शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Kolhapur: अमेरिकन मिशन जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढा; मोक्याची, कोट्यवधी रूपयांची जमीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:41 IST

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा करवीर तहसीलदारांना आदेश

कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील अमेरिकन मिशन नावाच्या ५७ एकर १७ गुंठे जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तात्काळ करावी आणि त्याचा अहवाल पाठवावा, असा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी करवीर तहसीलदारांना बुधवारी दिला आहे. याशिवाय वाद मिळकतीत झालेल्या सर्व व्यवहारांची, अनियमिततेची सविस्तर चौकशी करून शर्तभंगाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असाही आदेश त्यांनी करवीर प्रांत अधिकाऱ्यांना दिला आहे. मोक्याच्या, कोट्यवधी रुपयांच्या जमिनीबाबतच्या आदेशाच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.९ नोव्हेंबर २०१५ रोजी जमिनीचा ‘ब’ सत्ताप्रकार बदलून ‘क’ केलेले चुकीचे आहे, अशा तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दीर्घ सुनावणी घेऊन ८ जानेवारी २०२४ रोजी याबाबत निकाल दिला होता. या निकालाला विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले. मात्र, आव्हान याचिकेचा निकाल देताना विभागीय आयुक्तांनीही २१ मे २०२५ रोजी ही जमीन शासनाचीच आहे, यावर शिक्कामोर्तब केले.दरम्यान, विभागीय आयुक्तांनी या जमिनीसंबंधी दिलेल्या निकालाच्या अपिलाचा ९० दिवसांचा कालावधी संपला आहे. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मूळ तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी, करवीर तहसीलदार, करवीर प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी हा आदेश दिला आहे.

मोजणी, अतिक्रमण निश्चित, थेट कारवाई प्रलंबितसंपूर्ण ५७ एकर १७ गुंठे जमिनीची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ५०० कोटींपेक्षा अधिक किंमत होते. यामध्ये अनेक बड्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. यामुळे विभागीय आयुक्तांच्या निकालानंतर जून महिन्यात जमीन मोजणी आणि अतिक्रमण निश्चितीसाठी प्रशासन गेल्यानंतर तीव्र विरोध झाला. यामुळे प्रशासनाने गुगल मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची मोजणी, अतिक्रमण निश्चिती केली. पण, थेट कारवाई प्रलंबित आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशावरील अपिलाची मुदत संपल्याने निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी दिलेल्या आदेशानंतर तरी अतिक्रमण काढण्याची धडक कारवाई होणार का ? याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

कारवाई होईपर्यंत पाठपुरावा..रेखावार यांच्या आदेशानुसार त्यावेळचे नगरभूमापन विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे. या प्रकरणात कितीही वजनदार वरिष्ठ अधिकारीही असले तरी कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करीतच राहणार असे, तक्रारदार देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.