शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

Kolhapur: शासनाकडून वारंवार अन्याय, आम्हा आजरावासियांना गोवा राज्यात पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:29 IST

पंतप्रधानांकडे सामाजिक संघटनांची मागणी

आजरा : आजरा तालुक्यातील जनतेवर राज्यशासनाकडून वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राऐवजी गोवा राज्यात पाठवा. त्यामुळे विकासाबरोबर रोजगार व पर्यटनाला वाव मिळेल अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी पंतप्रधान,राष्ट्रपती, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली व तहसिलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.आजरा तालुक्यात धरणे झाली लाभ गडहिंग्लज व कर्नाटकाला झाला. जमिनी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या. आजऱ्याचे गडहिंग्लजचे प्रांत कार्यालय उत्तूरला द्या अशी मागणी असताना गारगोटीला हलविले. आजऱ्यातील काजू बोंडांवर फेणी उद्योग सुरू करण्याची गेल्या ४० वर्षांच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. तालुक्यात रामतीर्थ, चाळोबा यासारख्या पर्यटन स्थळांचा आजही विकास झालेला नाही. त्यामुळे पर्यटनाला संधी मिळत नाही. आजऱ्यात घनसाळ तांदूळ, नाचणा, मिरची यासह पिकल्या जाणाऱ्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नाही. तालुक्याला दोन मंत्री व एक मुख्यमंत्र्यांचे आमदार असताना तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एकही मोठा उद्योग उभा राहिलेला नाही. त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात युवक गोवा राज्यात जात आहेत.पोल्ट्री व्यवसायातून तयार होणाऱ्या कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात मागणी आहे. काजूची बोंडे मोठ्या प्रमाणात विक्री केली जातात. गोवा राज्यात मराठी भाषिकांची संख्या १५ ते २० टक्के आहे.आजऱ्यातील कृषी मालाला पणजी बंदरामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकेल या सर्व मागण्यांचा विचार करता महाराष्ट्राला जय महाराष्ट्र करून आम्हाला गोवा राज्यात समाविष्ट करून घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तानाजी देसाई,प्रकाश कोंडूसकर, राजू होलम, जी. एम. पाटील, निवृत्ती कांबळे, सखाराम केसरकर, संजय तरडेकर, शिवाजी गुरव यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.जि.प.मतदारसंघ नको पण गोव्यात जाण्यास परवानगी द्यातालुक्यातील जनतेवर राज्य शासनाकडून आजपर्यंत अन्याय झाला आहे. आता जि. प. मतदार संघ कमी करून विकासकामाला खो घातला आहे. त्यामुळे जि.प.मतदार संघ नको पण गोवा राज्यात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी प्रकाश कोंडूसकर व राजू होलम यांनी केली.गावागावात जाऊन वातावरण निर्मिती करणार गोव्यात समाविष्ट करण्यासाठी व झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन नागरिकांत जनजागृती करणार आहे असे तानाजी देसाई व संजय तळेकर यांनी सांगितले.