शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंग परिसरातील मिळकतींना दिलासा

By admin | Updated: June 13, 2015 00:49 IST

अंतराचे निकष बदलले : ५०० वरून १५० मीटरचा निकष

संतोष पाटील - कोल्हापूर -राज्यात तुरुंगाभोवती १८२ मीटर परिसरात बांधकामासाठी परवानगी नव्हती. तसेच ५०० मीटर परिघातील मिळकतींना कडक नियमावलीतून जावे लागते. यामध्ये बदल करून आता फक्त तुरुंगापासून १५० मीटर परिघातील जागा ‘ना विकास क्षेत्र’ राहणार आहे. यामुळे कळंबा व बिंदू चौक तुरुंग परिसरातील तब्बल पाच हजार मिळकतींना या नव्या नियमाचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच तुरुंग परिसरातील बांधकामांसाठी अंतराचे निकष जाहीर केले. केंद्र शासनाच्या तुरुंग नियमावलीनुसारच राज्य शासनही निकष ठेवणार आहे. शहरातील तुरुंगांसाठी १५० मीटर, जिल्हा पातळीवरील तुरुंगांसाठी १०० मीटर, तर खुल्या तुरुंगांसाठी ५० मीटर परिसरात ‘ना विकास क्षेत्र’ लागू राहणार आहे. यापूर्वी हे अंतर ५०० मीटरपर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाचा मानस होता. तसेच १५० ते ५०० मीटर अंतरात येणाऱ्या बांधकामांना घरांची उंची २० फु टांपेक्षा अधिक वाढविण्यास मज्जाव करण्यात आला होता. या कडक नियमाच्या कात्रीत शहरातील तब्बल २५ हजार मिळकती अडकून होत्या.अंतराच्या निकषामुळे बिंदू चौकापासून ५०० मीटर परिघातील बांधकामे बाधित होणार होती. यामुळे निम्म्या मध्यवर्ती शहराला या नियमाचा फटका बसणार होता; तर कळंबा जेलमुळे कळंबा गाव, पाचगावातील काही परिसर, साळोखे कॉलनी, गणेश कॉलनी, तपोवन परिसर, मोहिते कॉलनी, देवकर पाणंद येथील काही भाग बाधित होता. त्यामुळे तुरुंग परिसरातील बांधकामांचे निकष बदलण्याची मागणी यापूर्वी महापालिका सभागृहात नगरसेवक आदिल फरास व मधुकर रामाणे यांनी उचलून धरली होती. तुरुंग परिसरातील बांधकामांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा कांगावा केला जात आहे. देशातील इतर ठिकाणचे नियम व राज्यातील नियम यांत फरक आहे. हे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सभागृहात झाली होती. मात्र, हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने प्रशासनाचीही कोंडी होती. आता अंतराचे निकष बदलण्यात आल्याने या परिसरातील मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.असा होता पूर्वीचा नियम...१५० मीटरपर्यंत ‘ना विकास क्षेत्र,’ तसेच १५० ते ५०० मीटर अंतरात येणाऱ्या बांधकामांना घरांची उंची २० फु टांपेक्षा अधिक वाढविण्यास प्रतिबंध. परवानगीसाठी जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, तुरुंग अधीक्षक यांच्या समितीची परवानगी आवश्यक असे. आतापर्यंत फक्त तीन मिळकतींना समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. आता निकष बदलल्याने कडक नियमांतून शहरातील तब्बल पाच हजार मिळकतींना दिलासा मिळेल, असे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले.