शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयपीएल’साठी रणजी खेळणे अनिवार्य करावे  : माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:15 IST

आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने तीन वर्षे रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले पाहिजे; तरच कसोटी क्रिकेट टिकेल, असे प्रतिपादन विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी केले. ‘के. एस.ए.’तर्फे आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्दे‘आयपीएल’साठी रणजी खेळणे अनिवार्य करावे  : माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडितकसोटीकडे दुर्लक्ष न करता झटपट क्रिकेटही खेळता येईल

 

 

 

कोल्हापूर : आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने तीन वर्षे रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले पाहिजे; तरच कसोटी क्रिकेट टिकेल, असे प्रतिपादन विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी केले. ‘के. एस.ए.’तर्फे आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.पंडित म्हणाले, क्रिकेटमध्ये शॉर्टकट नाही; त्यामुळे प्रथम श्रेणीचे सामने खेळणे क्रिकेटपटूला अनिवार्य आहे. हाच नमुना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घालून दिला आहे. पाच दिवसांच्या कसोटीमधून खेळाडूची क्षमता व कस लागतो. त्यातूनच हे तारे देशाला मिळतात.

टी-२० क्रिकेटमुळे कसोटीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी ‘आयसीसीआय’ घेत आहे. त्याकरिता क्रीडारसिकांना कसोटी सामने बघता यावेत म्हणून रात्रीचे कसोटी सामने खेळविण्याचा प्रस्ताव आहे. ‘बीसीसीआय’ही गावागावांमध्ये क्रिकेटचा प्रसार व्हावा, याकरिता विकासनिधी देत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बिहारसारखे राज्यही रणजी सामने खेळण्यासाठी पुढे आले आहे.

विदर्भाने ८४ वर्षांनी रणजी करंडक जिंकला. त्या संघाचा प्रशिक्षक म्हणून मी काम करीत आहे. हा करंडक जिंकण्यासाठी केवळ विदर्भाच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामना जिंकणे हे ध्येय ठरवून दिले होते. त्यामुळेच हा करंडक जिंकता आला.

क्रिकेट खेळात यष्टिरक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे ‘आयपीएल’सह प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात हे पुढे आले आहे. चांगले क्रिकेटपटू होण्यासाठी पॅशन व खेळातील सातत्य आणि मेहनत आवश्यक आहे. शॉर्टकट क्रिकेटमध्ये चालत नाही. आज जरी ‘आयपीएल’सारख्या टी-२० स्पर्धांचा बोलबाला असला तरी त्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात आघाडीवर असलेल्याच खेळाडूंना स्थान मिळत आले आहे.

कसोटी जिवंत ठेवण्यासाठी ज्या खेळाडूने तीन वर्षे रणजी सामन्यात आपले कौशल्य दाखविले आहे, अशाच खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये स्थान द्यावे. त्यातून कसोटीकडेही दुर्लक्ष न करता झटपट क्रिकेटही खेळाडूंना खेळता येईल.यावेळी के. एस. ए.चे पदाधिकारी सरदार मोमीन, ‘केडीसीए’चे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, संभाजीराव पाटील-मांगोरे, दीपक शेळके, ताज नांद्रेकर, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, नीलराजे बावडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.त्या षटकाराची पुन्हा आठवणभारताचे माजी यष्टिरक्षक राहिलेल्या चंद्रकांत पंडित यांनी १९८६ साली शारजा येथे झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील झालेल्या सामन्यात एका चेंडूवर चार धावा हव्या असताना जावेद मियॉँदादने चेतन शर्मा यांच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यावेळी संघात यष्टीमागे यष्टिरक्षण मी करीत होतो, अशी कटू आठवणही त्यांनी सांगितली. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर