शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल तर याद राखा

By admin | Updated: August 1, 2015 00:07 IST

राजू शेट्टी : रस्त्यावरील लढाई करण्यास सज्ज; उदगाव येथे शेतकरी मेळावा

जयसिंगपूर : ऊस जादा आहे, साखरेला दर नाही, त्यामुळे साखर कारखाने बंद ठेवू असे सांगून शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल, तर याद राखा, असा सज्जड इशारा देत आगामी हंगामात ऊस दरासाठी रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी केले. उसाच्या यंदाच्या एफआरपीसह पुढील वर्षाचीही वाढीव एफआरपी कारखानदारांच्या मानगुटीवर बसून वसूल करणार असल्याचेही यावेळी खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फरीद नदाफ होते. खा. शेट्टी म्हणाले, कारखाने बंद ठेवणार असल्याची आवई साखर कारखानदार आतापासूनच उठवत आहे. साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. त्यांनी जर कारखाने चालू केले नाहीत, तर साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यास भाग पाडू. शेतकरीही ऊस घालवण्यास तयार आहे. सध्या साखरेचे दर बाजारात कोसळले आहेत. जवळपास १ कोटी ६० लाख टन साखर शिल्लक आहे. देशाची गरज २४० लाख टन आहे. तरीही येणाऱ्या हंगामात २६० लाख टन साखर उत्पादित होणार आहे. १ कोटी टन साखर शिल्लक राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने त्वरित साखरेचा ६० लाख टनाचा बफर स्टॉक करावा व उर्वरित साखर निर्यात केल्यास शिल्लक साखरेचा प्रश्न मिटणार आहे. ते हणाले, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगले यश मिळाले आहे. गावातील विकासाच्या धोरणात सदस्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास गावचा विकास होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी स्वाभिमानी तसेच आघाडीमधून निवडून आलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, भगवान काटे, राजेंद्र गड्यान्नावर, अण्णासो चौगुले, जि. प.चे बांधकाम सभापती सीमा पाटील, पं. स.चे सभापती शीला पाटील, उपसभापती वसंत हजारे, जि. प.चे सदस्य सावकर मादनाईक, जि. प.चे सदस्य सुरेश कांबळे, तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांच्यासह सर्व पदाधिकारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) एफआरपी बदलल्यास गंभीर परिणामखा. शेट्टी म्हणाले, सन २०१५-१६ च्या गळीत हंगामासाठी एफआरपीमध्ये १०० रुपयाने वाढ झालेली आहे. त्यातच साखर कारखानदार साखरेच्या दराची भीती घालून एफआरपी बंद करा, अशी ओरड सुरू करत आहेत. एफआरपी बदलण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.