शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पासिंग न झालेली वाहने चालवण्यास चालकांचा नकार-सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 21:32 IST

कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने

ठळक मुद्देमहापालिका अधिकाºयांची मध्यस्थी वर्कशॉप विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याची बाब चालकांच्या असहकारातून पुढे

कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने सकाळी दोन तास सेवा-सुविधांवर परिणाम झाला. के.एम.टी. बस अपघाताची घटना घडल्यानंतरही महापालिका वर्कशॉप विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याची बाब चालकांच्या असहकारातून पुढे आली. दरम्यान, येत्या पंधरा दिवसात पासिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालकांनी असहकार मागे घेतला.

महानगरपालिकेच्या वाहनताफ्यातील विविध प्रकारच्या तब्बल चाळीस वाहनांचे आरटीओ पासिंग झालेले नाही तरीही अत्यावश्यक सेवेत असल्याने ही वाहने रस्त्यांवरून फिरत आहेत. चालकही धोका पत्करून वाहने चालवत होते; परंतु के.एम.टी. बसचा अपघात झाल्यानंतर महापालिका वर्कशॉपकडील सर्व वाहनांची देखभाल-दुरूस्ती रोज झाली पाहिजे तसेच त्या वाहनांबाबत काही त्रुटी, दोष असतील तर त्या वाहन रजिस्टरमध्ये नोंद केल्या पाहिजेत, याची सक्ती चालकांवर करण्यात आली. त्यामुळे चालकांनी आधी वाहनांचे पासिंग करून घ्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पासिंगची प्रक्रिया अपघातानंतर तरी तातडीने होईल, अशी अपेक्षा असताना अधिकारी पातळीवर उदासीनता दिसून आल्याने शुक्रवारी चालकांनी ही वाहने बाहेर काढण्यास नकार दिला.

प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक, वर्कशॉप अधीक्षक रावसाहेब चव्हाण यांनी तातडीने चालकांची भेट घेऊन नागरी सुविधांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. अवजड वाहनांना स्पीड कंट्रोल युनिट बसविण्याची सक्ती ‘आरटीओ’ने केली असल्याने त्याच्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे पासिंग रखडले आहे; पण येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी चालकांना सांगितले. त्यानंतर चालकांनी आपला असहकार मागे घेतला.४० वाहने विनापरवाना रस्त्यावरआरटीओ पासिंग झाल्याखेरीज कोणतेही वाहन रस्त्यावर फिरत नाही. मात्र, महानगरपालिकेची तब्बल ४० वाहने रस्त्यावर फिरत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठा विभागाकडील ही वाहने असल्याने प्रशासनाने तशीच ही वाहने रस्त्यावर आणली आहेत. वास्तविक ही बाब अतिशय गंभीर आहे तरीही तांत्रिक अडचणीत ही वाहने बंद राहून त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ नये म्हणून वाहने रस्त्यावर आणली जात आहेत.