शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

रंकाळ्याला पुन्हा भगदाड

By admin | Updated: May 13, 2014 17:25 IST

प्रशासनाची डोळेझाक : पश्चिमेकडील तटबंदी ८० फुटांपर्यंत कोसळण्याच्या मार्गावर

कोल्हापूर : शहराचे भूषण असलेल्या रंकाळा तलावाचे दुर्दैव काही संपता संपत नाही. तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या कोसळलेल्या तटबंदी दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असतानाच आज पहाटे तटबंदीचा आणखी एक भाग कोसळला. महानगरपालिका प्रशासनाने वेळीच काही ठोस उपाययोजना राबविल्या नाहीत, तर मात्र रंकाळा उद्यानाकडील साधारण सत्तर ते ऐंशी फुटापर्यंतची तटबंदी पाण्यात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळा तलावास बसत आहे. शालीनी पॅलेससमोरील रंकाळा उद्यान परिसरात तलावाच्या तटबंदीचा पाण्याच्या आतील भाग कोसळल्याचे आज पहाटे फिरायला येणार्‍या नागरिकांना दिसला. साधारण दहा फूट अंतराचा भाग कोसळलेला आहे. तलावाच्या आतील बाजूच्या तटबंदीमधील दोन दगडांना सांधून ठेवणार्‍या सिमेंटचा दर्जा खराब झाल्याने तटबंदीचे दगड कोसळल्याचे दिसते. कोसळलेला भाग अर्धा पाण्यात, तर अर्धा भाग पाण्याच्या वरचा आहे. तटबंदीचे दगड कोसळल्यामुळे वरील बाजू केव्हाही कोसळू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शालीनी पॅलेस ते नवनाथ मंदिर या परिसरातील तटबंदीच्या मजबुतीकरणाचे काम करण्यात आले आहे. परंतु साधारणपणे सत्तर ते एेंशी फूट अंतराचे काम शिल्लक राहिले आहे. जेथे मजबुतीकरणाचे काम झाले नाही, तेथेच तटबंदीचे दगड कोसळले आहेत. विशेष म्हणजे ही संपूर्ण तटबंदी धोकादायक बनली आहे. कारण उद्यानातील बाजूने तटबंदीचा भाग दीड ते दोन फुटांनी खचलेला आहे. वरील बाजूने तटबंदी वेडीवाकडी झाली आहे. कोणत्याही क्षणी ही तटबंदी कोसळू शकते इतकी भुसभुशीत झाली आहे. दगड एकमेकांपासून सुटत आहेत. सध्या सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने उद्यानात फिरायला येत आहेत. तटबंदीच्या बाजूने पर्यटक पायी चालत फिरत असतात. अशा धोकादायक तटबंदीवर लोक बसलेलेही असतात. त्यामुळे दिवसा पर्यटकांच्या वर्दळीवेळी जर तलावाच्या तटबंदीचा भाग कोसळला, तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. पहिले भगदाड बुजविण्याचे काम संथगतीने सहा महिन्यांपूर्वी तलावाच्या तटबंदीचा एक भाग कोसळला होता. त्या कोसळलेल्या भागात सिमेंट कॉँक्रीटच्या साहाय्याने बीम टाकून तटबंदीच्या वरील भागाला आधार दिला आहे. परंतु पाण्याकडील भाग अद्याप दुरूस्त केलेला नाही. हे काम कासवगतीने सुरू आहे. या तटबंदीचे काम अपूर्ण असतानाच आज त्याच कोसळलेल्या भागापासून पन्नास फुटांवर पुन्हा काही भाग कोसळला. त्यामुळे ही संपूर्ण तटबंदीच धोकादायक बनली आहे. बॅरिकेटस्ची आवश्यकता शालीनी पॅलेस समोरील उद्यानातील साधारण सत्तर ते ऐंशी फूट अंतरातील तलावाची तटबंदी खचल्याने कोणत्याही क्षणी ती कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशी दुर्घटना टाळायची असेल, तर तटबंदीच्या बाजूने जाण्यापासून पर्यटकांना मज्जाव करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता त्या परिसरात तातडीने बॅरिकेटस् उभारण्याची गरज आहे. तटबंदी नव्यानेच बांधावी तलावाच्या कोसळलेल्या तटबंदीचा भाग सिमेंटचे बीम उभारून दुरूस्त करण्यापेक्षा ही तटबंदी पूर्णपणे उतरून घेऊन नव्याने बांधण्याची आवश्यकता आहे. हे काम जरी खर्चिक आणि मोठे असले तरी तातडीने ते केले तरच रंकाळा तलावाच्या तटबंदीचे संवर्धन होऊ शकेल. अन्यथा एक एक करीत सर्वच तटबंदी जलमय होऊन रंकाळा तलाव आणखी विदु्रप होईल. अधिकार्‍यांची अनास्था रंकाळा तलावाच्या तटबंदीचा काही भाग पुन्हा नव्याने कोसळलेला असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांना नागरिकांनी कळविली. पण नेहमीप्रमाणे अधिकार्‍यांनी या घटनेच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केले. इतकी मोठी घटना घडूनही आज कोणीही अधिकारी तलावाकडे फिरकला नाही. ‘लोकमत’ने याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उद्या जाऊन पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.