शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Kolhapur: शासनाकडून वारंवार अन्याय, आम्हा आजरावासियांना गोवा राज्यात पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:29 IST

पंतप्रधानांकडे सामाजिक संघटनांची मागणी

आजरा : आजरा तालुक्यातील जनतेवर राज्यशासनाकडून वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राऐवजी गोवा राज्यात पाठवा. त्यामुळे विकासाबरोबर रोजगार व पर्यटनाला वाव मिळेल अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी पंतप्रधान,राष्ट्रपती, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली व तहसिलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.आजरा तालुक्यात धरणे झाली लाभ गडहिंग्लज व कर्नाटकाला झाला. जमिनी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या. आजऱ्याचे गडहिंग्लजचे प्रांत कार्यालय उत्तूरला द्या अशी मागणी असताना गारगोटीला हलविले. आजऱ्यातील काजू बोंडांवर फेणी उद्योग सुरू करण्याची गेल्या ४० वर्षांच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. तालुक्यात रामतीर्थ, चाळोबा यासारख्या पर्यटन स्थळांचा आजही विकास झालेला नाही. त्यामुळे पर्यटनाला संधी मिळत नाही. आजऱ्यात घनसाळ तांदूळ, नाचणा, मिरची यासह पिकल्या जाणाऱ्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नाही. तालुक्याला दोन मंत्री व एक मुख्यमंत्र्यांचे आमदार असताना तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एकही मोठा उद्योग उभा राहिलेला नाही. त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात युवक गोवा राज्यात जात आहेत.पोल्ट्री व्यवसायातून तयार होणाऱ्या कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात मागणी आहे. काजूची बोंडे मोठ्या प्रमाणात विक्री केली जातात. गोवा राज्यात मराठी भाषिकांची संख्या १५ ते २० टक्के आहे.आजऱ्यातील कृषी मालाला पणजी बंदरामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकेल या सर्व मागण्यांचा विचार करता महाराष्ट्राला जय महाराष्ट्र करून आम्हाला गोवा राज्यात समाविष्ट करून घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तानाजी देसाई,प्रकाश कोंडूसकर, राजू होलम, जी. एम. पाटील, निवृत्ती कांबळे, सखाराम केसरकर, संजय तरडेकर, शिवाजी गुरव यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.जि.प.मतदारसंघ नको पण गोव्यात जाण्यास परवानगी द्यातालुक्यातील जनतेवर राज्य शासनाकडून आजपर्यंत अन्याय झाला आहे. आता जि. प. मतदार संघ कमी करून विकासकामाला खो घातला आहे. त्यामुळे जि.प.मतदार संघ नको पण गोवा राज्यात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी प्रकाश कोंडूसकर व राजू होलम यांनी केली.गावागावात जाऊन वातावरण निर्मिती करणार गोव्यात समाविष्ट करण्यासाठी व झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन नागरिकांत जनजागृती करणार आहे असे तानाजी देसाई व संजय तळेकर यांनी सांगितले.