शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
3
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
4
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
5
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
6
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
7
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
8
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
9
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
10
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
11
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
12
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
13
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
14
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
15
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
16
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
17
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
18
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
19
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपीएल’साठी रणजी खेळणे अनिवार्य करावे  : माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:15 IST

आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने तीन वर्षे रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले पाहिजे; तरच कसोटी क्रिकेट टिकेल, असे प्रतिपादन विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी केले. ‘के. एस.ए.’तर्फे आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्दे‘आयपीएल’साठी रणजी खेळणे अनिवार्य करावे  : माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडितकसोटीकडे दुर्लक्ष न करता झटपट क्रिकेटही खेळता येईल

 

 

 

कोल्हापूर : आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने तीन वर्षे रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले पाहिजे; तरच कसोटी क्रिकेट टिकेल, असे प्रतिपादन विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी केले. ‘के. एस.ए.’तर्फे आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.पंडित म्हणाले, क्रिकेटमध्ये शॉर्टकट नाही; त्यामुळे प्रथम श्रेणीचे सामने खेळणे क्रिकेटपटूला अनिवार्य आहे. हाच नमुना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घालून दिला आहे. पाच दिवसांच्या कसोटीमधून खेळाडूची क्षमता व कस लागतो. त्यातूनच हे तारे देशाला मिळतात.

टी-२० क्रिकेटमुळे कसोटीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी ‘आयसीसीआय’ घेत आहे. त्याकरिता क्रीडारसिकांना कसोटी सामने बघता यावेत म्हणून रात्रीचे कसोटी सामने खेळविण्याचा प्रस्ताव आहे. ‘बीसीसीआय’ही गावागावांमध्ये क्रिकेटचा प्रसार व्हावा, याकरिता विकासनिधी देत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बिहारसारखे राज्यही रणजी सामने खेळण्यासाठी पुढे आले आहे.

विदर्भाने ८४ वर्षांनी रणजी करंडक जिंकला. त्या संघाचा प्रशिक्षक म्हणून मी काम करीत आहे. हा करंडक जिंकण्यासाठी केवळ विदर्भाच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामना जिंकणे हे ध्येय ठरवून दिले होते. त्यामुळेच हा करंडक जिंकता आला.

क्रिकेट खेळात यष्टिरक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे ‘आयपीएल’सह प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात हे पुढे आले आहे. चांगले क्रिकेटपटू होण्यासाठी पॅशन व खेळातील सातत्य आणि मेहनत आवश्यक आहे. शॉर्टकट क्रिकेटमध्ये चालत नाही. आज जरी ‘आयपीएल’सारख्या टी-२० स्पर्धांचा बोलबाला असला तरी त्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात आघाडीवर असलेल्याच खेळाडूंना स्थान मिळत आले आहे.

कसोटी जिवंत ठेवण्यासाठी ज्या खेळाडूने तीन वर्षे रणजी सामन्यात आपले कौशल्य दाखविले आहे, अशाच खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये स्थान द्यावे. त्यातून कसोटीकडेही दुर्लक्ष न करता झटपट क्रिकेटही खेळाडूंना खेळता येईल.यावेळी के. एस. ए.चे पदाधिकारी सरदार मोमीन, ‘केडीसीए’चे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, संभाजीराव पाटील-मांगोरे, दीपक शेळके, ताज नांद्रेकर, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, नीलराजे बावडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.त्या षटकाराची पुन्हा आठवणभारताचे माजी यष्टिरक्षक राहिलेल्या चंद्रकांत पंडित यांनी १९८६ साली शारजा येथे झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील झालेल्या सामन्यात एका चेंडूवर चार धावा हव्या असताना जावेद मियॉँदादने चेतन शर्मा यांच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यावेळी संघात यष्टीमागे यष्टिरक्षण मी करीत होतो, अशी कटू आठवणही त्यांनी सांगितली. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर