शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

राज्यातील ४३ लाख कृषिपंपाच्या वीजबिलांची फेरपडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने लागू केलेले नवे वीज जोडणी धोरण व वीजबिल सवलत योजना यांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील सर्व ४३ ...

कोल्हापूर : राज्य सरकारने लागू केलेले नवे वीज जोडणी धोरण व वीजबिल सवलत योजना यांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील सर्व ४३ लाख कृषिपंप ग्राहकांच्या बिलांची फेरपडताळणी होणार आहे. त्यातील चुकीची बिले दुरुस्त करुनच सवलतीप्रमाणे बिलांची वसुली होईल, असा निर्णय इरिगेशन फेडरेशन व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येत्या तीन वर्षात दिवसा वीज देण्याची योजना पूर्णत्वास जाईल, असेही ठरले. वीजबिले दुरुस्त झाली तर शेतकरी योजनेत सहभागी होतील व संघटनाही राज्य सरकारला सहकार्य करेल, अशी खात्री यावेळी देण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या संयुक्त शिष्टमंडळासमवेत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, मुकुंद माळी, भरत अग्रवाल, जे. पी. लाड यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

नव्या वीज जोडणी धोरणांतर्गत जाहीर केलेल्या ५० टक्के वीजबिल सवलतीच्या निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात आले. तथापि ही योजना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी दोन महत्त्वाच्या त्रुटींचे निराकरण होणे आवश्यक आहे, हे निदर्शनास आणून देण्यात आले. राज्यातील ८० टक्केहून अधिक शेतीपंपांची वीजबिले सरासरीने दुप्पट वा अधिक आलेली आहेत. विनामीटर शेतीपंपांचा जोडभार वाढवला आहे. मीटर असलेल्या व मीटर चालू नसलेल्या शेतीपंपांचे वीजबिल मीटर रिडींग न घेता, सरासरी म्हणून १०० ते १२५ युनिट्स म्हणजे दुप्पट वा अधिक टाकले जात आहे. मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत, त्यांच्यावरही सरासरी १०० ते १२५ युनिट्ची आकारणी होत आहे.

चौकट ०१

वीजबिल चुकीचे व जास्त आहे, अशी सर्व ग्राहकांनी महावितरणच्या लिंकमध्ये योग्य पर्यायाची नोंद केली तरच स्थळ तपासणी होईल आणि बिल दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरुकपणे याठिकाणी तक्रार नोंदवावी व स्थळ तपासणीच्या वेळी समक्ष हजर राहून व संपूर्ण माहिती देऊन आपले बिल पूर्णपणे दुरुस्त करुन घ्यावे व मगच योजनेत सहभागी होण्यास मान्यता द्यावी, असे जाहीर आवाहन सर्व संघटनांच्यावतीने सर्व शेतीपंप वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.

चौकट ०२

अशा करा दुरुस्त्या

वाढलेली बिले दुरुस्त करण्यासाठी जेथे विनामीटर जोडणी आहे, तेथे खरा जोडभार तपासून त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर आहेत व सुरु आहेत, तेथे प्रत्यक्ष रिडींग घेऊन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. मीटर बंद आहेत, अशाठिकाणी मागील मीटर चालू कालावधीतील वीज वापर गृहीत धरून त्यानुसार संपूर्ण कालावधीचा वीजवापर व त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर पूर्ण काळ बंद आहे व प्रत्यक्ष वीजवापर तपासता येत नाही, अशाठिकाणी त्या फिडरवरुन दिलेली वीज व त्या फिडरवरील खरा जोडभार या आधारे सरासरी वीजवापर व त्यानुसार बिले निश्चित करण्यात यावीत, अशा मागण्या संघटना प्रतिनिधींच्यावतीने करण्यात आल्या. या सर्व मागण्यांना ऊर्जामंत्री व संबंधित अधिकारी यांनी मान्यता दिली.