शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रिक्षामामांचा पुन्हा दोन दिवस ‘बंद’, अचानक ‘बंद’मुळे पालकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:11 IST

राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. त्यांनी दोन दिवस वर्दी अर्थात विद्यार्थी ने-आण करणे बंद केले आहे.

ठळक मुद्देरिक्षामामांचा पुन्हा दोन दिवस ‘बंद’, अचानक ‘बंद’मुळे पालकांची उडाली तारांबळदहा विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी

कोल्हापूर : राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. त्यांनी दोन दिवस वर्दी अर्थात विद्यार्थी ने-आण करणे बंद केले आहे.क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिके च्या सुनावणीदरम्यान दिले आहेत. यात कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.

याद्वारे मोठी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे रिक्षामामा व पालक असे दोन्ही अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहेत. या कारवाईच्या दणक्याने जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक रिक्षाचालकांनी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस विद्यार्थ्यांची वाहतूक करणे बंद केले आहे. त्याचा थेट परिणाम पालकांवर झाला आहे.

अचानकपणे रिक्षामामांनी हा निर्णय घेतल्याने पालकांची तारांबळ उडाली. पाल्याला शाळेत सोडून त्याला पुन्हा शाळा सुटल्यानंतर वेळेवर आणण्यासाठी शहरातील सर्व शाळांवर पालकांची गर्दी झाली होती. त्यामुळे शाळेच्या परिसरात दुचाकी गाड्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात दिसत होता. विशेषत: शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर शहरातील सर्वच शाळांच्या परिसरांत हे दृश्य पाहण्यास मिळाले.स्वस्तातील पर्यायप्रत्येक पालकाची आर्थिक परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे बेताचीच परिस्थिती असलेले पालक आपल्या पाल्यांना स्कूल बस परवडत नाही, म्हणून रिक्षा अर्थात वर्दीने शाळेला पाठवितात. यात वर्षाकाठी स्कूल बसला १३ हजार ५०० रुपये मोजावे लागतात; तर स्वस्तातील पर्याय म्हणून रिक्षाचालक सहा हजार ५०० रुपये वर्षाकाठी घेतात.

यात पालकांची आर्थिक स्थिती पाहून व रिक्षाचालकांनाही परवडेल अशा पद्धतीने दोघांच्याही संमतीने विद्यार्थी वाहतूक केली जाते. यात १० आणि त्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. त्यामुळे हा सर्वसामान्यांना परवडणारा वाहतुकीचा मार्ग शासनाने बंद करू नये; यातून सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर