शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज : सैनी

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

आपत्ती नियोजनासाठी बैठक : नृसिंहवाडीत घेतला तयारीचा आढावा

नृसिंहवाडी : संभाव्य पूरस्थिती व पावसाळ्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सतर्क व सज्ज करण्यात आली असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिला. नृसिंहवाडी येथील दत्त देव संस्थानच्या भक्तनिवास हॉलमध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमाजवळ एकत्रित होऊन नंतर कर्नाटकात जाते. नृसिंहवाडी येथे पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते. संभाव्य पूरस्थिती व पावसाळ्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सतर्क व सज्ज करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत दिली. या बैठकीत त्यांनी संपर्क यंत्रणा हायटेक करण्याचे आदेश दिले. आढावा बैठकीत ते म्हणाले, सुरक्षा यंत्रणा एसएमएस, वॉकी टॉकी, मोबाईल, हॅम रेडिओ सिस्टिम, आदी अनेक आधुनिक साधनांचा वापर करून तत्पर करावी, यासाठी आवश्यक लागणारा पैसा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावा. गावातील तरुणांना ट्रेनिंग द्यावे. आपत्ती, घटनास्थळी ते नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संपर्क यंत्रणा गतिशील ठेवणे अत्यावशक आहे. नदीकाठच्या धोकादायक इमारतींची यादी करून त्या लवकरात लवकर रिकाम्या कराव्यात.यावेळी विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा अहवाल दिला. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, नृसिंहवाडीचे उपसरपंच अभिजित जगदाळे, मुख्याधिकारी कुरुंदवाड नगरपालिकेचे अतुल पाटील, शिरोळचे पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, आदींनी नियोजनाचे अहवाल सादर केले. दत्त देव संस्थानच्यावतीने अमित सैनी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्त देव संस्थानचे विश्वस्त सोमनाथ पुजारी, संजय पुजारी, ग्रा. पं. सदस्य अशोक पुजारी, अनंत धनवडे, गटविकास अधिकारी देसाई, नायब तहसीलदार वैभव पिलारे, सर्कल अधिकारी एन. डी. पुजारी, आदी उपस्थित होते.‘आपत्तीकाळात पशुधन वाचवा’ सदाशिव आंबी यांनी आपत्ती काळात मनुष्य जिवाला वाचविण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा राबविली जाते. मात्र, पशुधन वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, अशी सूचना मांडली. यावर निश्चित विचार करून निर्णय घेण्याची ग्वाही दिली.मोबाईल बंद ठेवू नकाअधिकाऱ्यांनी मोबाईल संच बंद ठेवू नयेत. नैसर्गिक आपत्तीसारख्या आणीबाणीवेळी स्वत:ला त्रास होईल म्हणून आपला मोबाईल संच बंद न ठेवता जनतेच्या सेवेसाठी त्याचा वापर करावा, अशा सक्त सूचना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.शिरोळमध्येही आढावाशिरोळ : जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी बुधवारी शिरोळ तहसील कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करून लोकांची कामे वेळेवर करा, पुढील बैठक ीवेळी प्रत्येकाने सविस्तर माहिती देण्याची तयारी ठेवावी, असे सांगून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.