शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४३ लाख कृषिपंपाच्या वीजबिलांची फेरपडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने लागू केलेले नवे वीज जोडणी धोरण व वीजबिल सवलत योजना यांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील सर्व ४३ ...

कोल्हापूर : राज्य सरकारने लागू केलेले नवे वीज जोडणी धोरण व वीजबिल सवलत योजना यांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील सर्व ४३ लाख कृषिपंप ग्राहकांच्या बिलांची फेरपडताळणी होणार आहे. त्यातील चुकीची बिले दुरुस्त करुनच सवलतीप्रमाणे बिलांची वसुली होईल, असा निर्णय इरिगेशन फेडरेशन व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येत्या तीन वर्षात दिवसा वीज देण्याची योजना पूर्णत्वास जाईल, असेही ठरले. वीजबिले दुरुस्त झाली तर शेतकरी योजनेत सहभागी होतील व संघटनाही राज्य सरकारला सहकार्य करेल, अशी खात्री यावेळी देण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या संयुक्त शिष्टमंडळासमवेत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, मुकुंद माळी, भरत अग्रवाल, जे. पी. लाड यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

नव्या वीज जोडणी धोरणांतर्गत जाहीर केलेल्या ५० टक्के वीजबिल सवलतीच्या निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात आले. तथापि ही योजना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी दोन महत्त्वाच्या त्रुटींचे निराकरण होणे आवश्यक आहे, हे निदर्शनास आणून देण्यात आले. राज्यातील ८० टक्केहून अधिक शेतीपंपांची वीजबिले सरासरीने दुप्पट वा अधिक आलेली आहेत. विनामीटर शेतीपंपांचा जोडभार वाढवला आहे. मीटर असलेल्या व मीटर चालू नसलेल्या शेतीपंपांचे वीजबिल मीटर रिडींग न घेता, सरासरी म्हणून १०० ते १२५ युनिट्स म्हणजे दुप्पट वा अधिक टाकले जात आहे. मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत, त्यांच्यावरही सरासरी १०० ते १२५ युनिट्ची आकारणी होत आहे.

चौकट ०१

वीजबिल चुकीचे व जास्त आहे, अशी सर्व ग्राहकांनी महावितरणच्या लिंकमध्ये योग्य पर्यायाची नोंद केली तरच स्थळ तपासणी होईल आणि बिल दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरुकपणे याठिकाणी तक्रार नोंदवावी व स्थळ तपासणीच्या वेळी समक्ष हजर राहून व संपूर्ण माहिती देऊन आपले बिल पूर्णपणे दुरुस्त करुन घ्यावे व मगच योजनेत सहभागी होण्यास मान्यता द्यावी, असे जाहीर आवाहन सर्व संघटनांच्यावतीने सर्व शेतीपंप वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.

चौकट ०२

अशा करा दुरुस्त्या

वाढलेली बिले दुरुस्त करण्यासाठी जेथे विनामीटर जोडणी आहे, तेथे खरा जोडभार तपासून त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर आहेत व सुरु आहेत, तेथे प्रत्यक्ष रिडींग घेऊन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. मीटर बंद आहेत, अशाठिकाणी मागील मीटर चालू कालावधीतील वीज वापर गृहीत धरून त्यानुसार संपूर्ण कालावधीचा वीजवापर व त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर पूर्ण काळ बंद आहे व प्रत्यक्ष वीजवापर तपासता येत नाही, अशाठिकाणी त्या फिडरवरुन दिलेली वीज व त्या फिडरवरील खरा जोडभार या आधारे सरासरी वीजवापर व त्यानुसार बिले निश्चित करण्यात यावीत, अशा मागण्या संघटना प्रतिनिधींच्यावतीने करण्यात आल्या. या सर्व मागण्यांना ऊर्जामंत्री व संबंधित अधिकारी यांनी मान्यता दिली.