शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

संशोधन हे प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित नको

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

अशोक भोईटे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण शिबिर

कोल्हापूर : संशोधन हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुतीच्या शेतीवर कुठल्याही अनियमित हवामानाचा दुष्परिणाम होत नाही. तसेच या शेतीमध्ये कुठल्याही गोष्टी वाया जात नाहीत. अगदी तुतीच्या पानापासून ते रेशीमकिड्यांच्या विष्ठेपर्यंत सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करता येतो. तसेच रेशीमधाग्याला बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे न वळता या प्रकाराच्या शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी, कोल्हापूर येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘तुतीच्या पानापासून औषधी गोळ्यांचे उत्पादन’ या विषयावर आधारित मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ, पुणेचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम होते. प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठ प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. डी. जाधव, शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे मुख्य समन्वयक डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. ए. भागवत यांनी सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक प्रा. यू. एस. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांच्यासह प्रशिक्षण शिबिरासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, आदी जिल्ह्यांतील २००हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)