शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नदी, नाले, धरणे तुडूंब; तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:11 IST

दुस-या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने नवी पेरणी आणि ऊसपिकासाठी पाण्याची गरज वाढू लागल्याने शेतकºयांनी धावाधाव सुरू केली. ‘महावितरण’कडून ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले तरी काम संपत नसल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.

ठळक मुद्देअपूर्ण वीजजोडण्यांमुळे पिकांची पाण्याअभावी होरपळ

कोल्हापूर : तब्बल साडेपाच महिने मुक्काम ठोकलेल्या पावसाने मुळातच पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत; पण पाणी उपसण्यासाठी आवश्यक विजेच्या जोडण्याच अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने पिकांची होरपळ होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने डबडबू लागले आहेत. आधीच खरीप वाया गेला. जे उरले ते परतीच्या पावसाने हिरावून नेले. रब्बी हंगाम साधावा म्हटले तरी पेरलेल्या पिकाला पाणी कशाने पाजायचे, असा प्रश्न शेतकºयांना छळत आहे.

‘महावितरण’कडे वारंवार पाठपुरावा करूनही ‘दुरुस्ती सुरू आहे,’ याच्यापलीकडे काहीही उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे.महापुरामुळे शेतीच्या जोडीने वीजपुरवठा करणा-या जोडण्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठमोठ्या ट्रान्सफॉर्मरसह विजेचे पोलही तुटून पडले. महापुरानंतर परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहिल्याने त्यांची दुरुस्तीही करणे शक्य झाले नाही. पिकांनाही पाण्याची गरज नसल्याने दुरुस्तीची कामे संथगतीने सुरू राहिली. दुस-या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने नवी पेरणी आणि ऊसपिकासाठी पाण्याची गरज वाढू लागल्याने शेतकºयांनी धावाधाव सुरू केली. ‘महावितरण’कडून ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले तरी काम संपत नसल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.

आता गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांसह कमी कालावधीतील भाजीपाला पिके घेण्यासाठी पेरणीची घाई सुरू आहे. शिवाय आडसाली ऊसलागण पूर्णपणे वाया गेल्याने पूर्वहंगामाचे शेवटचे दिवस साधण्यासह सुरू हंगामातील ऊसलागणीची तयारी सुरू आहे. या लागवडी आटोपण्याची घाई सुरू असताना लागणारे पाणी मात्र जवळच असतानाही ते विजेअभावी उपसता येत नाही, अशी परिस्थिती आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास रब्बीचा पेरा साधता येणार नाही. ऊसलागण हंगाम पुढे सरकण्याच्या चिंतेने शेतकºयाच्या वीज कार्यालयाकडील चकरा वाढल्या आहेत. बºयाच ठिकाणी वीजजोडण्यांचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. एकीकडे जोडत गेले तरी दुसरीकडे नादुरुस्तीच्या तक्रारी येत असल्याने यंत्रणा पुन्हा अडकून पडत आहे. शेतकºयांचा दिवस वीजजोडण्या करून घेण्यातच जात आहे. मग त्यासाठी स्वत:च्या खिशातून खर्चही करावा लागत आहे. सर्व्हिस वायरपासून ते फ्युज आणण्यापर्यंतची धावपळ शेतकºयांनाच करावी लागत आहे.अजून ४०२ ट्रान्सफॉर्मर व २६६२ पोलची जोडणी अपूर्णमहापूर काळात १७७१ ट्रान्सफॉर्मर, ६६३८ पोल नादुरुस्त झाले होते. त्यामुळे ६७ हजार ७६९ शेतकºयांचा वीज पुरवठा बंद झाला होता. आतापर्यंत १३६९ ट्रान्सफॉर्मर, ३९७६ पोल नव्याने जोडून तयार ठेवले आहेत. अजून ८ हजार ४९ शेतकºयांना वीज जोडणी करणारे ४०२ ट्रान्सफॉर्मर, २६६२ पोल जोडण्याचे काम अपूर्ण आहे. या आठवडाभरात उर्वरीत काम पूर्ण होईल, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.अडीच हजार कर्मचा-यांच्या कष्टांचे चीजशेतीला वीजपुरवठा करणाºया यंत्रणेला महापूरकाळात जोरदार फटका बसला. दुरुस्ती करायची म्हटली तरी दलदलीमुळे पोहोचणे शक्य नव्हते. तरीदेखील ‘महावितरण’च्या जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार कर्मचाºयांनी अविरत कष्ट घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी