शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करा

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

जे. एफ. पाटील : सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंधितांसाठी दुरुस्त्या; शेतकऱ्यांवर घाला येणार

कोल्हापूर : हितसंबंधित, कार्यकर्ते यांना शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने तयार केलेला प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायद्याला तीव्र विरोध करावा, असे आवाहन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी सोमवारी केले. येथील श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या डॉ. श्रीनिवास खांदेवाले लिखित ‘भारतातील भूमी अधिग्रहण -२०१५ शेतकरी विरुद्ध कारखानदार व सरकार’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रम झाला. श्रमिक प्रतिष्ठानचे प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. डॉ. पाटील म्हणाले, ब्रिटिशांनी १८९४ साली जमीन अधिग्रहण कायदा केला. त्यामध्ये १९८४ साली दुरुस्ती झाली. त्या कायद्यात दुरुस्ती करून भूमी अधिग्रहण कायदा - २०१३ गेल्या संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेनंतर केला. कोणतेही नवे सरकार आल्यानंतर आपल्या हितसंबंधितांच्या फायद्यासाठी कायद्यात बदल करीत असते. त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर २०१३च्या विधेयकाची अंमलबजाणीही झाली नसताना शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनी बळकावण्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा-२०१५ प्रस्तावित करण्यात आला आहे. या कायद्यात २०१३च्या कायद्यात असलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूच्या तरतुदी शब्दांचा खेळ करून काढलेल्या आहेत. भांडवलदार, उद्योगपती यांना जमीन देण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. लाजलज्जा सोडून जाणीवपूर्वक राज्यसभेचे अधिवेशन स्थगित करून फेर अद्यादेश काढला आहे. ते म्हणाले, सन २०१३च्या कायद्यातील शेतकरी विरोधी तरतुदी दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्या न करता सत्ताधाऱ्यांनी हितसंबंधितांचे भले करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली. विकासासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी विरोध असू नये. मात्र, ज्या शेतकऱ्यांची जमीन घेणार आहे त्यांचे पुनर्वसन तो प्रकल्प पूर्ण होण्याआधी करणे आवश्यक आहे. पुनर्वसन केल्यानंतर त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. प्रकल्पात विस्थापित कुटुंबातील किमान दोघांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळायला हवी. खरोखरच सार्वजनिक उद्देशासाठीच जमीन अधिगृहण केले पाहिजे. मात्र, याकडे प्रस्तावित विधेयकात दुर्र्लक्ष केले आहे. प्रस्तावित कायद्यामुळे जमीन संपादनाचा राजमार्ग निर्माण होणार आहे.यावेळी कुलकर्णी, दिलीप पोवार यांची भाषणे झाली. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रास्ताविक, तर उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चिंतामणी मगदूम, एस. बी. पाटील, उमेश सूर्यवंशी, उमेश पानसरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चारपट भरपाईचे आमिष...अलीकडे शासन संपादित जमिनीसाठी चार ते पाचपट भरपाई देण्याचे आमिष दाखविले जात आहे. मात्र, भू-निबंधकाकडे जमीन खरेदीसाठी केलेल्या नोंदीच्या चारपट प्रत्यक्षात भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ती भरपाई बाजारभावापेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे चारपट भरपाईचे आमिषच आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.