शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राजकीय द्वेषातून कारवाई कराल तर याद राखा, हसन मुश्रीफ यांचा प्रदूषण मंडळाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:22 IST

संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण साऱ्या जिल्ह्यात पसरेल, असा इशारा देत संबंधित ग्रामपंचायतींची तक्रारी नसल्याने वाद संपवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय द्वेषातून कारवाई कराल तर याद राखाहसन मुश्रीफ यांचा प्रदूषण मंडळाला इशारा तक्रारींचे लोण जिल्ह्यात पसरेल

कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण साऱ्या जिल्ह्यात पसरेल, असा इशारा देत संबंधित ग्रामपंचायतींची तक्रारी नसल्याने वाद संपवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार प्रदूषण मंडळाने कारखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे हसन मुश्रीफ यांना समजताच, १५ मिनिटांत ते कार्यालयात दाखल झाले. त्यांनी विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. घोरपडे कारखान्यातून एक थेंबही स्पेंटवॉश बाहेर जात नाही, तीन-चार दिवसांपूर्वी जी घटना घडली, त्याची वस्तूस्थिती वेगळी आहे.

ऊसदर आंदोलनामुळे कारखाना बंद होता, आमच्या चारही ‘ए. टी. पी.’ आॅपरेटर हे बेलेवाडी काळम्मा गावातीलच आहेत. चिकोत्रा नदीत पाणी नसल्याने पाण्यासाठी खड्डे काढले होते, पाणी सोडल्यानंतर गाळ आणि इतर घाण जॅकवेलमध्ये गेल्याने पाणी घाण झाले असावे.

तरीही आमच्या कारखान्याबाबत काही त्रुटी असतील, तर प्रदूषण मंडळाने त्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्याची पूर्तता केली जाईल. आज कोणी बाटली घेऊन आले असेल, तर उद्या आम्ही घागर घेऊन येऊ. जाणीवपूर्वक कारवाई कराल, तर दारात उपोषणाला बसू, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.‘शाहू’ कडे सकारात्मक बघितलेगेली ४० वर्षे ‘शाहू’ कारखान्याचे दूषित पाणी व काजळीने कागल शहर व परिसरातील जनता त्रस्त आहे; पण त्याबद्दल आम्ही कधी तक्रार केली नाही, सकारात्मक दृष्टीनेच बघितल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कारवाई नव्हे कारणे दाखवा नोटीसप्रदूषण मंडळाच्या या कार्यालयाला कारखाना बंद करण्याचे अधिकार नाहीत. पहिल्यांदा कारणे दाखवा नोटीस द्यायची असते, आमच्या खुलाशानंतर तो योग्य नसेल, तर मंडळ पुढील कारवाई करू शकते. असे मुश्रीफ यांनी सांगितले.

बेलेवाडी काळम्मा, बाचणीला नवीन पाणी पुरवठाजिल्ह्यातील जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली आहे, त्यांना त्रास व मन:स्ताप होणार नाही, याची प्राणपनाने दक्षता घेणे माझे कर्तव्य आहे; त्यामुळे बेलेवाडी काळम्मा, बाचणी या गावातील जनतेची मागणी असेल, तर दोन्ही गावांत नवीन पाणी पुरवठा योजना करून देण्यास तयार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर