शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नदी उशाला, तरीही भटकंती चारी दिशांना

By admin | Updated: December 22, 2015 00:58 IST

ग्रामस्थांची पळापळ : प्रदूषण कमी करण्याऐवजी दुसरीकडून पाणी आणण्यास प्राधान्य -पंचगंगा काढ मरणाची वाट

अतुल आंबी - इचलकरंजी -गेली कित्येक वर्षे पंचगंगा नदीकाठ व परिसरातील अनेक गावे पंचगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरत होती. मात्र, प्रदूषणामुळे ही गावे आता कृष्णा, दूधगंगा, वारणा अशा अन्य नद्यांतून पाणी योजना आणण्यासाठी धावाधाव करीत आहेत. शासनही अशा योजनांसाठी करोडो रुपये निधी देत असून, पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. अन्य नद्यांमधून पिण्यासाठी आणलेले हे पाणी सांडपाण्याच्या रूपाने पुन्हा पंचगंगा नदीमध्येच सोडले जात असल्याने भविष्यात पंचगंगा नदी एक मोठा नाला बनून राहील काय? अशी भीती व्यक्त होत आहे.पंचगंगा नदी ज्या-ज्या गावांमधून गेली आहे, त्या गावांबरोबरच परिसरातील काही किलोमीटर अंतरावर असणारी गावेही पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाणी वापरत होती. या गावांनी संयुक्तपणे योजना राबवून पिण्यासाठी पाणी नेले होते. मात्र, नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याने अशा पाणीपुरवढा योजना बंद पडल्या. त्या सुरू करण्याऐवजी या गावांनी पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी २०-२५ किलोमीटर दूर असलेल्या अन्य नद्यांमधून पाणी आणण्याचे नियोजन केले. अनेक गावांनी करोडो रुपयांच्या विविध योजनांच्या माध्यमातून कृष्णा, दूधगंगा, वारणा या नद्यांमधून पाणी आणले आहे. काही गावांचे प्रस्ताव तयार असून, त्यांचेही नियोजन सुरू आहे.पाणी योजनांत त्रुटीअनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी अन्य नद्यांमधून योजना राबवून पाणी आणले असले तरी अनेक त्रुटी व कारणांमुळे कित्येक वेळा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. चार-आठ दिवस गावाला पाणी मिळत नाही आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची सवय मोडल्यामुळे अशावेळी ‘नदी उशाला कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे गावांना अनुभव येताना दिसत आहे.रुकडी (ता. हातकणंगले) या गावाला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो, तर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणीच येत नाही. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे असे घडते. तसेच दूषित पाण्यामुळे अतिसार, उलटी, टायफॉईड, कॉलरा या प्रमुख आजारांसह पोटाच्या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.- डॉ. राजकुमार पाटीलपंचगंगा नदीवरील बंद पडलेल्या योजनारुई येथील बंधाऱ्यावरून चौदा गावांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. यामध्ये तारदाळ, आळते, यड्राव, कोरोची, कबनूर, साजणी, तिळवणी, खोतवाडी, मजले, हातकणंगले या गावांचा समावेश होता.नदीपलीकडे पाच गावांची पाणीपुरवठा योजना होती. त्यामध्ये पट्टणकोडोली, तळसंदे, यळगूड, रेंदाळ, हुपरी गावांचा समावेश होता.याशिवाय नदीकाठच्या अनेक गावांनी ग्रामपंचायत स्तरावर थेट पंचगंगा नदीतून उपसा करून पाणीपुरवठा योजना राबविल्या होत्या. त्यापैकी बहुतांश बंद पडल्या असून, काही ऐनवेळची सोय म्हणून वापरल्या जात आहेत. या गावांनी वारणा व दूधगंगेतून आणले पाणीयड्राव, तारदाळ, हातकणंगले, आळते, कोरोची, खोतवाडी, मजले, टाकवडे, हुपरी, रेंदाळ, तामगाव, वसगडे, उचगाव, गडमुडशिंगी, कुरुंदवाड, हेरवाड, शिरोळ, कोंडिग्रे, जांभळी अशा अनेक गावांनी वारणा, कृष्णा व दूधगंगा या नद्यांमधून पिण्यासाठी पाणी आणले आहे.