शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

महालक्ष्मी, हरिप्रिया एक्सप्रेसचा प्रवास आता आरामदायी होणार, येत्या गुरुवारपासून नव्या एलएचबी कोचसह धावणार  

By संदीप आडनाईक | Updated: January 23, 2024 18:15 IST

प्लॅटफॉर्मवर जाण्यास आता लिफ्ट

कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे आणि तिरुपतीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आणि तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच बदलून आता नवीन एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. उद्या, गुरुवारपासून प्रवासी या नवीन कोचमधून आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेणार आहेत.कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती-कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेसमधून व्यवसाय, शिक्षण तसेच पर्यटनासाठी रोज हजारो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करतात. मध्य रेल्वेने या रेल्वेला लावलेले जुने आणि पारंपरिक आयसीएफ कोच आता बदलले आहेत. तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १७४१५/१७४१६) आज, दिनांक २४ जानेवारीपासून तिरुपतीहून आणि २७ जानेवारीपासून कोल्हापूरपासून तसेच कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्सप्रेसचे २३ कोच उद्या, गुरूवार, दि. २५ जानेवारी रोजी रात्रीपासून पारंपारिकऐवजी एलएचबी कोचसह धावणार आहेत. ही गाडी रोज कोल्हापूर येथून रात्री ८.५० वाजता सुटते. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उद्या गुरुवारी रात्री ७.३० वाजता हा विशेष समारंभ होत आहे.

लिफ्ट बिल्डचे उद्या उदघाटनयाशिवाय प्रवाशांसाठी विविध प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीच्या लिफ्ट बिल्डचे उदघाटन उद्या रात्री खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. 

रेल्वेचे महाव्यवस्थापक उद्या कोल्हापुरातदरम्यान, अमृत योजनेतील रेल्वेस्थानक पुनर्विकास कामाची पाहणीसाठी उद्या, बुधवारी सकाळी ७.३० वाजता रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासोबत विभागीय व्यवस्थापक इंदुरानी दुबे,  वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, जनसंपर्क अधिकारी रामपाल बडबग्गा, रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी आदी उपस्थित राहणार आहेत.

हे आहे नव्या कोचचे वैशिष्ट्यवजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता तसेच स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावण्यात आल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या दोन्ही गाड्यांना मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक आणि प्रवाशांचा प्रतिसाद आहे. गेल्या काही वर्षापासून या गाडीचे जुने कोच बदलून नवीन कोच बसवण्यात यावे अशी मागणी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे