शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

अंबाईवाडीच्या १८ कुटुंबांचे पुनर्वसन : दरडी कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:56 IST

प्रविण देसाई ।कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाही देण्यात आला. जिल्ह्यात भूस्खलन धोक्याच्या यादीत १९ गावे असून, त्यांच्याही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.जुलै २०१४ मध्ये ...

प्रविण देसाई ।कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाही देण्यात आला. जिल्ह्यात भूस्खलन धोक्याच्या यादीत १९ गावे असून, त्यांच्याही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.

जुलै २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात माळीणची दुर्घटना घडली होती. दरड कोसळून यामध्ये जीवितहानी झाली हाती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भूस्खलन, तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार केली आहे. त्यानुसार या गावांतील कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांच्या पुनर्वसनाचीही प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक धोका असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडी या डोंगरावरील वाडीचे दीड किलोमीटर अंतरावर उखळू गावातच सुरक्षित ठिकाणी जिल्हा प्रशासनाने दोन एकर जागा देऊन पुनर्वसन केले आहे.

या वाडीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या गावाचा संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हेही केला होता. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा, भूस्खलनाचा सर्वाधिक धोका या गावाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी १५ जूनला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी ४ जूनला या १८ कुटुंबांना जागेची मोजणी करून व सात-बारा नावावर करून जागेचा ताबा दिला.भूस्खलनाच्या धोक्याची गावेराधानगरी तालुक्यातील कुऱ्हाडवाडी, ऐनीपैकी धरमलेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पंडेवाडी, पाटपन्हाळा, सोळांकूर-रामनगर या गावांसह भुदरगड तालुक्यातील पडखंबेपैकी खोतवाडी, पडखंबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कारिवडेपैकी हाणफोडेवाडी, टिक्केवाडी, गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी (सामानगडाच्या पायथ्याशी), पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी, शाहूवाडी तालुक्यात उखळूपैकी अंबाईवाडी या गावांचा भूस्खलनाच्या धोक्याच्या यादीत समावेश आहे. 

भूस्खलनाचा व दरड कोसळण्याचा धोका असलेल्या उखळूपैकी अंबाईवाडी या गावाचे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन केले आहे. जिल्हा प्रशासनाने येथील १८ कुटुंबांना जमीन देऊन त्यावर प्लॉट पाडून त्यांच्या ताब्यात दिले आहेत.- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी