शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला ‘लोकसभे’ची पुनरावृत्ती

By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST

राजू सावंत यांचा इशारा : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास वेगळे परिणाम

 कोल्हापूर : महागाई, भ्रष्टाचारासह विविध कारणांमुळे कॉँग्रेस व राष्टÑवादीची निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. यामध्ये मराठा समाजाला दाखविलेले आरक्षणाचे गाजर हे प्रमुख कारण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी याबाबत निर्णय न घेतल्यास कॉँग्रेस आघाडी सरकारला लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज, शुक्रवारी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी दिला. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य व केंद्र सरकारची महागाई कमी करण्याबाबतची उदासीनता, प्रचंड भ्रष्टाचार, बेरोजगारीचे मोठे प्रमाण, वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार याचबरोबर मराठा समाजाला आरक्षणाचे दाखविलेले गाजर, आदी कारणांमुळे कॉँग्रेस व राष्टÑवादीची पीछेहाट झाली आहे. यातून मराठा समाजाचा रोष पत्करण्याची वेळ व ढग फाटल्यावर होणार्‍या अवस्थेसारखी परिस्थिती महाराष्ट्र सरकारवर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी योग्य तो बोध घेऊन शासनाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गेली २५ ते ३० वर्षे महाराष्टÑातील बहुसंख्येने असलेला गरीब मराठा समाज लोकशाही मार्गाने आरक्षणाची मागणी करीत आहे; परंतु आयोग नेमणे, समाजाचा आर्थिक व सामाजिक सर्व्हे करणे, आरक्षण तत्त्वत: मान्य करणे, आदी अनेक कारणे समाजाला दाखविली आहेत. कोणा समाजावर अन्याय करून आम्हाला आरक्षण द्या, अशी कोणतीही मराठा समाजाच्या नेत्यांची भावना नाही. परंतु सरकार याविषयी चालढकल करत आहे. आरक्षणासाठी आग्रही असलेल्या व आरक्षण चळवळीत सातत्याने पाठपुरावा करणार्‍या विविध संघटनांना आगामी काळात एकत्रित करून मराठा आरक्षण या एकाच जाहीरनाम्यावर उमेदवार उभे करण्यासाठी अत्यंत गांभीर्याने चाचपणी केली जाणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)