शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अंबाईवाडीच्या १८ कुटुंबांचे पुनर्वसन : दरडी कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:56 IST

प्रविण देसाई ।कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाही देण्यात आला. जिल्ह्यात भूस्खलन धोक्याच्या यादीत १९ गावे असून, त्यांच्याही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.जुलै २०१४ मध्ये ...

प्रविण देसाई ।कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाही देण्यात आला. जिल्ह्यात भूस्खलन धोक्याच्या यादीत १९ गावे असून, त्यांच्याही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.

जुलै २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात माळीणची दुर्घटना घडली होती. दरड कोसळून यामध्ये जीवितहानी झाली हाती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भूस्खलन, तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार केली आहे. त्यानुसार या गावांतील कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांच्या पुनर्वसनाचीही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक धोका असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडी या डोंगरावरील वाडीचे दीड किलोमीटर अंतरावर उखळू गावातच सुरक्षित ठिकाणी जिल्हा प्रशासनाने दोन एकर जागा देऊन पुनर्वसन केले आहे.

या वाडीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या गावाचा संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हेही केला होता. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा, भूस्खलनाचा सर्वाधिक धोका या गावाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी १५ जूनला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी ४ जूनला या १८ कुटुंबांना जागेची मोजणी करून व सात-बारा नावावर करून जागेचा ताबा दिला.भूस्खलनाच्या धोक्याची गावेराधानगरी तालुक्यातील कुऱ्हाडवाडी, ऐनीपैकी धरमलेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पंडेवाडी, पाटपन्हाळा, सोळांकूर-रामनगर या गावांसह भुदरगड तालुक्यातील पडखंबेपैकी खोतवाडी, पडखंबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कारिवडेपैकी हाणफोडेवाडी, टिक्केवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी (सामानगडाच्या पायथ्याशी), पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी, शाहूवाडी तालुक्यात उखळूपैकी अंबाईवाडी या गावांचा भूस्खलनाच्या धोक्याच्या यादीत समावेश आहे. 

भूस्खलनाचा व दरड कोसळण्याचा धोका असलेल्या उखळूपैकी अंबाईवाडी या गावाचे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन केले आहे. जिल्हा प्रशासनाने येथील १८ कुटुंबांना जमीन देऊन त्यावर प्लॉट पाडून त्यांच्या ताब्यात दिले आहेत.- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी