शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

कामगार कायदे बदलण्याचा निर्णय रद्द करा, काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:28 IST

केंद्र व राज्य सरकारने कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचा निर्णय रद्द करावा, या व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील कामगारांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला

ठळक मुद्देकामगार कायदे बदलण्याचा निर्णय रद्द कराकेंद्र शासनाच्या धोरणाचा कामगार संघटना संयुक्त कृती समिती निषेध

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारने कामगार कायदे स्थगित करण्याचे तसेच कामगार कायदे बदलण्याचा निर्णय रद्द करावा, या व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील कामगारांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.

कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातील खासगी, सरकारी बँका, औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे देशभरातील कामगार कोरोना परिस्थितीत जिवावर उदार होऊन कामावर येत आहेत. दुसरीकडे केंद्र शासन कामगार कायदे रद्द करून त्यांचा विश्वासघात करीत आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने प्रवासी मजुरांबद्दल घेतलेली भूमिका अमानुष आहे.

मानवतेला काळिमा फासणारी आहे. काही राज्यांनी कामगार कायदे स्थगित केल्याच्या घोषणा केल्या आहेत. कामगार कायदे हे कामगार या सामाजिक आर्थिक घटकाला संरक्षण देण्यासाठी तयार झाले आहेत. कामगारांची ८ वरून १२ तास काम करण्याची घोषणा केली आहे.कामगारांच्या पिळवणुकीसाठीच वेळ वाढविली आहे. कामगारांवरील अन्याय दूर केला नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल. यावेळी दिलीप पवार, एस. बी. पाटील, अतुल दिघे, प्रा. सुभाष जाधव, सुवर्णा तळेकर, प्रकाश जाधव, अनंत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.बँक कर्मचारीही काळ्या फिती लावूनखासगी, सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनीही शुक्रवारी काळ्या फिती लावून काम केले. इंटक, एचएमएस, सिटू अशा ११ पेक्षा जास्त संघटना यामध्ये सहभागी झाल्या असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे कोल्हापूर शाखेचे सेक्रेटरी विकास देसाई यांनी दिली.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मजुरांच्या पगारामध्ये कपात करू नये, कामगार कपात करू नये असे सांगितले जाते. दुसरीकडे मात्र, याची अंमलबजावणी होत नसून हा विरोधाभास आहे. या सर्वाला विरोध म्हणून काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला.- एस. बी. पाटील,कामगार संघटना संयुक्त कृती समिती

केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामध्ये महावितरण, विमा, औद्योगिक वसाहत, खासगी क्षेत्र येथील एक लाखांपेक्षा जास्त कामगारांनी सहभाग घेतला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या मागण्यांची दखल सरकारने घ्यावी अन्यथा पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन करावे लागेल. तसेच महाराष्ट्रात कामगारांच्या आंदोलनाला शह देण्यासाठी भाजपनेही काळ्या फिती लावून आंदोलन करून खोडसाळपणाचा प्रयत्न केला आहे.- दिलीप पवार, भाकपचे ज्येष्ठ नेते

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर