शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

corona virus Kolhapur-लॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:21 IST

CoronVairus Kolhapur-जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओसगतवर्षीच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर- जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

शुक्रवारी दिवसभराची वाढलेली वर्दळ रात्री आठनंतर कमी व्हायला लागली. पोलीस आणि महानगरपालिकेची पथके रस्त्यावर उतरली तशी शहरातील दुकाने पटापट बंद व्हायला लागली. हातगाड्या, फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप चालक यांनी आपले व्यवसाय बंद केले. रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील सर्व रस्ते रिकामे झाले. निर्मनुष्य झाले.

शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, स्टेशनरोड, ताराबाई पार्क, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, बागल चौक, पार्वती चित्रमंदिर, उमा टॉकीज आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली. अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गतवर्षी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली होती. प्रसंगी काठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनची भीती कोल्हापूरकरांच्या मनात असल्याचे दिसून आले. रस्त्यावर फारसे पोलीस दिसले नाहीत. बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथे मोजकेच पोलीस दिसले. शहरातील अन्य चौकात मात्र पोलिसांविनाच ओस पडले होते.

गतवर्षीच्या आठवणींना उजाळा -

गतवर्षी २२ मार्च रोजी अचानक लॉकडाऊन पुकारला गेला. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. यावेळी मात्र पूर्वनियोजित लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांची तशी गैरसोय झाली नाही. आवश्यक सामानाची खरेदी करता आली. ओस पडलेले निर्मनुष्य रस्ते, स्मशान शांतता, रस्त्यावर भटक्या श्वानांची वर्दळ यामुळे गतवर्षीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमवारी सकाळी सात वाजता हा विकेंड लॉकडाऊन संपणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर