शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

पूरभागातील रोहित्रे, खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 10:43 IST

पूरग्रस्त भागातील विद्युत रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) दुरुस्ती व विद्युत खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. यावेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी बहुतांश काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय पूरबाधित उसासंदर्भात २३ ला कारखानदारांची बैठक

कोल्हापूर : पूरग्रस्त भागातील विद्युत रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) दुरुस्ती व विद्युत खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. यावेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी बहुतांश काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे सांगितले.महापुराने बाधित झालेल्या भागातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारी रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर), विद्युत खांब, विद्युत तारा, मीटर्स या संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाबासाहेब देवकर, मारुती पाटील, ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता सागर मारुळकर, आदी प्रमुख उपस्थित होते.गतवेळच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. किती काम पूर्ण झाले, किती शिल्लक आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली.राहिलेली रोहित्रे व विजेच्या खांबांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.पूरकाळात बंद असलेल्या कृषिपंपांचे वीज बिल आकारता येणार नाही; कारण तशी तरतूद असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणले.पूरभागातील कृषिपंपांसह मोटारी, विद्युत सामग्रीसंदर्भातील पंचनामे महावितरणच्या कार्यालयातच पडून असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, अशी मागणी विक्रांत पाटील-किणीकर यांनी केली.‘महावितरण’चे मारुळकर यांनी पूरभागातील रोहित्रे दुरुस्त करून बसविण्याचे व खांब उभारण्याचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचे सांगितले. एकूण १६०२ पैकी १३६ रोहित्रांचे व २१०० पैकी ८४१ खांब बसविण्याचे काम शिल्लक असून, ते लवकरच पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहित्रे दुरुस्तीसह खांब बसविणे याबाबतचा अहवाल ‘महावितरण’तर्फे वरचेवर देण्यात यावा. तसेच पुरातील मोटारींच्या पंचनाम्याची स्थिती काय असून, त्याचा तालुकानिहाय आकडा कळवावा, सरकारकडे तो पाठविला जाईल, असे सांगितले.ऊसतोडणीचा अहवाल दररोज द्यापूरबाधित भागात शिरोळचा दत्त कारखाना वगळता इतर साखर कारखाने ऊसतोडणी करीत नसल्याचे किणीकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून साखर सहसंचालकांना त्याबाबत कळवावे असे सांगितले. तसेच उपस्थित साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूरबाधित क्षेत्रातील किती ऊसतोडणी केला व नियमित ऊस किती तोडला याचा दररोज अहवाल आपल्याला सादर करावा, असे निर्देश दिले. पुढील बैठक २३ डिसेंबरला होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर