शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शासनाकडून वारंवार अन्याय, आम्हा आजरावासियांना गोवा राज्यात पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:29 IST

पंतप्रधानांकडे सामाजिक संघटनांची मागणी

आजरा : आजरा तालुक्यातील जनतेवर राज्यशासनाकडून वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राऐवजी गोवा राज्यात पाठवा. त्यामुळे विकासाबरोबर रोजगार व पर्यटनाला वाव मिळेल अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी पंतप्रधान,राष्ट्रपती, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली व तहसिलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.आजरा तालुक्यात धरणे झाली लाभ गडहिंग्लज व कर्नाटकाला झाला. जमिनी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या. आजऱ्याचे गडहिंग्लजचे प्रांत कार्यालय उत्तूरला द्या अशी मागणी असताना गारगोटीला हलविले. आजऱ्यातील काजू बोंडांवर फेणी उद्योग सुरू करण्याची गेल्या ४० वर्षांच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. तालुक्यात रामतीर्थ, चाळोबा यासारख्या पर्यटन स्थळांचा आजही विकास झालेला नाही. त्यामुळे पर्यटनाला संधी मिळत नाही. आजऱ्यात घनसाळ तांदूळ, नाचणा, मिरची यासह पिकल्या जाणाऱ्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नाही. तालुक्याला दोन मंत्री व एक मुख्यमंत्र्यांचे आमदार असताना तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एकही मोठा उद्योग उभा राहिलेला नाही. त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात युवक गोवा राज्यात जात आहेत.पोल्ट्री व्यवसायातून तयार होणाऱ्या कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात मागणी आहे. काजूची बोंडे मोठ्या प्रमाणात विक्री केली जातात. गोवा राज्यात मराठी भाषिकांची संख्या १५ ते २० टक्के आहे.आजऱ्यातील कृषी मालाला पणजी बंदरामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकेल या सर्व मागण्यांचा विचार करता महाराष्ट्राला जय महाराष्ट्र करून आम्हाला गोवा राज्यात समाविष्ट करून घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तानाजी देसाई,प्रकाश कोंडूसकर, राजू होलम, जी. एम. पाटील, निवृत्ती कांबळे, सखाराम केसरकर, संजय तरडेकर, शिवाजी गुरव यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.जि.प.मतदारसंघ नको पण गोव्यात जाण्यास परवानगी द्यातालुक्यातील जनतेवर राज्य शासनाकडून आजपर्यंत अन्याय झाला आहे. आता जि. प. मतदार संघ कमी करून विकासकामाला खो घातला आहे. त्यामुळे जि.प.मतदार संघ नको पण गोवा राज्यात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी प्रकाश कोंडूसकर व राजू होलम यांनी केली.गावागावात जाऊन वातावरण निर्मिती करणार गोव्यात समाविष्ट करण्यासाठी व झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन नागरिकांत जनजागृती करणार आहे असे तानाजी देसाई व संजय तळेकर यांनी सांगितले.