शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:44 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी तीन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी २ हजार ४२४ मतदान केले आणि ते तंतोतंत जुळले. कोल्हापुरातील राजाराम तलाव येथील गोदामात सुरू असलेल्या मतदान फेरपडताळणीत हे मतदान झाले आहे. बुधवारपासून पुढे तीन दिवस चंदगडसहकोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनवर ही प्रक्रिया चालणार आहे.विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर विरोधी पक्षातील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांच्या फेरपडताळणीची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून मॉकपाेल प्रक्रियेला सुरुवात झाली. राजाराम तलावाशेजारच्या शासकीय गोदामात एकाच हॉलमध्ये मतदान प्रक्रिया झाली.यावेळी प्रतिनिधी दहा ते बारा आणि कर्मचारी मात्र शंभर उपस्थित होते. आमदार शिवाजी पाटील यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून भारती जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर-कुपेकर यांच्यावतीने दिलीप पाटील तसेच अपक्ष उमेदवार संतोष चौगुले यांच्यावतीने मानसिंग देसाई हे प्रतिनिधी उपस्थित होते.सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले. उमेदवारांच्या मागणीप्रमाणे त्यांना विधानसभेला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी दाखवण्यात आली. त्यानंतर हा डेटा काढून टाकून त्याच इव्हीएमवर प्रतिनिधींकडून नव्याने मतदान करून घेतले गेले. त्यानंतर मॉकपोलची मतमोजणी व व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतदान चिठ्ठीची तपासणी करण्यात आली. झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची आकडेवारी तंतोतंत जुळली. यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शक्ती कदम यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, निवडणूक तहसीलदार महेश खिलारी उपस्थित होते.

प्रचंड बंदोबस्तात प्रक्रियाही प्रक्रिया इन कॅमेरा करण्यात आली. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात होता. उमेदवारांचे प्रतिनिधी व मोजके कर्मचारी वगळता कोणालाही आत सोडले नाही. ही प्रक्रिया आज गुरुवार, शुक्रवार व शनिवारीदेखील सुरू राहणार आहे. यात कोल्हापूर उत्तरचा समावेश आहे.

केंद्र क्रमांक : झालेले मतदान

  • केंद्र क्रमांक ३ कोवाडे : ७०७
  • केंद्र क्रमांक ५ निंगुडगे : ९०५
  • केंद्र क्रमांक १०० खणदाळ : ८१२

१४०० मतांच्या आधीच थांबले..वरील तीन केंद्रांवरील प्रत्येक मशीनवर १४०० मतं घेण्यात येत आहेत. हा अधिकार फक्त उमेदवाराला, किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला किंवा अभियंत्याला होता. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी दिवसभर मतदान यंत्रांवर मतदान करत बसले होते. मात्र १४०० मते पूर्ण होण्याआधीच ते थांबले. त्यानंतर मतदानाची पडताळणी केली गेली.