शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पूरभागातील रोहित्रे, खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 10:43 IST

पूरग्रस्त भागातील विद्युत रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) दुरुस्ती व विद्युत खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. यावेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी बहुतांश काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय पूरबाधित उसासंदर्भात २३ ला कारखानदारांची बैठक

कोल्हापूर : पूरग्रस्त भागातील विद्युत रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) दुरुस्ती व विद्युत खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. यावेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी बहुतांश काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे सांगितले.महापुराने बाधित झालेल्या भागातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारी रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर), विद्युत खांब, विद्युत तारा, मीटर्स या संदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाबासाहेब देवकर, मारुती पाटील, ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता सागर मारुळकर, आदी प्रमुख उपस्थित होते.गतवेळच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्याबाबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. किती काम पूर्ण झाले, किती शिल्लक आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली.राहिलेली रोहित्रे व विजेच्या खांबांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे एन. डी. पाटील यांनी सांगितले.पूरकाळात बंद असलेल्या कृषिपंपांचे वीज बिल आकारता येणार नाही; कारण तशी तरतूद असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणले.पूरभागातील कृषिपंपांसह मोटारी, विद्युत सामग्रीसंदर्भातील पंचनामे महावितरणच्या कार्यालयातच पडून असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, अशी मागणी विक्रांत पाटील-किणीकर यांनी केली.‘महावितरण’चे मारुळकर यांनी पूरभागातील रोहित्रे दुरुस्त करून बसविण्याचे व खांब उभारण्याचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचे सांगितले. एकूण १६०२ पैकी १३६ रोहित्रांचे व २१०० पैकी ८४१ खांब बसविण्याचे काम शिल्लक असून, ते लवकरच पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहित्रे दुरुस्तीसह खांब बसविणे याबाबतचा अहवाल ‘महावितरण’तर्फे वरचेवर देण्यात यावा. तसेच पुरातील मोटारींच्या पंचनाम्याची स्थिती काय असून, त्याचा तालुकानिहाय आकडा कळवावा, सरकारकडे तो पाठविला जाईल, असे सांगितले.ऊसतोडणीचा अहवाल दररोज द्यापूरबाधित भागात शिरोळचा दत्त कारखाना वगळता इतर साखर कारखाने ऊसतोडणी करीत नसल्याचे किणीकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून साखर सहसंचालकांना त्याबाबत कळवावे असे सांगितले. तसेच उपस्थित साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना पूरबाधित क्षेत्रातील किती ऊसतोडणी केला व नियमित ऊस किती तोडला याचा दररोज अहवाल आपल्याला सादर करावा, असे निर्देश दिले. पुढील बैठक २३ डिसेंबरला होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर