शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३२०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्रीवर बंदी आणा कारखानदारांची केंद्र शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:56 IST

जीवनाश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार उसाची ‘एफआरपी’ ठरविताना धरलेल्या साखरेच्या दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही.

कोल्हापूर : जीवनाश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार उसाची ‘एफआरपी’ ठरविताना धरलेल्या साखरेच्या दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही. त्यानुसार साखरेची विक्री ३२०० रुपये प्रतिक्विंटलच्या खाली करण्यास बंदी आणा, अशी मागणी राज्यातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

यंदा सुरुवातीच्या महिना-दीड महिन्यात साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले. त्यानंतर साखरेच्या दरातील घसरण थांबत नसल्याने प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे बिले अदा केली. त्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने साखर आयुक्तांनी नोटिसा पाठविल्याने कारखानदार हवालदिल झाले. साखर गोदामामध्ये पडून आहे. बाजारात दर नाही आणि शेतकºयांना पैसे देणे बंधनकारक आहे, अशा पेचात कारखाने अडकले आहे.

राज्य सरकारने ३२ रुपये दराने दहा लाख क्विंटल साखर खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते, ते हवेत विरल्याने संकट गडद होत आहे. केंद्राने प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली; पण त्यासाठी जानेवारी व फेब्रुवारीमधील साखरसाठ्याची अट घातली. त्याचा फायदा फारशा कारखान्यांना झालेला दिसत नाही.

संकटातून बाहेर पडण्यासाठी कारखानादारांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जीवनाश्यक वस्तू कायद्यानुसार एफआरपी ठरविताना जो साखरेचा दर गृहित धरला जातो, तो कायम राखणे बंधनकारक आहे. गत हंगामातील एफआरपी ठरविताना प्रतिक्विंटल ३२०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. गेले सात-आठ महिन्यांत त्यामध्ये ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ३२०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्री करण्यास बंदी घालावी, अशी मागणी साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडे केली आहे.सरकारला धास्ती?साखर ३२०० रुपयांच्या खाली विक्री करायची नाही, असा निर्णय केंद्राने घेतला तर तो ग्राहकांच्या पचनी पडणार नाही. याची धास्ती सरकारला असल्याने हा निर्णय होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे चर्चा आहे. 

साखर दरातील घसरणीचे मोठे संकट उभे आहे, त्यासाठी जीवनाश्यक वस्तू कायद्यातील या तरतुदीनुसार केंद्राने निर्णय घेणे अपेक्षित आहे.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ, साखर उद्योग