शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल-- शिरोळ जिल्हा परिषद विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 21:31 IST

‘स्वाभिमानी’ची गणिते चुकली : उल्हास पाटील यांचे पुन्हा वर्चस्व

संदीप बावचे --- शिरोळ --कार्यकर्त्यांच्या विजयासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शिरोळ तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानीची चुकलेली गणिते, काँग्रेस-राष्ट्रवादीला गत निवडणुकी एवढेच मिळालेले यश, तर भाजप-शिवसेनेचा करिष्मा पाहावयास मिळाला. खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेसचे गणपतराव पाटील यांचे चुकलेले बेरजेचे राजकारण त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरले. तर भाजपचे अनिल यादव व शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी तालुक्यातील आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे पुन्हा एकदा निकालावरून स्पष्ट झाले. शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात अपेक्षेप्रमाणे दोन्ही काँग्रेसनी आघाडी केली. गत निवडणुकीत मिळालेले यश व कार्यकर्त्यांच्या दबावामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेऊन निवडणूक लढविली. सुरुवातीपासूनच भाजप-शिवसेना एकत्र युती करणार, असे चित्र असतानाच छुप्या युतीतून त्यांनी विभागून जागा लढविल्या. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या बहुरंगी लढतीत स्वाभिमानीच्या शुभांगी शिंदे विजयी ठरल्या. भाजप पुरस्कृत बेबीताई भिलवडे यांच्या बंडखोरीमुळे काँगे्रसच्या सुजाता शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. स्वाभिमानीने हा मतदारसंघ कायम ठेवला. ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेने पहिल्यांदाच एंट्री केली. स्वाभिमानीच्या दीपाली ठोमके यांचा ७१८ मतांनी पराभव करीत शिवसेनेच्या स्वाती सासणे विजयी ठरल्या. याठिकाणी राष्ट्रवादीच्या स्मिता कांबळे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ठोमके यांचा पराभव सावकर मादनाईक यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. स्वाभिमानीचा दुसरा बालेकिल्ला असणाऱ्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व राखत जि.प. व पं.स.च्या दोन्ही जागा काबीज केल्या. जयसिंगपूर नगरपालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिरोळ जिल्हा परिषदेची जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. प्रमुख तिरंगी लढतीत भाजपचे अशोकराव माने मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर पाणी फिरले. अकिवाट जि. प., हेरवाड पं. स., दानोळी जि. प. निवडणुकीत यापूर्वी माने यांचा पराभव झाला होता. अखेर शिरोळमधून त्यांना विजयाचा गुलाल लागला. स्वाभिमानीच्या हक्काचा समजल्या जाणाऱ्या नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत स्वाभिमानीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. काँग्रेसचे शेखर पाटील व भाजपचे राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ असा सामना झाला. मात्र, अवघ्या सहा मतांनी निंबाळकर यांनी बाजी मारली. काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपने काबीज केला. छाननीत हरकतीची लढाई जिंकून भाजपचे विजय भोजे यांनी आपला करिष्मा निकालातून दाखविला. दत्तवाड जि. प. मतदारसंघातून जि. प.चे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे उमेदवार बंडा माने यांनी शिवसेनेचे संताजी घोरपडे व स्वाभिमानीचे बाळगोंडा पाटील यांचा पराभव करून एका दगडात दोन पक्षी मारले. जि. प. व पं. स. निवडणुकीत स्वाभिमानीसह, काँग्रेस-राष्ट्रवादीने बेरजेचे राजकारण केले. तर भाजप-शिवसेनेने मताच्या विभागणीतून आपले वर्चस्व सिद्ध केले. पंचायत समितीवर कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. मतदारांनी सर्वांनाच संधी दिली असली, तरी जि. प. व पं. स. निकालानंतर आता नेत्यांसमोर विकासकामांचे आव्हान आहे. अशी मतांची विभागणीशिरोळ तालुक्यात जि. प. निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना ५६४४७, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना ५५२५१, तर स्वाभिमानीच्या उमेदवारांना ५१४४२ मते मिळाली. पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना ५९९२६, स्वाभिमानी ५४४१३, तर शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना ५२५४४ मते मिळाली. जि. प.मध्ये भाजप-शिवसेना, तर पं. स.मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने पहिल्या क्रमांकाची मते घेतली.