शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रिक्षामामांचा पुन्हा दोन दिवस ‘बंद’, अचानक ‘बंद’मुळे पालकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:11 IST

राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. त्यांनी दोन दिवस वर्दी अर्थात विद्यार्थी ने-आण करणे बंद केले आहे.

ठळक मुद्देरिक्षामामांचा पुन्हा दोन दिवस ‘बंद’, अचानक ‘बंद’मुळे पालकांची उडाली तारांबळदहा विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी

कोल्हापूर : राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. त्यांनी दोन दिवस वर्दी अर्थात विद्यार्थी ने-आण करणे बंद केले आहे.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिके च्या सुनावणीदरम्यान दिले आहेत. यात कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.

याद्वारे मोठी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे रिक्षामामा व पालक असे दोन्ही अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहेत. या कारवाईच्या दणक्याने जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक रिक्षाचालकांनी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस विद्यार्थ्यांची वाहतूक करणे बंद केले आहे. त्याचा थेट परिणाम पालकांवर झाला आहे.

अचानकपणे रिक्षामामांनी हा निर्णय घेतल्याने पालकांची तारांबळ उडाली. पाल्याला शाळेत सोडून त्याला पुन्हा शाळा सुटल्यानंतर वेळेवर आणण्यासाठी शहरातील सर्व शाळांवर पालकांची गर्दी झाली होती. त्यामुळे शाळेच्या परिसरात दुचाकी गाड्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात दिसत होता. विशेषत: शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर शहरातील सर्वच शाळांच्या परिसरांत हे दृश्य पाहण्यास मिळाले.स्वस्तातील पर्यायप्रत्येक पालकाची आर्थिक परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे बेताचीच परिस्थिती असलेले पालक आपल्या पाल्यांना स्कूल बस परवडत नाही, म्हणून रिक्षा अर्थात वर्दीने शाळेला पाठवितात. यात वर्षाकाठी स्कूल बसला १३ हजार ५०० रुपये मोजावे लागतात; तर स्वस्तातील पर्याय म्हणून रिक्षाचालक सहा हजार ५०० रुपये वर्षाकाठी घेतात.

यात पालकांची आर्थिक स्थिती पाहून व रिक्षाचालकांनाही परवडेल अशा पद्धतीने दोघांच्याही संमतीने विद्यार्थी वाहतूक केली जाते. यात १० आणि त्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. त्यामुळे हा सर्वसामान्यांना परवडणारा वाहतुकीचा मार्ग शासनाने बंद करू नये; यातून सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर