शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

उचंगी व सर्फनाला धरणाच्या पुनर्वसनाची कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST

आजरा :आजरा तालुक्यातील उचंगी व सर्फनाला प्रकल्पांची स्वेच्छा पुनर्वसनासह जमीन वाटप, पॅकेज वाटप, गायरान जमिनींचे प्रस्ताव, संकलन दुरुस्ती, निर्वाहक ...

आजरा :आजरा तालुक्यातील उचंगी व सर्फनाला प्रकल्पांची स्वेच्छा पुनर्वसनासह जमीन वाटप, पॅकेज वाटप, गायरान जमिनींचे प्रस्ताव, संकलन दुरुस्ती, निर्वाहक क्षेत्राचे प्रस्ताव यासह पुनर्वसनाची सर्व कामे महसूल विभागाकडून वेगाने सुरू आहेत. दोन्ही प्रकल्प मार्गी लागण्याच्यादृष्टीने काही त्रुटी असल्यास धरणग्रस्तांनी त्या दुरुस्तीच्यादृष्टीने महसूल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केले.

उचंगी प्रकल्पामध्ये उचंगी, जेऊर, चितळे, चाफवडे या गावांतील एकूण २९८ प्रकल्पग्रस्तांचे १५४.८४ हेक्टर इतके क्षेत्र बुडित असून यापैकी २८ प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा घेतलेली आहे. यापैकी १४ प्रकल्पग्रस्तांना ८२ लाख ५० हजार रकमेचे वाटप केले असून १४ प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही.

६५ टक्के रक्कम भरलेली व पर्यायी जमीन मिळण्यास पात्र असे २२० प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना १३०.३२ हेक्टर जमीन देय आहे. यातील एकूण १३१ प्रकल्पग्रस्तांना ६८.६८ हेक्टर इतकी जमीन वाटप करण्यात आली असून ४६ प्रकल्पग्रस्तांना ८ कोटी ८० लाख इतके आर्थिक साहाय्य वाटप करण्यात आले आहे. एकूण ३ प्रकल्पग्रस्तांचे पॅकेज प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे सादर करण्यात आले आहे.

उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जेऊर येथील ४.२७ हेक्टर आणि चितळे येथील १६.८६ हेक्टर अशी एकूण २१.१३ हेक्टर जमीन वाटपास उपलब्ध करण्यासाठी मंजुरी प्राप्त झालेली आहे. २३४ लाखांचे ८१ प्रकल्पग्रस्तांना पॅकेज करारनामे कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले आहेत, तर संकलन रजिस्टर सर्वांच्या माहितीकरिता चाफवडे येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्फनाला प्रकल्पामध्ये एकूण २२९ प्रकल्पग्रस्तांपैकी ११ जणांनी स्वेच्छा घेतली आहे. तीनजण अपात्र झाले आहेत. १९० जणांनी ६५ टक्केप्रमाणे रक्कम भरली असून १६ जण भूमिहीन आहेत. याकरिता एकूण देय क्षेत्र १८८ हेक्टर इतके आहे. १३१ प्रकल्पग्रस्तांना १०९.६२ हे. आर. क्षेत्र वाटप केले आहे. १३२ प्रकल्पग्रस्तांना ८२.०१ हे. आर. क्षेत्र देय आहे.

चार वर्षामध्ये जमीन वाटपाचे ३६ आदेश काढून १४.९१ हे. आर. इतकी जमीन वाटप करण्यात आली आहे. देवर्डे येथील २१.५९ हे. आर. आणि पारपोली येथील ४०.५३ हे. आर. अशी एकूण ६२.१२ हे. आर. इतकी गायरान जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कलम १८ अंतर्गत वाढीव मोबदला मिळणेबाबत दाखल करण्यात आलेल्या एकूण ८० पैकी ७७ दावे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती निकालात काढण्यात आले आहेत व ही रक्कम ७ कोटी ४४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त सर्फनाला मध्यम प्रकल्पातील बुडित क्षेत्रामधील संपादित करावयाच्या जमिनीसाठी निवाड्याची कार्यवाहीदेखील सुरू असल्याचेही प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार विकास अहिर उपस्थित होते.

चालू वर्षी पाणी अडविणार नाही

उचंगी व सर्फनाला धरणाचे पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. धरणाचे कामही ८० टक्के झाले आहे. अजूनही धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, घळभरणीचे काम करून पाणी अडविण्याचे नियोजन चालू वर्षात नाही, असेही प्रांताधिकारी खिलारी यांनी सांगितले.