शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील दंगल; इतिहास संशोधक सावंत यांचा गंभीर आरोप

By भीमगोंड देसाई | Updated: July 22, 2024 14:12 IST

राजकीय हेतूने प्रेरित होऊन कृत्य, अभ्यास करून नियोजन

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील मुसलमानवाडीतील दंगल, हिंसाचार केला आहे, असा गंभीर आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. दंगल करणारे शिवभक्त नव्हेत, तर प्रशिक्षित दंगलखोर होते. त्यांना कोणीतरी मार्गदर्शक असेल. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेदरकार, निर्घृणपणे तोडफोड केली. धार्मिक स्थळांवर हल्ला चढवला. त्यांनी पोलिसांसमोरच हातात तलवारी, चाकू घेऊन प्रचंड दहशत माजवून लहान मुले, महिलांना जंगलात पळवून लावले. यामुळे पोलिस आता खऱ्या दंगलखोरांना पकडणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विषयात झालेल्या हिंसाचारानंतर राज्यभर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे गडप्रेमी, इतिहास अभ्यासक सावंत यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यावेळी ते अतिशय निर्भीडपणे आपली मते मांडली. निरीक्षण नोंदवले. विशाळगडावरील अतिक्रमण निघालेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्न : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा विषय अचानक आला का ?सावंत : माझ्यासारखे अनेक शिवप्रेमी गेल्या २० ते २५ वर्षांपासून विशाळगडावरील अतिक्रमण काढा, अशी मागणी प्रशासनाकडे करीत होते. दोन वर्षांपूर्वी संभाजी छत्रपती आणि गडप्रेमींनी विशाळगडाला भेट देऊन आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अतिक्रमणे निश्चित केली. ती काढण्यासाठी निविदा निघाली. अचानक हा विषय थांबला. हिंदू, मुस्लिम समाजांतील काही लोक न्यायालयात गेले. प्रशासन हा विषय न्यायालयात आहे, असे सांगत राहिले. दरम्यान, अचानकपणे कोणाला तरी वाटले म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली. गडावरील आणि पायथ्याचे अतिक्रमण काढण्याऐवजी अतिक्रमण नसलेले, नियमांनुसार बांधलेल्या मुसलमानवाडीतील घरांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला केला. तोडफोड केली. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय हेतूने हे टाइमिंग साधले आहे.

प्रश्न : प्रशासन, पोलिस गाफील राहिले का ?सावंत : विशाळगड अतिक्रमण मोहीम होणार असल्याचे जाहीरपणे माध्यमातून आधी आले होते. संभाजीराजे तर वाजत-गाजत, हलगी, घुमक्याच्या गजरात गडावर गेले. हे सर्व पोलिस पाहात होते. तरीही त्यांनी पुरेशा प्रमाणात खबरदारी घेतली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनीही मोहिमेत अपप्रवृत्ती घुसू नये, म्हणून विशेष काळजी घेतली नसल्याचे दिसते. अतिक्रमण काढण्यासाठी कोणाचाही विरोध नव्हता. मात्र, दंगलखोरांनी मोकाटपणे मुसलमानवाडीत हिंसाचार केला. प्रचंड नासधूस केली. पोलिसांना अजून खरे दंगलखोर सापडलेले नाहीत. काही संबंध नसताना अटक झालेल्या शिवभक्तांच्या पाठीशी आता नेतृत्वही राहिलेले नाही, ही खरी शोकांतिका आहे.

प्रश्न : विशाळगडावरील अतिक्रमणास जबाबदार कोण ?सावंत : विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणास राज्य पुरातत्त्व विभाग, सांस्कृतिक मंत्री, तहसीलदार, प्रांताधिकारी, तर पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणास वनविभाग जबाबदार आहे. यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष अतिक्रमण होताना बघ्याची भूमिका घेतली. परिणामी गडाचे पावित्र्य नष्ट झाले आहे. तिथे कोंबड्या, बकरी कापून अनावश्यक भाग उघड्यावर टाकला जात आहे. कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही. म्हणून तिथे जाणारा शिवप्रेमी विषण्ण होतो. केवळ विशाळगडासह पन्हाळगड, प्रतापगड अशा सर्वच गडावर अतिक्रमण आहे. राजकारणासाठी आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केवळ विशाळगडावरचेच नव्हे तर सर्वच गडांवरील अतिक्रमण निघाले पाहिजे.

संचारबंदीचा फटका ट्रेकरनाहीपन्हाळा ते विशाळगड, पावनखिंड असा ट्रेक या हंगामात जगभरातील शिवप्रेमी, निसर्ग अभ्यासक करतात. दंगलीमुळे पोलिसांनी संचारबंदी केली आहे. ट्रेकरना ट्रेकिंग करता येत नाही. त्यांनाही दंगलीचा फटका बसला आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर