शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा ऊस गाळप विक्रमाकडे

By admin | Updated: March 14, 2016 00:29 IST

दुष्काळातही १.९५ कोटींचा टप्पा ओलांडला : महिन्याभरात आणखी ३५ लाख टन गाळप

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --कोल्हापूरला कधी नव्हे तो दुष्काळाचा चटका बसल्याने यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार, असाच कयास होता; पण सगळ्यांचे अंदाज फोल ठरवीत कोल्हापूर विभागाची विक्रमी गाळपाकडे वाटचाल सुरू आहे. विभागाने आतापर्यंत १ कोटी ९५ लाख टनांचे गाळप केले असून, शिल्लक ऊस पाहता कारखान्यांची धुराडी अजून महिनाभर पेटतच राहणार असल्याने यंदा हा विभाग २ कोटी ३५ लाख टनांचा टप्पा पार करणार, हे नक्की! हे गाळप आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च राहणार आहे. अलीकडील दहा वर्षांत कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात उसाचे प्रमाण वाढल्याने कोल्हापूरमध्ये सरासरी १ कोटी ३० लाख, तर सांगलीमध्ये ६५ ते ७५ लाख टन ऊस गाळप राहिले आहे; पण यंदा उसाची वाढ सुरू असतानाच पावसाने हुलकावणी दिली आणि त्यानंतर पाण्याची ओढ बसल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार, असा साखर कारखान्यांसह सरकारी यंत्रणेचा अंदाज होता; पण हेक्टरी उत्पादन घटण्यापेक्षा वाढल्याने सगळ्यांचाच अंदाज फोल ठरला. कर्नाटकातील पहिली उचल कमी असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे गेला नसल्याचा परिणामही यात दिसत आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी १ कोटी ३५ लाख ४२ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७७ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप केले होते. यंदा ९ मार्चपर्यंत कोल्हापुरात १ कोटी २५ लाख ५२ हजार, तर सांगलीमध्ये ७० लाख ३८ हजार टनांचे गाळप झाले आहे. विभागातील ३७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शिल्लक ऊस पाहता अपवाद वगळता बहुतांश कारखाने महिनाभर चालतील, असा अंदाज आहे. विभागात दररोज दीड ते पावणेदोन लाख टन उसाचे गाळप होत असल्याने तीस दिवसांत ४० ते ४५ लाख टन अजून गाळप होणार आहे. त्यामुळे काही केले तरी यंदा २ कोटी ३५ लाख टन गाळप होणार, हे निश्चित. गाळपाचा इतिहास पाहिला तर हा उच्चांक होणार आहे. .गाळप वाढले तरी उतारा स्थिर!उसाचे उत्पादन वाढल्याने उताऱ्यात घसरण होईल, असा अंदाज होता; पण आता विभागाचा सरासरी साखर उतारा १२.२७ टक्के आहे. गतवर्षी सरासरी १२.५८ टक्के होता. हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शिल्लक उसाला चांगला उतारा असतो. त्यामुळे उतारा वाढला नसला तरी तो गतवर्षीपर्यंत स्थिर राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.