शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हुंकार, शेट्टीच आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:49 IST

नाराजीनाट्यानंतर स्वाभिमानीतील कार्यकर्ते नेत्यांनी एकमताने भरलेला हुंकार आणि त्याला राजू शेट्टी यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक होकारानंतर विधान परिषदेचे आमदार शेट्टीच होणार असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देस्वाभिमानी कार्यकर्त्यांचा हुंकार, शेट्टीच आमदारराज्यपाल कोट्यातून उमेदवारी स्वीकारणार : वाद मिटल्याचे जाहीर

कोल्हापूर : नाराजीनाट्यानंतर स्वाभिमानीतील कार्यकर्ते नेत्यांनी एकमताने भरलेला हुंकार आणि त्याला राजू शेट्टी यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक होकारानंतर विधान परिषदेचे आमदार शेट्टीच होणार असल्याचे स्पष्ट झाले.

चार दिवसांपासून रंगलेल्या नाराजीनाट्याचा शेवट शुक्रवारी (दि. १९) रात्री गोड झाला. नाराज नेत्यांसह एकत्रित पोझ देऊन शेट्टी यांनीच आपण एकसंध असल्याचे आणि वाद राहिला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शनिवारी घोषणेची निव्वळ औपचारिकता उरली होती.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना खुद्द शरद पवार यांनी बारामतीत घरी बोलावून राष्ट्रवादीतर्फे विधान परिषदेत राज्यपाल कोट्यातून निवडीसाठी शिफारस केल्याचे जाहीर केले. राजकीय व्यवहार समितीत ठरल्यानुसार शेट्टी यांनी पवार यांना होकार दिला; पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी संघटनेतील बिनीचे शिलेदार व शेट्टी यांचे विश्वासू साथीदार असलेले स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी थेट नाराजी व्यक्त करीत उमेदवारीवर दावा केला.

यावरून दोन दिवसांपासून राज्यभर संघटनेच्या भवितव्यापासून ते शेट्टी यांच्या कार्यपद्धतीपर्यंत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. स्वत: शेट्टी यांनी या सर्वांमुळे आपण व्यथित झालो असल्याने आमदारकीची ब्याद नको अशी भूमिका जाहीर केली होती. यावरून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.शेट्टी यांनीच आमदारकी स्वीकारावी या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे अखेर शुक्रवारी रात्री शेट्टी यांच्यासमवेत जयसिंगपूर येथे श्रीवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी सर्व नेत्यांची बैठक झाली. तासभर चाललेल्या या बैठकीत झालेले गैरसमज दूर करून एकमताने शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, डॉ. महावीर अक्कोळे, पैलवान विठ्ठल मोरे, भाऊ साखरपे, जनार्दन पाटील, अजित पोवार, श्रीवर्धन पाटील उपस्थित होते.

राजकीय व्यवहार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार मी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेची आमदारकी स्वीकारणार आहे. एकमेकांसोबत झालेले किरकोळ गैरसमज दूर झाले आहेत. यावर सर्वांवर पडदा टाकला आहे. आता येथून पुढे एकदिलाने चळवळीत एकत्रितपणे काम करणार आहोत. सध्याच्या काळात वादापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याने त्यांना प्राधान्य आहे.- राजू शेट्टी,माजी खासदार, स्वाभिमानी

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर