शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

३२०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्रीवर बंदी आणा कारखानदारांची केंद्र शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:56 AM

जीवनाश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार उसाची ‘एफआरपी’ ठरविताना धरलेल्या साखरेच्या दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही.

कोल्हापूर : जीवनाश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार उसाची ‘एफआरपी’ ठरविताना धरलेल्या साखरेच्या दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही. त्यानुसार साखरेची विक्री ३२०० रुपये प्रतिक्विंटलच्या खाली करण्यास बंदी आणा, अशी मागणी राज्यातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

यंदा सुरुवातीच्या महिना-दीड महिन्यात साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले. त्यानंतर साखरेच्या दरातील घसरण थांबत नसल्याने प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे बिले अदा केली. त्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने साखर आयुक्तांनी नोटिसा पाठविल्याने कारखानदार हवालदिल झाले. साखर गोदामामध्ये पडून आहे. बाजारात दर नाही आणि शेतकºयांना पैसे देणे बंधनकारक आहे, अशा पेचात कारखाने अडकले आहे.

राज्य सरकारने ३२ रुपये दराने दहा लाख क्विंटल साखर खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते, ते हवेत विरल्याने संकट गडद होत आहे. केंद्राने प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली; पण त्यासाठी जानेवारी व फेब्रुवारीमधील साखरसाठ्याची अट घातली. त्याचा फायदा फारशा कारखान्यांना झालेला दिसत नाही.

संकटातून बाहेर पडण्यासाठी कारखानादारांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जीवनाश्यक वस्तू कायद्यानुसार एफआरपी ठरविताना जो साखरेचा दर गृहित धरला जातो, तो कायम राखणे बंधनकारक आहे. गत हंगामातील एफआरपी ठरविताना प्रतिक्विंटल ३२०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. गेले सात-आठ महिन्यांत त्यामध्ये ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ३२०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्री करण्यास बंदी घालावी, अशी मागणी साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडे केली आहे.सरकारला धास्ती?साखर ३२०० रुपयांच्या खाली विक्री करायची नाही, असा निर्णय केंद्राने घेतला तर तो ग्राहकांच्या पचनी पडणार नाही. याची धास्ती सरकारला असल्याने हा निर्णय होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे चर्चा आहे. 

साखर दरातील घसरणीचे मोठे संकट उभे आहे, त्यासाठी जीवनाश्यक वस्तू कायद्यातील या तरतुदीनुसार केंद्राने निर्णय घेणे अपेक्षित आहे.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ, साखर उद्योग