शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करा

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

जे. एफ. पाटील : सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंधितांसाठी दुरुस्त्या; शेतकऱ्यांवर घाला येणार

कोल्हापूर : हितसंबंधित, कार्यकर्ते यांना शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने तयार केलेला प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायद्याला तीव्र विरोध करावा, असे आवाहन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी सोमवारी केले. येथील श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या डॉ. श्रीनिवास खांदेवाले लिखित ‘भारतातील भूमी अधिग्रहण -२०१५ शेतकरी विरुद्ध कारखानदार व सरकार’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रम झाला. श्रमिक प्रतिष्ठानचे प्रसाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. डॉ. पाटील म्हणाले, ब्रिटिशांनी १८९४ साली जमीन अधिग्रहण कायदा केला. त्यामध्ये १९८४ साली दुरुस्ती झाली. त्या कायद्यात दुरुस्ती करून भूमी अधिग्रहण कायदा - २०१३ गेल्या संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेनंतर केला. कोणतेही नवे सरकार आल्यानंतर आपल्या हितसंबंधितांच्या फायद्यासाठी कायद्यात बदल करीत असते. त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर २०१३च्या विधेयकाची अंमलबजाणीही झाली नसताना शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनी बळकावण्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा-२०१५ प्रस्तावित करण्यात आला आहे. या कायद्यात २०१३च्या कायद्यात असलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूच्या तरतुदी शब्दांचा खेळ करून काढलेल्या आहेत. भांडवलदार, उद्योगपती यांना जमीन देण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. लाजलज्जा सोडून जाणीवपूर्वक राज्यसभेचे अधिवेशन स्थगित करून फेर अद्यादेश काढला आहे. ते म्हणाले, सन २०१३च्या कायद्यातील शेतकरी विरोधी तरतुदी दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्या न करता सत्ताधाऱ्यांनी हितसंबंधितांचे भले करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली. विकासासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी विरोध असू नये. मात्र, ज्या शेतकऱ्यांची जमीन घेणार आहे त्यांचे पुनर्वसन तो प्रकल्प पूर्ण होण्याआधी करणे आवश्यक आहे. पुनर्वसन केल्यानंतर त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. प्रकल्पात विस्थापित कुटुंबातील किमान दोघांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळायला हवी. खरोखरच सार्वजनिक उद्देशासाठीच जमीन अधिगृहण केले पाहिजे. मात्र, याकडे प्रस्तावित विधेयकात दुर्र्लक्ष केले आहे. प्रस्तावित कायद्यामुळे जमीन संपादनाचा राजमार्ग निर्माण होणार आहे.यावेळी कुलकर्णी, दिलीप पोवार यांची भाषणे झाली. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रास्ताविक, तर उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चिंतामणी मगदूम, एस. बी. पाटील, उमेश सूर्यवंशी, उमेश पानसरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चारपट भरपाईचे आमिष...अलीकडे शासन संपादित जमिनीसाठी चार ते पाचपट भरपाई देण्याचे आमिष दाखविले जात आहे. मात्र, भू-निबंधकाकडे जमीन खरेदीसाठी केलेल्या नोंदीच्या चारपट प्रत्यक्षात भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ती भरपाई बाजारभावापेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे चारपट भरपाईचे आमिषच आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.