शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

राजकीय द्वेषातून कारवाई कराल तर याद राखा, हसन मुश्रीफ यांचा प्रदूषण मंडळाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:22 IST

संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण साऱ्या जिल्ह्यात पसरेल, असा इशारा देत संबंधित ग्रामपंचायतींची तक्रारी नसल्याने वाद संपवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय द्वेषातून कारवाई कराल तर याद राखाहसन मुश्रीफ यांचा प्रदूषण मंडळाला इशारा तक्रारींचे लोण जिल्ह्यात पसरेल

कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण साऱ्या जिल्ह्यात पसरेल, असा इशारा देत संबंधित ग्रामपंचायतींची तक्रारी नसल्याने वाद संपवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार प्रदूषण मंडळाने कारखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे हसन मुश्रीफ यांना समजताच, १५ मिनिटांत ते कार्यालयात दाखल झाले. त्यांनी विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. घोरपडे कारखान्यातून एक थेंबही स्पेंटवॉश बाहेर जात नाही, तीन-चार दिवसांपूर्वी जी घटना घडली, त्याची वस्तूस्थिती वेगळी आहे.

ऊसदर आंदोलनामुळे कारखाना बंद होता, आमच्या चारही ‘ए. टी. पी.’ आॅपरेटर हे बेलेवाडी काळम्मा गावातीलच आहेत. चिकोत्रा नदीत पाणी नसल्याने पाण्यासाठी खड्डे काढले होते, पाणी सोडल्यानंतर गाळ आणि इतर घाण जॅकवेलमध्ये गेल्याने पाणी घाण झाले असावे.

तरीही आमच्या कारखान्याबाबत काही त्रुटी असतील, तर प्रदूषण मंडळाने त्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्याची पूर्तता केली जाईल. आज कोणी बाटली घेऊन आले असेल, तर उद्या आम्ही घागर घेऊन येऊ. जाणीवपूर्वक कारवाई कराल, तर दारात उपोषणाला बसू, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.‘शाहू’ कडे सकारात्मक बघितलेगेली ४० वर्षे ‘शाहू’ कारखान्याचे दूषित पाणी व काजळीने कागल शहर व परिसरातील जनता त्रस्त आहे; पण त्याबद्दल आम्ही कधी तक्रार केली नाही, सकारात्मक दृष्टीनेच बघितल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कारवाई नव्हे कारणे दाखवा नोटीसप्रदूषण मंडळाच्या या कार्यालयाला कारखाना बंद करण्याचे अधिकार नाहीत. पहिल्यांदा कारणे दाखवा नोटीस द्यायची असते, आमच्या खुलाशानंतर तो योग्य नसेल, तर मंडळ पुढील कारवाई करू शकते. असे मुश्रीफ यांनी सांगितले.

बेलेवाडी काळम्मा, बाचणीला नवीन पाणी पुरवठाजिल्ह्यातील जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली आहे, त्यांना त्रास व मन:स्ताप होणार नाही, याची प्राणपनाने दक्षता घेणे माझे कर्तव्य आहे; त्यामुळे बेलेवाडी काळम्मा, बाचणी या गावातील जनतेची मागणी असेल, तर दोन्ही गावांत नवीन पाणी पुरवठा योजना करून देण्यास तयार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर