शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नदी, नाले, धरणे तुडूंब; तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:11 IST

दुस-या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने नवी पेरणी आणि ऊसपिकासाठी पाण्याची गरज वाढू लागल्याने शेतकºयांनी धावाधाव सुरू केली. ‘महावितरण’कडून ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले तरी काम संपत नसल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.

ठळक मुद्देअपूर्ण वीजजोडण्यांमुळे पिकांची पाण्याअभावी होरपळ

कोल्हापूर : तब्बल साडेपाच महिने मुक्काम ठोकलेल्या पावसाने मुळातच पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत; पण पाणी उपसण्यासाठी आवश्यक विजेच्या जोडण्याच अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने पिकांची होरपळ होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने डबडबू लागले आहेत. आधीच खरीप वाया गेला. जे उरले ते परतीच्या पावसाने हिरावून नेले. रब्बी हंगाम साधावा म्हटले तरी पेरलेल्या पिकाला पाणी कशाने पाजायचे, असा प्रश्न शेतकºयांना छळत आहे.

‘महावितरण’कडे वारंवार पाठपुरावा करूनही ‘दुरुस्ती सुरू आहे,’ याच्यापलीकडे काहीही उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे.महापुरामुळे शेतीच्या जोडीने वीजपुरवठा करणा-या जोडण्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठमोठ्या ट्रान्सफॉर्मरसह विजेचे पोलही तुटून पडले. महापुरानंतर परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहिल्याने त्यांची दुरुस्तीही करणे शक्य झाले नाही. पिकांनाही पाण्याची गरज नसल्याने दुरुस्तीची कामे संथगतीने सुरू राहिली. दुस-या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने नवी पेरणी आणि ऊसपिकासाठी पाण्याची गरज वाढू लागल्याने शेतकºयांनी धावाधाव सुरू केली. ‘महावितरण’कडून ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले तरी काम संपत नसल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.

आता गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांसह कमी कालावधीतील भाजीपाला पिके घेण्यासाठी पेरणीची घाई सुरू आहे. शिवाय आडसाली ऊसलागण पूर्णपणे वाया गेल्याने पूर्वहंगामाचे शेवटचे दिवस साधण्यासह सुरू हंगामातील ऊसलागणीची तयारी सुरू आहे. या लागवडी आटोपण्याची घाई सुरू असताना लागणारे पाणी मात्र जवळच असतानाही ते विजेअभावी उपसता येत नाही, अशी परिस्थिती आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास रब्बीचा पेरा साधता येणार नाही. ऊसलागण हंगाम पुढे सरकण्याच्या चिंतेने शेतकºयाच्या वीज कार्यालयाकडील चकरा वाढल्या आहेत. बºयाच ठिकाणी वीजजोडण्यांचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. एकीकडे जोडत गेले तरी दुसरीकडे नादुरुस्तीच्या तक्रारी येत असल्याने यंत्रणा पुन्हा अडकून पडत आहे. शेतकºयांचा दिवस वीजजोडण्या करून घेण्यातच जात आहे. मग त्यासाठी स्वत:च्या खिशातून खर्चही करावा लागत आहे. सर्व्हिस वायरपासून ते फ्युज आणण्यापर्यंतची धावपळ शेतकºयांनाच करावी लागत आहे.अजून ४०२ ट्रान्सफॉर्मर व २६६२ पोलची जोडणी अपूर्णमहापूर काळात १७७१ ट्रान्सफॉर्मर, ६६३८ पोल नादुरुस्त झाले होते. त्यामुळे ६७ हजार ७६९ शेतकºयांचा वीज पुरवठा बंद झाला होता. आतापर्यंत १३६९ ट्रान्सफॉर्मर, ३९७६ पोल नव्याने जोडून तयार ठेवले आहेत. अजून ८ हजार ४९ शेतकºयांना वीज जोडणी करणारे ४०२ ट्रान्सफॉर्मर, २६६२ पोल जोडण्याचे काम अपूर्ण आहे. या आठवडाभरात उर्वरीत काम पूर्ण होईल, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.अडीच हजार कर्मचा-यांच्या कष्टांचे चीजशेतीला वीजपुरवठा करणाºया यंत्रणेला महापूरकाळात जोरदार फटका बसला. दुरुस्ती करायची म्हटली तरी दलदलीमुळे पोहोचणे शक्य नव्हते. तरीदेखील ‘महावितरण’च्या जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार कर्मचाºयांनी अविरत कष्ट घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी