शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

डागडुजी अडकली लालफितीत

By admin | Updated: December 1, 2014 21:03 IST

सोहाळे येथील बंधारा : यंदा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होणार गंभीर ?

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर बांधण्यात आलेल्या सोहाळे येथील कोल्हापूर पद्धतीच्या उपबंधाऱ्याचे बरगे सडल्याने पाणी अडविण्याच्या कोणत्याच हालचाली सुरू नसल्याने सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रांतील शेतीच्या पिकासाठी व सोहाळे, बाची येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असून, नव्या बरग्यांकरिता वर्कआॅर्डर त्वरित न झाल्यास ऐन उन्हाळ्यात नदीकाठाची पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.साळगाव, सोहाळे, बाची, आजरा व पारपोली क्षेत्रांतील काही भाग असा सुमारे २०० हेक्टर लाभक्षेत्र गृहीत धरून २००३ साली सोहाळे येथे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शासनातर्फे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. गेले तीन वर्षे या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते; परंतु बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे सडल्याने गरजेवेळी पाण्याचा दाब वाढल्यामुळे हे दरवाजे निखळून साठविलेले पाणी वाहून जात आहे. यावर्षी अद्याप पाणी साठविण्याच्या कोणत्याच हालचाली सुरू नाहीत.राजीव गांधी सिंचन व कृषी विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून पाणी देण्यात येईल, असे जलसंधारण विभागाने यावर्षी स्पष्ट केले आहे; पण सद्य:स्थितीला सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्चाची केवळ बरगे व डागडुजीकरिता तरतूद करावी लागणार आहे. जलसंधारण विभागाकडून वर्कआॅर्डर वेळेत न निघाल्याने यावर्षी बंधाऱ्यात पाणी साठविण्याबाबत साशंकता आहे.बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यावर उन्हाळी पिकांसह उसाचे भवितव्य अवलंबून आहे. अनेक शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात यावर्षी पाणी साठणार नाही म्हणून उन्हाळी पिकेही घेतलेली नाहीत. तसेच पिण्याच्या पाण्याकरिता सोहाळेकरांना भटकंती करावी लागण्याची चिन्हे आहेत. जलसंधारण विभागाने बरग्यांकरिता प्रयत्न केल्यास आजही या बंधाऱ्यात पाणी साठू शकते. साळगाव बंधारा ते सोहाळे बंधारा दरम्यानच्या शेतकऱ्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही.शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी जमा नाही : स्वामीबंधाऱ्याची डागडुजी व शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० टक्क्यांप्रमाणे लोकवर्गणीनुसार ११ ते साडेअकरा लाख रुपये जमा होणे आवश्यक आहे. लोकवर्गणी जमा झाल्याशिवाय नियमानुसार वर्कआॅर्डर देता येत नाही, असे जलसंधारणचे सहायक अभियंता यु. आर. स्वामी यांनी सांगितले.लोकवर्गणीसाठी पत्रव्यवहार सुरू : दोरुगडेलोकवर्गणी शेतकऱ्यांनी त्वरित जमा करावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू असून, लोकवर्गणीबाबत शेतकऱ्यांमध्ये मतभेद असल्याने लोकवर्गणी जमा होण्यात अडचणी येत आहेत. नव्या बरग्यांबाबत त्वरित हालचाली झाल्यास लोकवर्गणी जमा होण्यास मदत होणार असल्याने बंधाऱ्याची देखरेख जबाबदारी असणाऱ्या पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत दोरुगडे यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी जमा नाही : स्वामीबंधाऱ्याची डागडुजी व शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० टक्क्यांप्रमाणे लोकवर्गणीनुसार ११ ते साडेअकरा लाख रुपये जमा होणे आवश्यक आहे. लोकवर्गणी जमा झाल्याशिवाय नियमानुसार वर्कआॅर्डर देता येत नाही, असे जलसंधारणचे सहायक अभियंता यु. आर. स्वामी यांनी सांगितले.लोकवर्गणीसाठी पत्रव्यवहार सुरू : दोरुगडेलोकवर्गणी शेतकऱ्यांनी त्वरित जमा करावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू असून, लोकवर्गणीबाबत शेतकऱ्यांमध्ये मतभेद असल्याने लोकवर्गणी जमा होण्यात अडचणी येत आहेत. नव्या बरग्यांबाबत त्वरित हालचाली झाल्यास लोकवर्गणी जमा होण्यास मदत होणार असल्याने बंधाऱ्याची देखरेख जबाबदारी असणाऱ्या पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत दोरुगडे यांनी स्पष्ट केले.