शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

रिक्षामामांचा पुन्हा दोन दिवस ‘बंद’, अचानक ‘बंद’मुळे पालकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:11 IST

राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. त्यांनी दोन दिवस वर्दी अर्थात विद्यार्थी ने-आण करणे बंद केले आहे.

ठळक मुद्देरिक्षामामांचा पुन्हा दोन दिवस ‘बंद’, अचानक ‘बंद’मुळे पालकांची उडाली तारांबळदहा विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी

कोल्हापूर : राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. त्यांनी दोन दिवस वर्दी अर्थात विद्यार्थी ने-आण करणे बंद केले आहे.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिके च्या सुनावणीदरम्यान दिले आहेत. यात कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.

याद्वारे मोठी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे रिक्षामामा व पालक असे दोन्ही अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहेत. या कारवाईच्या दणक्याने जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक रिक्षाचालकांनी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस विद्यार्थ्यांची वाहतूक करणे बंद केले आहे. त्याचा थेट परिणाम पालकांवर झाला आहे.

अचानकपणे रिक्षामामांनी हा निर्णय घेतल्याने पालकांची तारांबळ उडाली. पाल्याला शाळेत सोडून त्याला पुन्हा शाळा सुटल्यानंतर वेळेवर आणण्यासाठी शहरातील सर्व शाळांवर पालकांची गर्दी झाली होती. त्यामुळे शाळेच्या परिसरात दुचाकी गाड्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात दिसत होता. विशेषत: शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर शहरातील सर्वच शाळांच्या परिसरांत हे दृश्य पाहण्यास मिळाले.स्वस्तातील पर्यायप्रत्येक पालकाची आर्थिक परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे बेताचीच परिस्थिती असलेले पालक आपल्या पाल्यांना स्कूल बस परवडत नाही, म्हणून रिक्षा अर्थात वर्दीने शाळेला पाठवितात. यात वर्षाकाठी स्कूल बसला १३ हजार ५०० रुपये मोजावे लागतात; तर स्वस्तातील पर्याय म्हणून रिक्षाचालक सहा हजार ५०० रुपये वर्षाकाठी घेतात.

यात पालकांची आर्थिक स्थिती पाहून व रिक्षाचालकांनाही परवडेल अशा पद्धतीने दोघांच्याही संमतीने विद्यार्थी वाहतूक केली जाते. यात १० आणि त्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. त्यामुळे हा सर्वसामान्यांना परवडणारा वाहतुकीचा मार्ग शासनाने बंद करू नये; यातून सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर