शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पासिंग न झालेली वाहने चालवण्यास चालकांचा नकार-सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 21:32 IST

कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने

ठळक मुद्देमहापालिका अधिकाºयांची मध्यस्थी वर्कशॉप विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याची बाब चालकांच्या असहकारातून पुढे

कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने सकाळी दोन तास सेवा-सुविधांवर परिणाम झाला. के.एम.टी. बस अपघाताची घटना घडल्यानंतरही महापालिका वर्कशॉप विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याची बाब चालकांच्या असहकारातून पुढे आली. दरम्यान, येत्या पंधरा दिवसात पासिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालकांनी असहकार मागे घेतला.

महानगरपालिकेच्या वाहनताफ्यातील विविध प्रकारच्या तब्बल चाळीस वाहनांचे आरटीओ पासिंग झालेले नाही तरीही अत्यावश्यक सेवेत असल्याने ही वाहने रस्त्यांवरून फिरत आहेत. चालकही धोका पत्करून वाहने चालवत होते; परंतु के.एम.टी. बसचा अपघात झाल्यानंतर महापालिका वर्कशॉपकडील सर्व वाहनांची देखभाल-दुरूस्ती रोज झाली पाहिजे तसेच त्या वाहनांबाबत काही त्रुटी, दोष असतील तर त्या वाहन रजिस्टरमध्ये नोंद केल्या पाहिजेत, याची सक्ती चालकांवर करण्यात आली. त्यामुळे चालकांनी आधी वाहनांचे पासिंग करून घ्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पासिंगची प्रक्रिया अपघातानंतर तरी तातडीने होईल, अशी अपेक्षा असताना अधिकारी पातळीवर उदासीनता दिसून आल्याने शुक्रवारी चालकांनी ही वाहने बाहेर काढण्यास नकार दिला.

प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक, वर्कशॉप अधीक्षक रावसाहेब चव्हाण यांनी तातडीने चालकांची भेट घेऊन नागरी सुविधांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. अवजड वाहनांना स्पीड कंट्रोल युनिट बसविण्याची सक्ती ‘आरटीओ’ने केली असल्याने त्याच्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे पासिंग रखडले आहे; पण येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी चालकांना सांगितले. त्यानंतर चालकांनी आपला असहकार मागे घेतला.४० वाहने विनापरवाना रस्त्यावरआरटीओ पासिंग झाल्याखेरीज कोणतेही वाहन रस्त्यावर फिरत नाही. मात्र, महानगरपालिकेची तब्बल ४० वाहने रस्त्यावर फिरत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठा विभागाकडील ही वाहने असल्याने प्रशासनाने तशीच ही वाहने रस्त्यावर आणली आहेत. वास्तविक ही बाब अतिशय गंभीर आहे तरीही तांत्रिक अडचणीत ही वाहने बंद राहून त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ नये म्हणून वाहने रस्त्यावर आणली जात आहेत.