शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित

By admin | Updated: June 22, 2015 00:20 IST

इचलकरंजी नगरपालिकेतील चित्र : साफसफाई ठरावाप्रमाणे काम करण्यास कामगार संघटनांचे आव्हान

इचलकरंजी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील साफसफाई व कचरा उठाव करण्याच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील ठरावास कामगार संघटनांनी आव्हान दिल्याने येथील पालिक ा सभागृहाच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विषयावर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी बोलविलेल्या बैठकीत कामगार नेत्यांनी सभागृहामध्ये झालेल्या स्वच्छतेच्या ठरावाप्रमाणे काम करण्यास हरकत घेतली आणि न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत असल्याबद्दल टीकाही केली.सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या बर्मन समितीने नगरपालिका हद्दीतील स्वच्छतेसाठी शिफारशी केल्या आहेत. शहरातील विरळ लोकसंख्येच्या वसाहतीमध्ये एका कर्मचाऱ्याने ८० हजार चौरस फूट व दाट लोकवस्तीमध्ये ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा परिसर स्वच्छ करावा आणि जमा झालेला कचरा ठरावीक ठिकाणी टाकावा, अशी बर्मन समितीची शिफारस आहे. समितीच्या शिफारशींनुसार नगरपालिकांनी कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे, अशा आशयाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इचलकरंजीतील सफाई कर्मचाऱ्यांनी काम केले, तर नगरपालिकेतील सुमारे साडेचार कोटी रुपये वाचणार आहेत, अशा आशयाचा विषय नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी ३० मे रोजीच्या विशेष सभेसमोर आणला आणि तो सर्वानुमते संमत झाला.ठरावाप्रमाणे सरासरी ५० हजार चौरस फुटांचे क्षेत्र साफ करण्याच्या कामाची अंमलबजावणी जून महिन्यापासून लागू करण्याचे ठरले. मात्र, याला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. म्हणून नगराध्यक्षा बिरंजे यांनी संयुक्त बैठक बोलाविली होती. बैठकीमध्ये पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, आरोग्य सभापती सुजाता भोंगाळे, नगरसेवक चोपडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, कामगार संघटनेचे के. के. कांबळे, महादेव कोरडे, सुभाष मोरे, शंकर असगर, संजय शेटे, नौशाद जावळे, आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीलाच पालिकेने केलेला ठराव रद्द करावा, असा आग्रह कामगार संघटनांकडून धरण्यात आला, तर बर्मन समितीच्या शिफारशी नगरपालिकांना लागू होत नाहीत, असेही म्हणणे यावेळी मांडण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे देशातील सर्व नगरपालिकांना बर्मन समितीच्या शिफारशी बंधनकारक आहेत, असे म्हणणे नगरसेवक चोपडे यांनी मांडले; पण ठराव रद्द करा आणि कर्मचारी स्वच्छतेचे व सफाईचे काम करतील, असे ढोबळमानाने म्हणणे कामगार नेत्यांनी मांडले. याला अन्य लोकप्रतिनिधींनी साथ दिली म्हणून अखेर चोपडे या बैठकीतून निघून गेले. (प्रतिनिधी)