शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

‘आयपीएल’साठी रणजी खेळणे अनिवार्य करावे  : माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:15 IST

आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने तीन वर्षे रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले पाहिजे; तरच कसोटी क्रिकेट टिकेल, असे प्रतिपादन विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी केले. ‘के. एस.ए.’तर्फे आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्दे‘आयपीएल’साठी रणजी खेळणे अनिवार्य करावे  : माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडितकसोटीकडे दुर्लक्ष न करता झटपट क्रिकेटही खेळता येईल

 

 

 

कोल्हापूर : आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’ने तीन वर्षे रणजी स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले पाहिजे; तरच कसोटी क्रिकेट टिकेल, असे प्रतिपादन विदर्भ रणजी संघाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी केले. ‘के. एस.ए.’तर्फे आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.पंडित म्हणाले, क्रिकेटमध्ये शॉर्टकट नाही; त्यामुळे प्रथम श्रेणीचे सामने खेळणे क्रिकेटपटूला अनिवार्य आहे. हाच नमुना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घालून दिला आहे. पाच दिवसांच्या कसोटीमधून खेळाडूची क्षमता व कस लागतो. त्यातूनच हे तारे देशाला मिळतात.

टी-२० क्रिकेटमुळे कसोटीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी ‘आयसीसीआय’ घेत आहे. त्याकरिता क्रीडारसिकांना कसोटी सामने बघता यावेत म्हणून रात्रीचे कसोटी सामने खेळविण्याचा प्रस्ताव आहे. ‘बीसीसीआय’ही गावागावांमध्ये क्रिकेटचा प्रसार व्हावा, याकरिता विकासनिधी देत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बिहारसारखे राज्यही रणजी सामने खेळण्यासाठी पुढे आले आहे.

विदर्भाने ८४ वर्षांनी रणजी करंडक जिंकला. त्या संघाचा प्रशिक्षक म्हणून मी काम करीत आहे. हा करंडक जिंकण्यासाठी केवळ विदर्भाच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामना जिंकणे हे ध्येय ठरवून दिले होते. त्यामुळेच हा करंडक जिंकता आला.

क्रिकेट खेळात यष्टिरक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे ‘आयपीएल’सह प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात हे पुढे आले आहे. चांगले क्रिकेटपटू होण्यासाठी पॅशन व खेळातील सातत्य आणि मेहनत आवश्यक आहे. शॉर्टकट क्रिकेटमध्ये चालत नाही. आज जरी ‘आयपीएल’सारख्या टी-२० स्पर्धांचा बोलबाला असला तरी त्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात आघाडीवर असलेल्याच खेळाडूंना स्थान मिळत आले आहे.

कसोटी जिवंत ठेवण्यासाठी ज्या खेळाडूने तीन वर्षे रणजी सामन्यात आपले कौशल्य दाखविले आहे, अशाच खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये स्थान द्यावे. त्यातून कसोटीकडेही दुर्लक्ष न करता झटपट क्रिकेटही खेळाडूंना खेळता येईल.यावेळी के. एस. ए.चे पदाधिकारी सरदार मोमीन, ‘केडीसीए’चे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, संभाजीराव पाटील-मांगोरे, दीपक शेळके, ताज नांद्रेकर, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, नीलराजे बावडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.त्या षटकाराची पुन्हा आठवणभारताचे माजी यष्टिरक्षक राहिलेल्या चंद्रकांत पंडित यांनी १९८६ साली शारजा येथे झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील झालेल्या सामन्यात एका चेंडूवर चार धावा हव्या असताना जावेद मियॉँदादने चेतन शर्मा यांच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यावेळी संघात यष्टीमागे यष्टिरक्षण मी करीत होतो, अशी कटू आठवणही त्यांनी सांगितली. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर