शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंग परिसरातील मिळकतींना दिलासा

By admin | Updated: June 13, 2015 00:49 IST

अंतराचे निकष बदलले : ५०० वरून १५० मीटरचा निकष

संतोष पाटील - कोल्हापूर -राज्यात तुरुंगाभोवती १८२ मीटर परिसरात बांधकामासाठी परवानगी नव्हती. तसेच ५०० मीटर परिघातील मिळकतींना कडक नियमावलीतून जावे लागते. यामध्ये बदल करून आता फक्त तुरुंगापासून १५० मीटर परिघातील जागा ‘ना विकास क्षेत्र’ राहणार आहे. यामुळे कळंबा व बिंदू चौक तुरुंग परिसरातील तब्बल पाच हजार मिळकतींना या नव्या नियमाचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच तुरुंग परिसरातील बांधकामांसाठी अंतराचे निकष जाहीर केले. केंद्र शासनाच्या तुरुंग नियमावलीनुसारच राज्य शासनही निकष ठेवणार आहे. शहरातील तुरुंगांसाठी १५० मीटर, जिल्हा पातळीवरील तुरुंगांसाठी १०० मीटर, तर खुल्या तुरुंगांसाठी ५० मीटर परिसरात ‘ना विकास क्षेत्र’ लागू राहणार आहे. यापूर्वी हे अंतर ५०० मीटरपर्यंत वाढविण्याचा राज्य शासनाचा मानस होता. तसेच १५० ते ५०० मीटर अंतरात येणाऱ्या बांधकामांना घरांची उंची २० फु टांपेक्षा अधिक वाढविण्यास मज्जाव करण्यात आला होता. या कडक नियमाच्या कात्रीत शहरातील तब्बल २५ हजार मिळकती अडकून होत्या.अंतराच्या निकषामुळे बिंदू चौकापासून ५०० मीटर परिघातील बांधकामे बाधित होणार होती. यामुळे निम्म्या मध्यवर्ती शहराला या नियमाचा फटका बसणार होता; तर कळंबा जेलमुळे कळंबा गाव, पाचगावातील काही परिसर, साळोखे कॉलनी, गणेश कॉलनी, तपोवन परिसर, मोहिते कॉलनी, देवकर पाणंद येथील काही भाग बाधित होता. त्यामुळे तुरुंग परिसरातील बांधकामांचे निकष बदलण्याची मागणी यापूर्वी महापालिका सभागृहात नगरसेवक आदिल फरास व मधुकर रामाणे यांनी उचलून धरली होती. तुरुंग परिसरातील बांधकामांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा कांगावा केला जात आहे. देशातील इतर ठिकाणचे नियम व राज्यातील नियम यांत फरक आहे. हे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सभागृहात झाली होती. मात्र, हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने प्रशासनाचीही कोंडी होती. आता अंतराचे निकष बदलण्यात आल्याने या परिसरातील मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.असा होता पूर्वीचा नियम...१५० मीटरपर्यंत ‘ना विकास क्षेत्र,’ तसेच १५० ते ५०० मीटर अंतरात येणाऱ्या बांधकामांना घरांची उंची २० फु टांपेक्षा अधिक वाढविण्यास प्रतिबंध. परवानगीसाठी जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, तुरुंग अधीक्षक यांच्या समितीची परवानगी आवश्यक असे. आतापर्यंत फक्त तीन मिळकतींना समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. आता निकष बदलल्याने कडक नियमांतून शहरातील तब्बल पाच हजार मिळकतींना दिलासा मिळेल, असे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले.