शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

‘जनस्वास्थ्य दक्षता समिती’ची झेप

By admin | Updated: March 7, 2016 00:36 IST

राज्यभर विस्तार : लोकांचे स्वास्थ्य जपणारी संस्था, आरोग्य, पर्यावरणावर जिल्ह्यात मोठी चळवळ

प्रदीप शिंदे-- कोल्हापूर -‘केल्याने होत आहे रे...’ या उक्तीनुसार रंजलेले-गांजलेले, दु:खी-कष्टी, दुबळ्या लोकांना स्वत:कडून मदत तसेच युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ‘जनस्वास्थ्य दक्षता समिती’ने कोल्हापूर जिल्ह्यात मोठे योगदान दिले आहे. समितीची ही चळवळ आता जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रभर विस्तार वाढत आहे. कुष्ठरोग्यांची सेवा हे माझ्या जीवनातील राहिलेले अपुरे कार्य आहे, असे महात्मा गांधी म्हणत. त्यांचे हेच कार्य पूर्ण करण्यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीचे प्रमुख दीपक देवलापूरकर यांनी शारीरिक व मानसिक अपंगत्वाने त्रस्त झालेल्या कुष्ठरुग्णांचे वैद्यकीय व सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या हेतूने १९८३ पासून ‘स्वाधारनगर’ कुष्ठ वसाहतीत मदतकार्यास सुरुवात केली. स्वावलंबी गृहनिर्माण योजना, अल्पइंधन चुली, वृक्षारोपण, वसाहतीमध्ये रस्ते, वीज, पाणी, शौचालय, इत्यादी सुविधा मिळवून देणे, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी दुग्धव्यवसाय, शिलाई, सायकल दुरुस्ती, किराणा दुकान, कुक्कुटपालन व शेळीपालन अशा निरनिराळ्या व्यवसायांसाठी मदत करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून पुढे कुष्ठपीडितांमधून साक्षी महिला विकास संस्था स्थापन झाली. कुष्ठपीडितांच्या मुलांना या माध्यमातून शैक्षणिक मदत व कुष्ठपीडितांचे पुनवर्सन केले जाते. वाढती लोकसंख्या, परिणामी निसर्गाचा वाढता ऱ्हास, पाणी यांचे प्रदूषण तसेच पोलिओ, पक्षाघात, अंधत्व, मतिमंदत्व, वृद्धत्व असे अनेक गंभीर प्रश्न हे प्रामुख्याने समाजामध्ये असणारे गैरसमज, अंधश्रद्धा, अज्ञान बेपर्वाईतून निर्माण झाले आहेत. हे प्रश्न वेळीच सोडविण्याचा प्रयत्न केला नाही तर समाजापुढे पर्यायाने देशामध्ये स्वास्थ्याबाबत गंभीर परिणाम होऊन शकतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी १९९४ मध्ये ‘जनस्वास्थ्य दक्षता समिती’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले. कोणत्याही अपेक्षेची किंवा कोणत्याही अनुदानाची वाट न पाहता आरोग्य व पर्यावरण या विषयांवर त्यांच्यातर्फे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी चळवळ उभी करण्यात आली आहे. व्यसनामुळे संपूर्ण तरुण पिढी आणि समाजजीवन उद्ध्वस्त होत असल्यामुळे गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारू या व्यसनांविरोधी युवा पिढी चळवळ जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने सातत्याने राबविण्यात आली. त्यांचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याचा एक भाग म्हणून १९९६ मध्ये एका गुटखा कंपनीने दहीहंडी कार्यक्रम प्रायोजित केला होता. यावेळी दहीहंडी कार्यक्रमावेळी आरोग्य दिंडी काढून त्याला विरोध केला. या आरोग्य दिंडीत शेकडो युवकांनी सहभाग नोंदविला. याची दखल घेऊन संबंधित कंपनीने आपले प्रायोजकत्व मागे घेतले. त्यामुळे त्यानंतर येणारा गणेशोत्सवदेखील सर्व प्रकारच्या व्यसनांच्या जाहिरातींपासून मुक्त झाला.