शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

corona virus Kolhapur-लॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:21 IST

CoronVairus Kolhapur-जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओसगतवर्षीच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर- जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

शुक्रवारी दिवसभराची वाढलेली वर्दळ रात्री आठनंतर कमी व्हायला लागली. पोलीस आणि महानगरपालिकेची पथके रस्त्यावर उतरली तशी शहरातील दुकाने पटापट बंद व्हायला लागली. हातगाड्या, फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप चालक यांनी आपले व्यवसाय बंद केले. रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील सर्व रस्ते रिकामे झाले. निर्मनुष्य झाले.

शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, स्टेशनरोड, ताराबाई पार्क, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, बागल चौक, पार्वती चित्रमंदिर, उमा टॉकीज आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली. अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गतवर्षी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली होती. प्रसंगी काठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनची भीती कोल्हापूरकरांच्या मनात असल्याचे दिसून आले. रस्त्यावर फारसे पोलीस दिसले नाहीत. बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथे मोजकेच पोलीस दिसले. शहरातील अन्य चौकात मात्र पोलिसांविनाच ओस पडले होते.

गतवर्षीच्या आठवणींना उजाळा -

गतवर्षी २२ मार्च रोजी अचानक लॉकडाऊन पुकारला गेला. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. यावेळी मात्र पूर्वनियोजित लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांची तशी गैरसोय झाली नाही. आवश्यक सामानाची खरेदी करता आली. ओस पडलेले निर्मनुष्य रस्ते, स्मशान शांतता, रस्त्यावर भटक्या श्वानांची वर्दळ यामुळे गतवर्षीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमवारी सकाळी सात वाजता हा विकेंड लॉकडाऊन संपणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर