शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

corona virus Kolhapur-लॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:21 IST

CoronVairus Kolhapur-जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओसगतवर्षीच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर- जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

शुक्रवारी दिवसभराची वाढलेली वर्दळ रात्री आठनंतर कमी व्हायला लागली. पोलीस आणि महानगरपालिकेची पथके रस्त्यावर उतरली तशी शहरातील दुकाने पटापट बंद व्हायला लागली. हातगाड्या, फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप चालक यांनी आपले व्यवसाय बंद केले. रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील सर्व रस्ते रिकामे झाले. निर्मनुष्य झाले.

शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, स्टेशनरोड, ताराबाई पार्क, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, बागल चौक, पार्वती चित्रमंदिर, उमा टॉकीज आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली. अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गतवर्षी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली होती. प्रसंगी काठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनची भीती कोल्हापूरकरांच्या मनात असल्याचे दिसून आले. रस्त्यावर फारसे पोलीस दिसले नाहीत. बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथे मोजकेच पोलीस दिसले. शहरातील अन्य चौकात मात्र पोलिसांविनाच ओस पडले होते.

गतवर्षीच्या आठवणींना उजाळा -

गतवर्षी २२ मार्च रोजी अचानक लॉकडाऊन पुकारला गेला. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. यावेळी मात्र पूर्वनियोजित लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांची तशी गैरसोय झाली नाही. आवश्यक सामानाची खरेदी करता आली. ओस पडलेले निर्मनुष्य रस्ते, स्मशान शांतता, रस्त्यावर भटक्या श्वानांची वर्दळ यामुळे गतवर्षीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमवारी सकाळी सात वाजता हा विकेंड लॉकडाऊन संपणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर