शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 04:02 IST

उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन १०० रुपयांनी वाढवून ती २८५० करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे. कारण त्याशिवाय ही एफआरपी देणे कारखान्यांना शक्य होणार नाही.गेली दोन वर्षे उसाची एफआरपी २७५० रुपये प्रतिटन कायम होती. यावर्षी त्यात प्रतिटन १०० रुपये वाढ करण्याला आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २८५ रुपये देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात मागील हंगामात उसाचे अपेक्षित उत्पादन झाले नव्हते. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.५० टक्के आहे. त्यामुळे प्रतिटन ३२७७.५० रुपये एफआरपी निघते. त्यातून ऊस तोडणी-ओढणी प्रतिटन ६२५ रुपये वजा जाता उर्वरित २६५२ रुपये ५० पैसे ऊस उत्पादकांच्या हातात मिळतील.>दृष्टिक्षेपात राज्याचा आगामी हंगामउसाचे उत्पादन साखर उत्पादन एफआरपी (तोडणी-ओढणीसह)९०० लाख टन १०५ लाख टन ३२७७.५० रुपये प्रतिटनकेंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय जरी झाला तरी निर्यात दरात वाढ करण्याची मागणी होत आहे.>उत्पादन खर्च वाढत असल्याने वाढीव एफआरपीचे स्वागत करतो. मात्र, त्याबरोबर साखरेचा किमान दर वाढविणे अपेक्षित होते. जर सुपातच नसेल, तर जात्यात कोठून येणार?- पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