शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात स्थायिक मुला-मुलींच्या पालकांची संघटना- : ‘एन.आर.आय.पेरेंटस्’मध्ये सहभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:59 IST

परदेशामध्ये राहणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची ‘एन.आर.आय. पेरेंटस्’ ही संघटना कोल्हापुरात स्थापन करण्यात येणार आहे. महिला सबलीकरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या येथील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे‘स्वयंसिद्धा’च्या प्रेरणेतून नवा उपक्रम

कोल्हापूर : परदेशामध्ये राहणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची ‘एन.आर.आय. पेरेंटस्’ ही संघटना कोल्हापुरात स्थापन करण्यात येणार आहे. महिला सबलीकरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या येथील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये जे सहभागी होऊ इच्छितात त्यांनी १४ जुलैपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. १८ जुलैला दुपारी ४ वाजता या संस्थेच्या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो मुले आणि मुली उच्चशिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झाली आहेत. यातील अनेकजण काही कालावधीसाठी परदेशात गेले असले तरी अनेकजण तिथेच स्थायिक झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर त्यांचे आई-वडील कोल्हापुरात किंवा आपापल्या गावी राहत आहेत. परदेशात राहणाºया मुलांना सातत्याने भारतामध्ये येणे शक्य नसल्याने इकडे राहणाºया आई-वडिलांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच अशां मुला-मुलींच्या पालकांना एकत्र करण्याची कल्पना रुईकर कॉलनीमध्ये वास्तव्यास असणाºया जगदीश जोशी आणि मनीषा जोशी यांनी मांडली आहे.

हे दोघेही आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत होते. त्यांची मुलगीही परदेशामध्ये स्थायिक आहे. त्यामुळे त्यांना या वाटचालीमध्ये येणाºया अडचणींची माहिती आहे. अशाच अडचणी इतर पालकांना येतात. एकाकीपणा येतो. निर्णय घेताना चर्चा आवश्यक वाटते म्हणूनच अशा परदेशात स्थायिक झालेल्या मुला-मुलींच्या पालकांना एकत्र आणण्याची कल्पना ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परुळेकर यांच्याकडे मांडली. त्यांनीही या कल्पनेला दाद देऊन सहभाग घेण्याचा निर्णय घेतला.उद्दिष्ट्येनवीन समविचारी मैत्रीची सुरुवातकलागुणांना व्यासपीठ.जीवन आनंददायी बनविण्यासाठीचे उपक्रम.सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग.या सर्व बाबींच्या माध्यमातून मुले, मुली आपल्यापासून दूर असली तरी आपण जीवनात आनंद घेण्याची वृत्ती जोपासणे. 

मी आणि माझे पती जगदीश दोघेही पुण्यात नोकरीला होतो. आता निवृत्तीनंतर पुन्हा कोल्हापुरात राहायला आलो आहोत. आमची मुलगी आॅस्ट्रेलियामध्ये गेली १४ वर्षे वास्तव्यास आहे. नातवंडे आमच्यासोबत नाहीत. याची सल मनामध्ये आहे; पण वास्तव स्वीकारले पाहिजे. आमच्या या भावना समदु:खी असणारेच समजू शकणार. अशा सर्वांना एकत्र करून उर्वरित आयुष्य आनंदामध्ये घालविण्यासाठी हे संघटन करत आहोत. - मनीषा जोशी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocialसामाजिक