शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

नदी उशाला, तरीही भटकंती चारी दिशांना

By admin | Updated: December 22, 2015 00:58 IST

ग्रामस्थांची पळापळ : प्रदूषण कमी करण्याऐवजी दुसरीकडून पाणी आणण्यास प्राधान्य -पंचगंगा काढ मरणाची वाट

अतुल आंबी - इचलकरंजी -गेली कित्येक वर्षे पंचगंगा नदीकाठ व परिसरातील अनेक गावे पंचगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरत होती. मात्र, प्रदूषणामुळे ही गावे आता कृष्णा, दूधगंगा, वारणा अशा अन्य नद्यांतून पाणी योजना आणण्यासाठी धावाधाव करीत आहेत. शासनही अशा योजनांसाठी करोडो रुपये निधी देत असून, पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. अन्य नद्यांमधून पिण्यासाठी आणलेले हे पाणी सांडपाण्याच्या रूपाने पुन्हा पंचगंगा नदीमध्येच सोडले जात असल्याने भविष्यात पंचगंगा नदी एक मोठा नाला बनून राहील काय? अशी भीती व्यक्त होत आहे.पंचगंगा नदी ज्या-ज्या गावांमधून गेली आहे, त्या गावांबरोबरच परिसरातील काही किलोमीटर अंतरावर असणारी गावेही पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाणी वापरत होती. या गावांनी संयुक्तपणे योजना राबवून पिण्यासाठी पाणी नेले होते. मात्र, नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याने अशा पाणीपुरवढा योजना बंद पडल्या. त्या सुरू करण्याऐवजी या गावांनी पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी २०-२५ किलोमीटर दूर असलेल्या अन्य नद्यांमधून पाणी आणण्याचे नियोजन केले. अनेक गावांनी करोडो रुपयांच्या विविध योजनांच्या माध्यमातून कृष्णा, दूधगंगा, वारणा या नद्यांमधून पाणी आणले आहे. काही गावांचे प्रस्ताव तयार असून, त्यांचेही नियोजन सुरू आहे.पाणी योजनांत त्रुटीअनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी अन्य नद्यांमधून योजना राबवून पाणी आणले असले तरी अनेक त्रुटी व कारणांमुळे कित्येक वेळा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. चार-आठ दिवस गावाला पाणी मिळत नाही आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची सवय मोडल्यामुळे अशावेळी ‘नदी उशाला कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे गावांना अनुभव येताना दिसत आहे.रुकडी (ता. हातकणंगले) या गावाला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो, तर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणीच येत नाही. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे असे घडते. तसेच दूषित पाण्यामुळे अतिसार, उलटी, टायफॉईड, कॉलरा या प्रमुख आजारांसह पोटाच्या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.- डॉ. राजकुमार पाटीलपंचगंगा नदीवरील बंद पडलेल्या योजनारुई येथील बंधाऱ्यावरून चौदा गावांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. यामध्ये तारदाळ, आळते, यड्राव, कोरोची, कबनूर, साजणी, तिळवणी, खोतवाडी, मजले, हातकणंगले या गावांचा समावेश होता.नदीपलीकडे पाच गावांची पाणीपुरवठा योजना होती. त्यामध्ये पट्टणकोडोली, तळसंदे, यळगूड, रेंदाळ, हुपरी गावांचा समावेश होता.याशिवाय नदीकाठच्या अनेक गावांनी ग्रामपंचायत स्तरावर थेट पंचगंगा नदीतून उपसा करून पाणीपुरवठा योजना राबविल्या होत्या. त्यापैकी बहुतांश बंद पडल्या असून, काही ऐनवेळची सोय म्हणून वापरल्या जात आहेत. या गावांनी वारणा व दूधगंगेतून आणले पाणीयड्राव, तारदाळ, हातकणंगले, आळते, कोरोची, खोतवाडी, मजले, टाकवडे, हुपरी, रेंदाळ, तामगाव, वसगडे, उचगाव, गडमुडशिंगी, कुरुंदवाड, हेरवाड, शिरोळ, कोंडिग्रे, जांभळी अशा अनेक गावांनी वारणा, कृष्णा व दूधगंगा या नद्यांमधून पिण्यासाठी पाणी आणले आहे.