शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘बालविकास’ची तयारी करणाऱ्या दीड लाख विद्यार्थांच्या पोटात गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 13:06 IST

सरळसेवेने भरती होणार असल्याचे समजून गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

संतोष मिठारी

कोल्हापूर : राज्य शासनाने महिला व बालविकास विभागांतर्गत (गट अ, ब) संवर्गातील पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आणली आहे. नियम सुधारित झाल्यास या विभागातील पदभरतीची परीक्षा राज्यसेवेच्या माध्यमातून घेतली जाईल. त्यामुळे सरळसेवेने भरती होणार असल्याचे समजून गेल्या तीन वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला आहे. आमची तयारी वाया जाणार असून, करिअरच्या दृष्टीने नुकसान होणार असल्याने राज्यसेवेतून नव्हे, तर पूर्वीप्रमाणे सरळसेवेद्वारे पदभरती करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

महिला व बालविकास विभागातील रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी (गट ब) आणि अन्य समकक्ष असणाऱ्या ४५ पदांची भरती प्रक्रिया सन २०१८ मध्ये सरळसेवेतून झाली. त्यानंतर तीन वर्षे झाली, तरी अद्याप या विभागातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. गट अ आणि ब संवर्गातील पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविण्यात येईल, अशी माहिती या विभागाने शासनाच्या ‘डीजीआयपीआर’च्या ट्विटर हँडलवर गेल्या महिन्यात दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यसेवेतून भरती घेण्यास विरोध का?

- सरळसेवेतून या पदांचा भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत असे दोन टप्पे असतात. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यास थेट नोकरी मिळत असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.- आता राज्यसेवेतून भरती प्रक्रिया राबविल्यास परीक्षेचा अभ्यासक्रम, स्वरूप बदलणार आहे. राज्यसेवेमधून भरती करायची होती, तर या विभागाने सन २०१८ मधील परीक्षा झाल्यानंतर ते जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार आम्ही तयारी केली असती.- सरळसेवेने भरती होणार असे समजून आम्ही गेल्या तीन वर्षांपासून तयारी करीत आहोत. अचानक राज्यसेवेद्वारे भरती केल्यास अडचणीचे ठरणार असल्याने आम्ही विरोध करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या विभागातील समकक्ष पदे

निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था अथवा रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, अधीक्षक, सांख्यिकी अधिकारी गट ब.

विद्यार्थी काय म्हणतात?

गेल्या तीन वर्षांपासून महिला व बालविकास विभागातील रिक्त पदांच्या भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीच्या आणि परीक्षा होण्याच्या प्रतीक्षेत दीड लाख विद्यार्थी आहेत. सेवा प्रवेश नियम बदलल्यास त्याचा आम्ही तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. ते टाळण्यासाठी शासनाने सरळसेवेतून भरती करावी. -अमर पाटील, शाहूवाडी

जर, या विभागातील रिक्त पदे राज्यसेवेतून भरायची होती, तर २०१८ मध्ये शासनाने ते जाहीर करायला हवे होते. आता अचानक सेवा प्रवेश नियमात बदल करणे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. पूर्वीप्रमाणे सरळसेवेमधून भरती करावी. -अमिता नुले, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाStudentविद्यार्थी