शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

पन्हाळ्यावरील विश्रामगृह, मुख्यालयातील उपहारगृहही बंद, उत्पन्नावर पाणी; कोल्हापूर जिल्हा परिषदेची अनास्था

By समीर देशपांडे | Updated: January 20, 2025 16:19 IST

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीच्या गोष्टी केल्या जात असताना अनास्थेमुळे उत्पन्नावरच पाणी सोडण्याची वेळ आली आहे. पन्हाळा किल्ल्यावरील ‘गोपाळतीर्थ’ विश्रामगृह न्यायालयात दावा असल्याने बंद आहे. तर मुख्यालयातील उपहारगृहही साडे तीन वर्षे बंद आहेे. एकूणच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या मालमत्तांविषयी अनास्था असल्याचेच दिसून येत आहे.पन्हाळ्यावरील ‘गोपाळतीर्थ’ हे १ जून १९१८ पासून ३१ मे २०२३ पर्यंतच्या पाच वर्षांच्या कराराने भाड्याने आरती धुमाळ यांनी चालवायला घेतले होते. पहिल्या वर्षासाठी ३ लाख ३३ हजार रुपये भाडे ठरले आणि दरवर्षी त्यात १० टक्के वाढ होणार होती. त्यांनी तीन वर्षांचे भाडे भरले. परंतु ८ मे २००० रोजी अर्ज दिला आणि महापूर आणि कोरोनामुळे व्यवसायात मंदी आल्याने भाडे माफ करावे, अशी मागणी केली.मुदत संपेपर्यंत विश्रामगृह वापरले परंतु शेवटच्या दोन वर्षांचे ७ लाख २७ हजार ४६८ रुपये भाडे थकवले. ३ मे २०२३ रोजी मुदत संपल्याने विश्रामगृह वापरू नये, असे पत्र जिल्हा परिषदेने त्यांना दिले. यातून वाद होऊन धुमाळ यांनी पन्हाळा न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याचा ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे धुमाळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूस अभिलेख कक्षावरती आठ वर्षांपूर्वी उपहारगृह बांधण्यात आले. काही वर्षे ते चालले. परंतु नंतर जादा भाड्यामुळे ते कोणीही चालवण्यास घेतले नसून आजही ते बंद अवस्थेत आहे. साडे अकरा हजार रुपये भाड्याने चालवायला देण्याबाबत निर्णयही झाला. परंतु एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष न दिल्याने सध्या हे उपहारगृह पडून आहे.

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..हे उपहारगृह चालविण्यासाठीच्या तीन जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये देण्यात आल्या होत्या. जर कोल्हापुरातील उपहारगृह चालवण्यासाठी द्यायचे असेल तर जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून कोणाला तरी लाभ देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी हा कारभार केल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद