शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजकीय द्वेषातून कारवाई कराल तर याद राखा, हसन मुश्रीफ यांचा प्रदूषण मंडळाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:22 IST

संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण साऱ्या जिल्ह्यात पसरेल, असा इशारा देत संबंधित ग्रामपंचायतींची तक्रारी नसल्याने वाद संपवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय द्वेषातून कारवाई कराल तर याद राखाहसन मुश्रीफ यांचा प्रदूषण मंडळाला इशारा तक्रारींचे लोण जिल्ह्यात पसरेल

कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण साऱ्या जिल्ह्यात पसरेल, असा इशारा देत संबंधित ग्रामपंचायतींची तक्रारी नसल्याने वाद संपवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार प्रदूषण मंडळाने कारखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे हसन मुश्रीफ यांना समजताच, १५ मिनिटांत ते कार्यालयात दाखल झाले. त्यांनी विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. घोरपडे कारखान्यातून एक थेंबही स्पेंटवॉश बाहेर जात नाही, तीन-चार दिवसांपूर्वी जी घटना घडली, त्याची वस्तूस्थिती वेगळी आहे.

ऊसदर आंदोलनामुळे कारखाना बंद होता, आमच्या चारही ‘ए. टी. पी.’ आॅपरेटर हे बेलेवाडी काळम्मा गावातीलच आहेत. चिकोत्रा नदीत पाणी नसल्याने पाण्यासाठी खड्डे काढले होते, पाणी सोडल्यानंतर गाळ आणि इतर घाण जॅकवेलमध्ये गेल्याने पाणी घाण झाले असावे.

तरीही आमच्या कारखान्याबाबत काही त्रुटी असतील, तर प्रदूषण मंडळाने त्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्याची पूर्तता केली जाईल. आज कोणी बाटली घेऊन आले असेल, तर उद्या आम्ही घागर घेऊन येऊ. जाणीवपूर्वक कारवाई कराल, तर दारात उपोषणाला बसू, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.‘शाहू’ कडे सकारात्मक बघितलेगेली ४० वर्षे ‘शाहू’ कारखान्याचे दूषित पाणी व काजळीने कागल शहर व परिसरातील जनता त्रस्त आहे; पण त्याबद्दल आम्ही कधी तक्रार केली नाही, सकारात्मक दृष्टीनेच बघितल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कारवाई नव्हे कारणे दाखवा नोटीसप्रदूषण मंडळाच्या या कार्यालयाला कारखाना बंद करण्याचे अधिकार नाहीत. पहिल्यांदा कारणे दाखवा नोटीस द्यायची असते, आमच्या खुलाशानंतर तो योग्य नसेल, तर मंडळ पुढील कारवाई करू शकते. असे मुश्रीफ यांनी सांगितले.

बेलेवाडी काळम्मा, बाचणीला नवीन पाणी पुरवठाजिल्ह्यातील जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली आहे, त्यांना त्रास व मन:स्ताप होणार नाही, याची प्राणपनाने दक्षता घेणे माझे कर्तव्य आहे; त्यामुळे बेलेवाडी काळम्मा, बाचणी या गावातील जनतेची मागणी असेल, तर दोन्ही गावांत नवीन पाणी पुरवठा योजना करून देण्यास तयार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर