शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

सरकारविरोधात रस्त्यावर या; मी तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:07 IST

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊ

ठळक मुद्देव्यापारी, उद्योजकांशी संवाद; जानेवारीत व्यापारी, उद्योजकांच्या प्रश्नांवर मुंबईत बैठक घेणारटेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रम कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत

कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तुमची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यापारी-उद्योजकांना दिली.

टेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सतर्फे व्यापारी व उद्योजकांच्या ‘जीएसटी’सह विविध अडचणी व प्रश्नांंबाबतचे निवेदन उद्धव ठाकरे यांना दिले. यानंतर उद्योजक, व्यापाºयांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, व्यापारी व उद्योजकांनी आपल्याकडे मांडलेल्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करू; परंतु ‘जीएसटी’सह विविध प्रश्नांवर महाराष्टÑातील व्यापारी, उद्योजक गप्प का आहेत, असा प्रश्न पडतो. ते दबलेले असून आपल्या न्यायासाठी त्यांचे त्यांनाच उभे राहावे लागेल. त्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी ठेवल्यास मीही त्यांच्यासोबत राहीन. त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जानेवारी महिन्यात मुंबईत व्यापारी व उद्योजकांच्या प्रश्नांवर बैठक घेतली जाईल.चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून व्यापारी व उद्योजकांसाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जावेत.

उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, उद्योगासाठी विजेचे दर कमी करण्यासाठी सरकारकडे भूमिका मांडली जावी. कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर म्हणाले, शहरात दिल्लीसारखे ट्रॅफिक झाले असून यासाठी उड्डाणपूल होण्याची गरज आहे. तसेच वॉल मार्क कंपनीला शिवसेनेने बाजारात पाय ठेवू देऊ नये.

‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर-बंगलोर कॉरिडॉरला चालना मिळावी.गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरजितसिंह पोवार म्हणाले, उद्योगवाढीसाठी जागा उपलब्ध नसून ती उपलब्ध करून द्यावी. इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी म्हणाले, शेतीउपयोगी इलेक्ट्रिक साहित्यावरील ‘जीएसटी’चे दर कमी व्हावेत.

‘क्रीडाई’चे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी. केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले, ‘जीएसटी’मुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून औषधांचे दर वाढले आहेत.यावेळी संजय शेटे, गोरख माळी, जयेश ओसवाल, संदीप नष्टे, आदींसह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडेकेंद्र व राज्य सरकार नोटाबंदीसारखे मनमानी निर्णय घेऊन सर्वसामान्यांना कष्टाच्या पैशांसाठी रांगेत उभे करीत असेल, तसेच स्वत:च्या पैशासाठी बोटाला शाई लावून घ्यावी लागत असेल, तर ही वाटचाल हुकूमशाहीआणि कम्युनिझमकडेच सुरू असल्याचे म्हणावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.सरकार म्हणजे ‘नवसाचे पोर’सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे ? असा टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या, अशी कोटीही ठाकरे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण