शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पन्हाळ्यावरील विश्रामगृह, मुख्यालयातील उपहारगृहही बंद, उत्पन्नावर पाणी; कोल्हापूर जिल्हा परिषदेची अनास्था

By समीर देशपांडे | Updated: January 20, 2025 16:19 IST

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीच्या गोष्टी केल्या जात असताना अनास्थेमुळे उत्पन्नावरच पाणी सोडण्याची वेळ आली आहे. पन्हाळा किल्ल्यावरील ‘गोपाळतीर्थ’ विश्रामगृह न्यायालयात दावा असल्याने बंद आहे. तर मुख्यालयातील उपहारगृहही साडे तीन वर्षे बंद आहेे. एकूणच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या मालमत्तांविषयी अनास्था असल्याचेच दिसून येत आहे.पन्हाळ्यावरील ‘गोपाळतीर्थ’ हे १ जून १९१८ पासून ३१ मे २०२३ पर्यंतच्या पाच वर्षांच्या कराराने भाड्याने आरती धुमाळ यांनी चालवायला घेतले होते. पहिल्या वर्षासाठी ३ लाख ३३ हजार रुपये भाडे ठरले आणि दरवर्षी त्यात १० टक्के वाढ होणार होती. त्यांनी तीन वर्षांचे भाडे भरले. परंतु ८ मे २००० रोजी अर्ज दिला आणि महापूर आणि कोरोनामुळे व्यवसायात मंदी आल्याने भाडे माफ करावे, अशी मागणी केली.मुदत संपेपर्यंत विश्रामगृह वापरले परंतु शेवटच्या दोन वर्षांचे ७ लाख २७ हजार ४६८ रुपये भाडे थकवले. ३ मे २०२३ रोजी मुदत संपल्याने विश्रामगृह वापरू नये, असे पत्र जिल्हा परिषदेने त्यांना दिले. यातून वाद होऊन धुमाळ यांनी पन्हाळा न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याचा ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे धुमाळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूस अभिलेख कक्षावरती आठ वर्षांपूर्वी उपहारगृह बांधण्यात आले. काही वर्षे ते चालले. परंतु नंतर जादा भाड्यामुळे ते कोणीही चालवण्यास घेतले नसून आजही ते बंद अवस्थेत आहे. साडे अकरा हजार रुपये भाड्याने चालवायला देण्याबाबत निर्णयही झाला. परंतु एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष न दिल्याने सध्या हे उपहारगृह पडून आहे.

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..हे उपहारगृह चालविण्यासाठीच्या तीन जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये देण्यात आल्या होत्या. जर कोल्हापुरातील उपहारगृह चालवण्यासाठी द्यायचे असेल तर जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून कोणाला तरी लाभ देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी हा कारभार केल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद