शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांना मताचा अधिकार निर्णायक : अधिकार वापरू शकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:09 IST

राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गावपातळीवरील सरपंचपद थेठ जनतेतून निवडण्याचा कायदा लागू केल्यावर ग्रामीण भागातील काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली होती.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संभ्रमावस्था दूर

राधानगरी : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गावपातळीवरील सरपंचपद थेठ जनतेतून निवडण्याचा कायदा लागू केल्यावर ग्रामीण भागातील काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली होती. अशा प्रकारे निवडून आलेल्या सरपंचांना उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मताच्या अधिकाराची असलेली संभ्रमावस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने दूर झाली आहे. त्यांना असा अधिकार असल्याच्या या निर्णयाने आणखी काही ठिकाणी समीकरणे बदलणार आहेत. तालुक्यात चांदेकरवाडी येथे या निर्णयाचा परिणाम जाणवणार आहे.

ही पद्धत पहिल्यांदाच सुरू झाल्याने त्याची अंमलबजावणी करताना काही अडचणी आल्या होत्या. नवनिर्वाचित समिती सत्तेवर आल्यावर फक्त उपसरपंच पदासाठीच निवड होत आहे. ही निवड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होते. यासाठी त्यांना मताचा अधिकारनाही. मात्र, या निवडीत समान मते पडली तरच केवळ निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचानाहोता. मात्र, अशी स्थिती अपवादानेच होते.

याबाबत झालेल्या न्यायालयीन वादात नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यात सरपंचानाही अन्य सदस्यांप्रमाणे उपसरपंच निवडणुकीत मताचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिवाय पूर्वीप्रमाणे समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकारही अबाधित ठेवला आहे. त्यामुळे याबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड अजून झालेली नाही. त्यामुळे या निवडणुका आता या नव्या आदेशानुसार होतील.

सरपंचांना दिलेल्या मताच्या अधिकाराने काही गावातील सत्ता परिवर्तन होणार आहे. राधानगरी तालुक्यात चांदेकरवाडी येथे झालेले सत्ता परिवर्तन आता बदलणार आहे. येथे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सरपंच पद व चार जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी सर्व पक्षीय आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जुन्या निर्णयानुसार उपसरपंच पद विरोधी आघाडीला मिळणार होते. मात्र, आता सरपंचाच्या मताने समान मते होतील. त्यामुळे सरपंच आपला निर्णायक मताचा अधिकार वापरू शकतील. अर्थात ते त्यांच्या बाजूने असेल त्यामुळे चार सदस्यांपैकी एकजण उपसरपंच होईल.सदस्यांचे महत्त्व कमीआॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या सदस्य संख्येव्यतिरिक्त हे पद आहे. गावातील सर्व लोकांना यासाठी मतदान करण्याचा अधिकार आहे.गावाच्या विकास प्रक्रियेत यामुळे काही फायदे असले तरी काही अडचणीही तयार झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे निवड झाल्यामुळे काही प्रमाणात निवडून आलेल्या सदस्यांचे महत्त्व काही प्रमाणात कमी झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsarpanchसरपंच