शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

कोल्हापूरचा ऊस गाळप विक्रमाकडे

By admin | Updated: March 14, 2016 00:29 IST

दुष्काळातही १.९५ कोटींचा टप्पा ओलांडला : महिन्याभरात आणखी ३५ लाख टन गाळप

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --कोल्हापूरला कधी नव्हे तो दुष्काळाचा चटका बसल्याने यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार, असाच कयास होता; पण सगळ्यांचे अंदाज फोल ठरवीत कोल्हापूर विभागाची विक्रमी गाळपाकडे वाटचाल सुरू आहे. विभागाने आतापर्यंत १ कोटी ९५ लाख टनांचे गाळप केले असून, शिल्लक ऊस पाहता कारखान्यांची धुराडी अजून महिनाभर पेटतच राहणार असल्याने यंदा हा विभाग २ कोटी ३५ लाख टनांचा टप्पा पार करणार, हे नक्की! हे गाळप आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च राहणार आहे. अलीकडील दहा वर्षांत कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात उसाचे प्रमाण वाढल्याने कोल्हापूरमध्ये सरासरी १ कोटी ३० लाख, तर सांगलीमध्ये ६५ ते ७५ लाख टन ऊस गाळप राहिले आहे; पण यंदा उसाची वाढ सुरू असतानाच पावसाने हुलकावणी दिली आणि त्यानंतर पाण्याची ओढ बसल्याने उसाच्या उत्पादनात घट होणार, असा साखर कारखान्यांसह सरकारी यंत्रणेचा अंदाज होता; पण हेक्टरी उत्पादन घटण्यापेक्षा वाढल्याने सगळ्यांचाच अंदाज फोल ठरला. कर्नाटकातील पहिली उचल कमी असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे गेला नसल्याचा परिणामही यात दिसत आहे. गतहंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी १ कोटी ३५ लाख ४२ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी ७७ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप केले होते. यंदा ९ मार्चपर्यंत कोल्हापुरात १ कोटी २५ लाख ५२ हजार, तर सांगलीमध्ये ७० लाख ३८ हजार टनांचे गाळप झाले आहे. विभागातील ३७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शिल्लक ऊस पाहता अपवाद वगळता बहुतांश कारखाने महिनाभर चालतील, असा अंदाज आहे. विभागात दररोज दीड ते पावणेदोन लाख टन उसाचे गाळप होत असल्याने तीस दिवसांत ४० ते ४५ लाख टन अजून गाळप होणार आहे. त्यामुळे काही केले तरी यंदा २ कोटी ३५ लाख टन गाळप होणार, हे निश्चित. गाळपाचा इतिहास पाहिला तर हा उच्चांक होणार आहे. .गाळप वाढले तरी उतारा स्थिर!उसाचे उत्पादन वाढल्याने उताऱ्यात घसरण होईल, असा अंदाज होता; पण आता विभागाचा सरासरी साखर उतारा १२.२७ टक्के आहे. गतवर्षी सरासरी १२.५८ टक्के होता. हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शिल्लक उसाला चांगला उतारा असतो. त्यामुळे उतारा वाढला नसला तरी तो गतवर्षीपर्यंत स्थिर राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.