शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल १५ हजार जणांची रॅपिड ॲन्टिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात येऊन कान टोचल्यानंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा वेगाने कामाला ...

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात येऊन कान टोचल्यानंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा वेगाने कामाला लागली असून घरोघरी जाऊन, गावागावात रस्त्यावरच ॲन्टिजन टेस्ट केल्या जात आहेत. दोन दिवसांत तब्बल १५ हजार टेस्ट झाल्या असून यातून पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यांचे अहवाल पुन्हा एकदा आरटीपीसीआर करण्यासाठी पाठवले जात आहेत, त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांची संख्याही वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा व मृत्यूचा दरही राज्यात सर्वाधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवारी (दि.१४) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट कोल्हापूर गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन चाचण्या वाढवा, हलगर्जीपणा करू नका अशी तंबीच देत लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्याचेही आदेश दिले. तरीदेखील चार दिवस प्रशासन सुस्तच होते. दरम्यान शुक्रवारी राज्य सरकारच्या आपत्ती प्राधिकरणकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटीचा व मृत्यूचा दरही १० टक्केंच्यावर राहिल्याने निर्बंधात कोणत्याही प्रकारची शिथिलता देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुढील शुक्रवारी आपत्ती प्राधिकरणचा अहवाल येईपर्यंत सध्या सुरू असलेले निर्बंध सुरूच राहतील, असे आदेश काढून त्याप्रमाणे अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

दरम्यान चाचण्या दुप्पट करण्याचे उपमुख्यमंत्र्याचे आदेश मनावर घेत जिल्हा प्रशासनाने रॅपिड ॲन्टिजन टेस्टचा वेग वाढवला आहे. जास्त रुग्ण आढळणाऱ्या गावात, परिसरांचा शोध घेऊन घराघरात जाऊन तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी देखील ॲन्टिजन किट घेऊन कर्मचारी नागरिकांना अडवून तपासणी करताना दिसत आहेत.

चौकट

डोेंगराळ भागातही तपासणी

दुर्गम डोंगराळ भागात देखील आरोग्य कर्मचारी तपासणी करण्यासाठी फिरत आहेत. तेथे मोबाईल रेंजची अडचण असलीतरी देखील तपासण्या करून नंतर त्याची माहिती अपलोड केली जात आहे.

चौकट

साथरोगामुळे तापाचे रुग्ण जास्त

गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यूची साथ वेगाने पसरत आहे. त्यातच नद्यांना पूर आल्याने पाणी लालभडक झाले आहे. तेच पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने जुलाबासह तापाचीही साथ पसरत आहे. साथीच्या आजारामुळे ताप, खाेकला, जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील या साथ रोगांना साधर्म्य दर्शवणारीच असल्यामुळे ॲन्टिजन टेस्टद्वारे त्याची पडताळणी केली जात आहेत.

प्रतिक्रिया

आमचे कर्मचारी जोरदार पावसाची पर्वा न करता घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत. त्यांना मोबाईल रेंजच्याही अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवार, रविवार सुट्टी असताना देखील ते काम करत आहेत, याचे कौतुक वाटते. नागरिकांनीही सहकार्य करून तपासणी करून घ्यावी.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

(फोटो-२००६२०२१-कोल-रॅपीड टेस्ट)