शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिरोळ तालुक्यात बचावकार्य थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:25 IST

संदीप बावचे शिरोळ : शिरोळ तालुक्यात बचावकार्य थांबविण्यात आले आहे. तालुक्यात महापुराचे चित्र अजूनही कायम आहे. सोमवारी दिवसभरामध्ये अंकली ...

संदीप बावचे

शिरोळ : शिरोळ तालुक्यात बचावकार्य थांबविण्यात आले आहे. तालुक्यात महापुराचे चित्र अजूनही कायम आहे. सोमवारी दिवसभरामध्ये अंकली येथे कृष्णेची पातळी एक फुटाने कमी झाल्याने शिरोळकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पूर ओसरल्यानंतर नियोजनाची तयारी आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरू झाली आहे. त्यासाठी गावनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुक्रवार (दि.२३) पासून शिरोळ तालुक्यात कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. बघता बघता महापूर आला. खबरदारी म्हणून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही प्रतिसाद दिला. तीन दिवसांत जवळपास ७६ हजार पूरग्रस्त स्थलांतरित झाले. पशुधनालाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दरम्यान, सोमवारी दोन-चार गावातील अपवाद वगळता बचावकार्य मोहीम थांबवून संपर्क तुटलेल्या गावात जीवनावश्यक वस्तू व औषधे बोटीच्या माध्यमातून पाठवून मदतीचा ओघ सुरू आहे. छावणीमध्ये वैद्यकीय पथकामर्फत सेवा दिली जात आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावर उदगाव येथे कृष्णा नदीच्या पुराचे पाणी अद्याप कायम आहे. सोमवारी सायंकाळी अंकली पुलाजवळ पाणी पातळी ५७.०३ फूट होती. तर राजापूर बंधारा व कुरूंदवाड पुलाजवळ नदीची पातळी स्थिर होती.

माणुसकीचे चित्र

शिरोळ तालुक्यात ४४ पूरग्रस्त छावण्या असून दत्त, गुरुदत्त कारखाना, शरद कृषी महाविद्यालय, राजेंद्र पाटील-यड्रावकर फौंडेशन, भाजप युवा मोर्चा, वाघजाई ग्रुप, शिरोळ, जयसिंगपूर, कुरूंदवाड नगरपालिका यासह सेवाभावी संस्था, शिक्षक संघटना, राजकीय पक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना चहा, नाष्टा, जेवण दिले जात आहे. छावणीमध्ये जवळपास १५ हजार पूरग्रस्त आहेत. तर उर्वरित पूरग्रस्त पै-पाहुणे, नातेवाइकांकडे गेले आहेत.

...........

शिरोळकडून शेजारधर्म

शिरोळ शहराकडून शेजारधर्म पाळला जात आहे. नांदणी येथे पूरग्रस्तांच्या जनावरांची वैरणीअभावी बिकट अवस्था झाल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटना व सागर संभूशेटे यांच्या पुढाकाराने जयसिंगपूरचे उद्योजक संदीप चकोते यांच्याकडून १५० जनावरांना कडबाकुट्टीचे वाटप करण्यात आले.

फोटो ओळ :२६ शिरोळ भोजन

शिरोळ निवारा केंद्रात सोमवारी इचलकरंजी येथील श्रीराम ग्रुपच्यावतीने पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.