शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

वाहनधारकांना रेशनवरील धान्य बंदचा फतवा मागे घ्या: कॉँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:13 IST

राज्य शासनाने ‘ज्याच्या नावावर वाहन, त्याला रेशनरील धान्य बंद,’ असा फतवा काढला आहे. तो अन्यायकारक असून, तो तातडीने मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन सोमवारी कॉँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांना सादर केले. निर्णय मागे न घेतल्यास पुरवठा कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशाराही देण्यात आला.

ठळक मुद्देसहायक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन निर्णय मागे न घेतल्यास पुरवठा कार्यालयांना टाळे

कोल्हापूर : राज्य शासनाने ‘ज्याच्या नावावर वाहन, त्याला रेशनरील धान्य बंद,’ असा फतवा काढला आहे. तो अन्यायकारक असून, तो तातडीने मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन सोमवारी कॉँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांना सादर केले. निर्णय मागे न घेतल्यास पुरवठा कार्यालयांना टाळे ठोकू, असा इशाराही देण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, स्वमालकीची दुचाकी किंवा चारचाकी असणाऱ्यांना रेशनवरील धान्य बंद करण्याचा निर्णय १३ जून २०१९ ला अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यानुसार वाहनांबाबत परिवहन विभागाशी समन्वय ठेवून कागदपत्रांची छाननी करावी, असा फतवा काढण्यात आला आहे. तसेच शेतीचे उत्पन्न वाढले तरीही रेशनकार्ड रद्द करण्याचे धोरण ठरले आहे. यामुळे राज्यातील अंदाजे ३० लाखांपेक्षा जास्त रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून सरकार लाखो गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या तोंडचा घास काढून घेत आहे.

ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी तसेच दूधविक्रीसाठी दुचाकी घेतली जाते; म्हणून ते श्रीमंत होत नाहीत. शहरी भागातील गरीब लोक प्रवासी वाहतूक करण्यासाठी चारचाकी खरेदी करतात, त्यांच्याही पोटावर सरकार उठल्याचे दिसत आहे. शेतीचे वाढलेले उत्पन्न, वाहन आहे किंवा नाही याची माहिती गोळा करण्याची मोहीम सुरू होणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. याची नोंद घेऊन पंधरा दिवसांत हा निर्णय मागे न घेतल्यास पुरवठा विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल.शिष्टमंडळात नितीन पाटील, काकासाहेब पाटील, राजू मोरे, योगेश हातलगे, संतोष देसाई, दीपक कश्यप, महेश जाधव, सविता रायकर, पद्मावती पाटील, स्वाती कदम, आसमान मोहिते, आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर