शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पासिंग न झालेली वाहने चालवण्यास चालकांचा नकार-सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 21:32 IST

कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने

ठळक मुद्देमहापालिका अधिकाºयांची मध्यस्थी वर्कशॉप विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याची बाब चालकांच्या असहकारातून पुढे

कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने सकाळी दोन तास सेवा-सुविधांवर परिणाम झाला. के.एम.टी. बस अपघाताची घटना घडल्यानंतरही महापालिका वर्कशॉप विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याची बाब चालकांच्या असहकारातून पुढे आली. दरम्यान, येत्या पंधरा दिवसात पासिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालकांनी असहकार मागे घेतला.

महानगरपालिकेच्या वाहनताफ्यातील विविध प्रकारच्या तब्बल चाळीस वाहनांचे आरटीओ पासिंग झालेले नाही तरीही अत्यावश्यक सेवेत असल्याने ही वाहने रस्त्यांवरून फिरत आहेत. चालकही धोका पत्करून वाहने चालवत होते; परंतु के.एम.टी. बसचा अपघात झाल्यानंतर महापालिका वर्कशॉपकडील सर्व वाहनांची देखभाल-दुरूस्ती रोज झाली पाहिजे तसेच त्या वाहनांबाबत काही त्रुटी, दोष असतील तर त्या वाहन रजिस्टरमध्ये नोंद केल्या पाहिजेत, याची सक्ती चालकांवर करण्यात आली. त्यामुळे चालकांनी आधी वाहनांचे पासिंग करून घ्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पासिंगची प्रक्रिया अपघातानंतर तरी तातडीने होईल, अशी अपेक्षा असताना अधिकारी पातळीवर उदासीनता दिसून आल्याने शुक्रवारी चालकांनी ही वाहने बाहेर काढण्यास नकार दिला.

प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक, वर्कशॉप अधीक्षक रावसाहेब चव्हाण यांनी तातडीने चालकांची भेट घेऊन नागरी सुविधांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. अवजड वाहनांना स्पीड कंट्रोल युनिट बसविण्याची सक्ती ‘आरटीओ’ने केली असल्याने त्याच्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे पासिंग रखडले आहे; पण येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी चालकांना सांगितले. त्यानंतर चालकांनी आपला असहकार मागे घेतला.४० वाहने विनापरवाना रस्त्यावरआरटीओ पासिंग झाल्याखेरीज कोणतेही वाहन रस्त्यावर फिरत नाही. मात्र, महानगरपालिकेची तब्बल ४० वाहने रस्त्यावर फिरत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठा विभागाकडील ही वाहने असल्याने प्रशासनाने तशीच ही वाहने रस्त्यावर आणली आहेत. वास्तविक ही बाब अतिशय गंभीर आहे तरीही तांत्रिक अडचणीत ही वाहने बंद राहून त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ नये म्हणून वाहने रस्त्यावर आणली जात आहेत.