग्नसमारंभात होणाऱ्या हुल्लडबाजीचे प्रकार पाहून जुनी-जाणती माणसे प्रचंड नाराजी व्यक्त करत असून युवकवर्गाने कार्यक्रमाचे महत्त्व जाणून आपले वर्तन योग्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.