या यशानंतर काही उपाहारगृहे व हॉटेलमध्ये धूम्रपान केले जाते. त्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने छापे टाकण्यात आले व धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध व हॉटेल, उपाहारगृह चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाही करण्यात आली. एस. टी. बसस्थानक परिसर, गर्दीच्या ठिकाणी गुटखा व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तींना समितीतर्फे गुलाबपुष्प देऊन, त्यांचा सत्कार करून त्यांना असे पदार्थ आरोग्यास किती अपायकारक आहेत याचे माहितीपत्र भेट म्हणून देण्यात येत होते. अशा अपमानस्पद अभिनव आंदोलनामुळे अनेकजणांनी रस्त्यांवर थुंकणे सोडून दिले. अनेकजण संस्थेला वैयक्तिकरीत्या भेटून तसेच फोन करून या उपक्रमात सहभागी झाले.शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत भेट देऊन त्यांनी व्यसनविरोधी जनजागृती करण्यास सुरुवात केली. २६ जून या अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त दरवर्षी व्यसनवीर राक्षसाचे दहन करण्याचा उपक्रम करण्यात आला. यासह दरवर्षी १ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान जनस्वास्थ सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आठ दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ७ जानेवारी रोजी एकाच वेळी जिल्ह्यातील ८०० शाळांतील किमान दोन लाख विद्यार्थी आपल्या शाळा परिसरात मानवी साखळी करतात. याचसोबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांच्या दारूबंदीला संस्थेच्या वतीने चालना देण्यात आली. याबाबत व्यसनाधीन व्यक्तींना संस्थेतर्फे समुपदेशनही करण्यात येते. मद्यमुक्तीसाठी संस्थेत अल्कोहोलिक अनॅनिमसच्या बैठकाही घेतल्या जातात. या उपक्रमासोबत संस्थेच्या वतीने कचरा व्यवस्थापन कसे करावे याची माहितीपत्रके वाटण्यात आली. दररोज एक किलोमीटर इंधन वाचले तरी प्रदूषण कमी होईल, अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सुरेश शिपूरकर, डॉ. सुभाष आठले, डॉ. वैशाली नानिवडेकर, शामराव कांबळे, अजय अकोळकर, डी. जे. ठिपकुर्ले, दीपा शिपूरकर, आर. वाय. पाटील, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, व्ही. बी. चौगुले, ओंकार पाटील, पूजा गुरव, अलका देवलापूरकर, मीनार देवलापूरकर, सीमा गावडे, करिश्मा चिरमुरे, प्रशांत पाटील, आदी प्रमुख व्यक्ती कार्यरत आहेत. अंघोळ, कपडे धुणे तसेच इतर कारणांसाठी वापरण्यात आलेले पाणी सांडपाण्याच्या गटारी अथवा ड्रेनेजमध्ये न सोडता ते शोषखड्ड्यात सोडले जाते. गरजेनुसार त्याचा वापर बागेतील फूलझाडांसाठी केला जातो. यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. घरगुती कचरा व्यवस्थापनापासून खतनिर्मिती, टेरेसवर भाजीपाला लागवड, पक्ष्यांची घरटी असे उपक्रम त्यांनी आपल्या घरी केले आहेत. त्यांचा हा उपक्रम पाहण्यासाठी अनेक महाविद्यालये, शाळेतील विद्यार्थी येतात.आपल्यापासूनच सुरुवातदीपक देवलापूरकर यांनी पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वत:पासूनच केली. इको-फ्रेंडली हाऊस तयार करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या घरी ‘पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर’ करण्याचा संकल्प केला. निसर्गस्रोतातून मिळणारे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करायचा या हेतूने बांधकामाची रचना केली. पावसाळ्यात घराच्या छतावर पडणारे पाणी चेंबरमध्ये एकत्र करून नलिकेच्या साहाय्याने जमिनीखाली बांधलेल्या टाकीत साठविले. या पाण्याचा वापर देवलापूरकर कुटुंबीय वर्षभर स्वयंपाकासाठी व पिण्यासाठी करतात.