शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील दंगल; इतिहास संशोधक सावंत यांचा गंभीर आरोप

By भीमगोंड देसाई | Updated: July 22, 2024 14:12 IST

राजकीय हेतूने प्रेरित होऊन कृत्य, अभ्यास करून नियोजन

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील मुसलमानवाडीतील दंगल, हिंसाचार केला आहे, असा गंभीर आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. दंगल करणारे शिवभक्त नव्हेत, तर प्रशिक्षित दंगलखोर होते. त्यांना कोणीतरी मार्गदर्शक असेल. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेदरकार, निर्घृणपणे तोडफोड केली. धार्मिक स्थळांवर हल्ला चढवला. त्यांनी पोलिसांसमोरच हातात तलवारी, चाकू घेऊन प्रचंड दहशत माजवून लहान मुले, महिलांना जंगलात पळवून लावले. यामुळे पोलिस आता खऱ्या दंगलखोरांना पकडणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विषयात झालेल्या हिंसाचारानंतर राज्यभर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे गडप्रेमी, इतिहास अभ्यासक सावंत यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यावेळी ते अतिशय निर्भीडपणे आपली मते मांडली. निरीक्षण नोंदवले. विशाळगडावरील अतिक्रमण निघालेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्न : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा विषय अचानक आला का ?सावंत : माझ्यासारखे अनेक शिवप्रेमी गेल्या २० ते २५ वर्षांपासून विशाळगडावरील अतिक्रमण काढा, अशी मागणी प्रशासनाकडे करीत होते. दोन वर्षांपूर्वी संभाजी छत्रपती आणि गडप्रेमींनी विशाळगडाला भेट देऊन आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अतिक्रमणे निश्चित केली. ती काढण्यासाठी निविदा निघाली. अचानक हा विषय थांबला. हिंदू, मुस्लिम समाजांतील काही लोक न्यायालयात गेले. प्रशासन हा विषय न्यायालयात आहे, असे सांगत राहिले. दरम्यान, अचानकपणे कोणाला तरी वाटले म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली. गडावरील आणि पायथ्याचे अतिक्रमण काढण्याऐवजी अतिक्रमण नसलेले, नियमांनुसार बांधलेल्या मुसलमानवाडीतील घरांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला केला. तोडफोड केली. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय हेतूने हे टाइमिंग साधले आहे.

प्रश्न : प्रशासन, पोलिस गाफील राहिले का ?सावंत : विशाळगड अतिक्रमण मोहीम होणार असल्याचे जाहीरपणे माध्यमातून आधी आले होते. संभाजीराजे तर वाजत-गाजत, हलगी, घुमक्याच्या गजरात गडावर गेले. हे सर्व पोलिस पाहात होते. तरीही त्यांनी पुरेशा प्रमाणात खबरदारी घेतली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनीही मोहिमेत अपप्रवृत्ती घुसू नये, म्हणून विशेष काळजी घेतली नसल्याचे दिसते. अतिक्रमण काढण्यासाठी कोणाचाही विरोध नव्हता. मात्र, दंगलखोरांनी मोकाटपणे मुसलमानवाडीत हिंसाचार केला. प्रचंड नासधूस केली. पोलिसांना अजून खरे दंगलखोर सापडलेले नाहीत. काही संबंध नसताना अटक झालेल्या शिवभक्तांच्या पाठीशी आता नेतृत्वही राहिलेले नाही, ही खरी शोकांतिका आहे.

प्रश्न : विशाळगडावरील अतिक्रमणास जबाबदार कोण ?सावंत : विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणास राज्य पुरातत्त्व विभाग, सांस्कृतिक मंत्री, तहसीलदार, प्रांताधिकारी, तर पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणास वनविभाग जबाबदार आहे. यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष अतिक्रमण होताना बघ्याची भूमिका घेतली. परिणामी गडाचे पावित्र्य नष्ट झाले आहे. तिथे कोंबड्या, बकरी कापून अनावश्यक भाग उघड्यावर टाकला जात आहे. कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही. म्हणून तिथे जाणारा शिवप्रेमी विषण्ण होतो. केवळ विशाळगडासह पन्हाळगड, प्रतापगड अशा सर्वच गडावर अतिक्रमण आहे. राजकारणासाठी आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केवळ विशाळगडावरचेच नव्हे तर सर्वच गडांवरील अतिक्रमण निघाले पाहिजे.

संचारबंदीचा फटका ट्रेकरनाहीपन्हाळा ते विशाळगड, पावनखिंड असा ट्रेक या हंगामात जगभरातील शिवप्रेमी, निसर्ग अभ्यासक करतात. दंगलीमुळे पोलिसांनी संचारबंदी केली आहे. ट्रेकरना ट्रेकिंग करता येत नाही. त्यांनाही दंगलीचा फटका बसला आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर